शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

देवनगरला बस उलटून पस्तीस विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:52 IST

विटा : विट्याहून वाळूजकडे अरूंद रस्त्याने निघालेल्या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस नाल्यात उलटून ३५ शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी ...

विटा : विट्याहून वाळूजकडे अरूंद रस्त्याने निघालेल्या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस नाल्यात उलटून ३५ शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास देवनगर (ता. खानापूर) गावाजवळ सांगोले रस्त्यावर घडली.दरम्यान, बस उलटलेल्या ठिकाणापासून पुढे केवळ दहा फुटावर खोल विहीर होती. बस आणखी काही अंतर पुढे गेली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. याप्रकरणी संतप्त पालकांनी बसचालक तुकाराम शिंदे यांच्याविरुध्द बुधवारी रात्री उशिरा विटा पोलिसांत फिर्याद दिली.खानापूर तालुक्यातील भांबर्डे व देवनगर येथील शालेय विद्यार्थी वाळूज विद्यालयात शिक्षण घेतात. बुधवारी सकाळी ९.३० वाजता विटा आगाराची विटा ते वाळूज ही बस (क्र. एमएच १२ सीएच ७५८३) आगारातून वाळूजकडे निघाली होती. सकाळी पावणेदहा वाजता भांबर्डे व देवनगर येथील ४१ विद्यार्थी घेऊन बस सांगोलेमार्गे वाळूजकडे जात होती. बस देवनगर गावाजवळच वळणावर असलेल्या अरूंद रस्त्यावर असताना समोरून येणाऱ्या टेम्पोला बाजू देण्याच्या प्रयत्नात चालक तुकाराम शिंदे यांचा बसवरील ताबा सुटला. बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाच फूट खोल नाल्यात उलटली. त्यावेळी बसमध्ये ४१ शालेय विद्यार्थी होते. बस वाहकाच्या बाजूला नाल्यात उलटल्याने चालकाच्या पाठीमागे बसलेले सर्व विद्यार्थी वाहकाच्या बाजूला असलेल्या मुलांच्या अंगावर पडले. प्रसंगावधान राखून चालक व वाहकाने तात्काळ मुलांना बसमधून बाहेर काढले.घटनेची माहिती मिळताच युवा नेते सुशांत देवकर, सरपंच सचिन शेंडे व मुख्याध्यापक विजयसिंह गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व मुलांना उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दुपारी आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली. अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली होती. उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.रुंदीकरण करणार...दरम्यान, देवनगर येथे असलेला अरूंद रस्ता रूंदीकरण करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन रस्त्याची पाहणी केली आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले.अरूंद रस्त्यामुळे अपघातदेवनगर ते सांगोले हा रस्ता अत्यंत अरूंद आहे. गेल्या चार वर्षांपूर्वीही याचठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी रस्ता रूंदीकरणाची मागणी करण्यात आली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हा अपघात झाला असल्याची प्रतिक्रिया सांगोलेचे माजी सरपंच सुशांत देवकर यांनी व्यक्त केली.