शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

भोसेजवळ अपघातात दोन ठार, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:49 IST

मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर भोसेजवळ कंटेनरने पिकअप् टेम्पोला ठोकरल्याने दोघेजण ठार झाले, तर तिघेजण जखमी झाले. जखमी व मृत बार्शी तालुक्यातील असून, कोल्हापूर येथे सीताफळ विक्री करुन ते परत जात असताना हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. हा अपघात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास झाला.पंढरपूर ...

मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर भोसेजवळ कंटेनरने पिकअप् टेम्पोला ठोकरल्याने दोघेजण ठार झाले, तर तिघेजण जखमी झाले. जखमी व मृत बार्शी तालुक्यातील असून, कोल्हापूर येथे सीताफळ विक्री करुन ते परत जात असताना हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. हा अपघात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास झाला.पंढरपूर रस्त्यावर भोसे हद्दीत पंढरपूरच्या दिशेने जाणाºया पिकअप् टेम्पोला (एमएच २५, पी ५८१७) समोरून मिरजेच्या दिशेने भरधाव येणाºया कंटेनरने (एचआर ५५, एपी २९०४) ठोकरले. कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे टेम्पोच्या हौद्यात बसलेल्या पाचजणांपैकी दोघांचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले. नबी मौला शेख (वय ४७, रा. पांगरी, ता. बार्शी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी अवस्थेतील खंडू चंद्रकांत चांदणे (३०, रा पांगरी, ता. बार्शी) यांचा मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. तसेच दस्तगीर याकूब शेख (२५, रा. पांगरी) व राजू चांद शेख (४०, रा. पांगरी) या दोन जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत, मनोहर शिंदे (रा. बार्शी) हे किरकोळ जखमी झाले आहेत.कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे पिक-अप् टेम्पो रस्त्याकडेला उलटून टेम्पोचा हौदा तुटून रस्त्याकडेच्या झाडीत अडकला होता. टेम्पोचालक मेहबूब शेख (रा.पांगरी), संभाजी ऊर्फ आप्पासाहेब तुळशीदास शिंदे (रा. चिंचोली) व समीर बशीर पठाण (रा. उस्मानाबाद) हे चालकासोबत पुढे बसलेले तिघेजण सुदैवाने बचावले.अपघातानंतर पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. क्रेनच्या साहाय्याने टेम्पो व कंटेनर हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. कंटेनर चालकाने अपघातानंतर पलायन केले. अपघाताबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात समीर पठाण याने फिर्याद दिली असून, फरारी कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगलीच्या पोलिस अधीक्षकांचे भाऊ बचावलेअपघातातील मृत व जखमी बार्शी तालुक्यातील शेतकरी व फळे वाहतूक करणारे आहेत. पांगरी पांढरी व चिंचोली येथील हे सर्वजण मेहबूब शेख यांच्या टेम्पोतून कोल्हापुरात सीताफळे विक्रीसाठी आले होते. सकाळी शाहू मार्केट यार्डात सीताफळे विक्री करुन ते गावी परत जात होते. सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे भाऊ संभाजी ऊर्फ आप्पासाहेब शिंदे हे सुध्दा त्यांच्या शेतातील सीताफळे विक्रीसाठी या टेम्पोतून आले होते. संभाजी शिंदे या अपघातात सुदैवाने बचावले.टेम्पोचा चक्काचूरअपघातात मृत नबी शेख यांच्यासोबत आलेला त्यांचा भाचा समीर पठाण हा वाचला. समोरुन भरधाव वेगाने येणाºया कंटेनरला चुकविण्यासाठी टेम्पो रस्त्याकडेला घेतल्यानंतरही, टेम्पोच्या हौद्याला कंटेनरने ठोकरल्याने टेम्पो उलटून टेम्पोचा चक्काचूर झाला.

टॅग्स :Accidentअपघात