शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू, 646 जनावरे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 14:39 IST

दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील आटपाडी मंडळातील तडवळे व दिघंची मंडळात आवळाई येथे या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, दोन्ही चारा छावण्यात एकूण 646 जनावरे दाखल झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देआटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू, 646 जनावरे दाखल जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती

सांगली : दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील आटपाडी मंडळातील तडवळे व दिघंची मंडळात आवळाई येथे या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, दोन्ही चारा छावण्यात एकूण 646 जनावरे दाखल झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सध्या जिल्ह्यात पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दोन ठिकाणी चारा छावणी सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्या

नुसार आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. दि. 29 एप्रिल 2019 रोजी तडवळे येथे सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीत 392 मोठी आणि 80 लहान जनावरे अशी एकूण 472 जनावरे दाखल करण्यात आली आहेत.  गजानन कामगार मजूर सहकारी सोसायटी लि. आटपाडी या संस्थेने ही चारा छावणी सुरू केली आहे. तर दि. 30 एप्रिल 2019 रोजी आवळाई येथे सिद्धनाथ महिला दुग्ध व्यावसायिक संस्था, आवळाई येथे दुसरी चारा छावणी सुरू करण्यात आली असून, या चारा छावणीत 131 मोठी आणि 43 लहान जनावरे अशी एकूण 174 जनावरे दाखल करण्यात आली आहेत.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, छावणीत दाखल झालेल्या प्रति मोठ्या जनावरास हिरवा चारा, ऊसाचे वाडे, ऊस प्रतिदिन 15 किलोग्रॅम किंवा वाळलेला, प्रक्रियायुक्त वाळलेला चारा 6 किलोग्रॅम किंवा मुरघास 8 किलोग्रॅम आणि आठवड्यातून तीन दिवस एकदिवसआड पशुखाद्य 1 किलोग्रॅम देण्यात यावे.

छावणीत दाखल झालेल्या प्रति लहान जनावरास हिरवा चारा, ऊसाचे वाडे, ऊस प्रतिदिन 7.5 किलोग्रॅम किंवा वाळलेला, प्रक्रियायुक्त वाळलेला चारा 3 किलोग्रॅम किंवा मुरघास 4 किलोग्रॅम आणि आठवड्यातून तीन दिवस एकदिवसआड पशुखाद्य अर्धा किलोग्रॅम देण्यात यावे. जनावरास चाऱ्याऐवजी ऊस द्यावयाचा झाल्यास तो अखंड न देता लहान तुकडे करून देण्यात यावा. यासाठी मोठ्या जनावरांना प्रतिदिन प्रति जनावर 90 रूपये आणि लहान जनावरांना प्रतिदिन प्रति जनावर 45 रूपये अनुदान अनुज्ञेय असणार आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर