शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

‘स्वाइन’ने आणखी दोन महिलांचा मृत्यू

By admin | Updated: October 2, 2015 23:44 IST

फैलाव वाढला : मृत सांगली, मिरजेतील

सांगली/संजयनगर : ‘स्वाइन फ्लू’ने आणखी दोन महिलांचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. रेश्मा नूर जमादार (वय ४८, कोळी गल्ली, मिरज) व सुनीता बबन कोळपे (३२, संजयनगर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. रेश्मा यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती, तर सुनीता संशयित म्हणून दाखल होत्या, पण त्यांच्या रक्त तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रेश्मा जमादार यांना महिन्यापासून सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास सुरू होता. खासगी रुग्णालयात औषधोपचार घेऊनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना २६ सप्टेंबरला उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तपासणीचा अहवाल २९ सप्टेंबरला रुग्णालय प्रशासनास मिळाला होता. यामध्ये त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांना स्वाइन फ्लू कक्षात हलवून उपचार सुरू केले होते. मात्र, शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता त्यांचा मृत्यू झाला. सुनीता कोळपे यांनाही चार-पाच दिवसांपासून सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास सुरू होता. त्यांना मधुमेह होता. त्यांना हिवताप असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले होते. औषधोपचार करुनही त्यांचा ताप व खोकला कमी येत नव्हता. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली असावी, असा डॉक्टरांना संशय आला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी त्यांना दाखल केले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीला घेण्यात आले होते. अहवाल येण्यास दोन-तीन दिवस लागणार आहेत. मात्र तोपर्यंतच त्यांचाही शुक्रवारी पहाटे चार वाजता मृत्यू झाला. दरम्यान, नव्याने चार संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण सांगली, मिरज, कुपवाड व जत पसिरातील असल्याचे स्वाइन फ्लू कक्ष अधिकारी सदाशिव व्हण्णणावर यांनी सांगितले. आरोग्य यंत्रणा कोमात आठवड्यात महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्लूने दहाजणांचा मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. शेवटच्याक्षणी असे रुग्ण उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र रक्त तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू होत आहे. स्वाइनचा फैलाव वाढत असताना, आरोग्य यंत्रणा मात्र कोमात गेली असल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडून जनजागृतीसाठी कोणतीही पावले उचलली जात नसल्याचे दिसून येते.