शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

स्ट्रॉबेरी महोत्सवाला बारा हजार पर्यटकांची भेट !

By admin | Updated: April 16, 2017 22:43 IST

शानदार समारोप : कधीही या अन् पोटभर खा... भिलारचे मळे फुलले माणसांनी

महाबळेश्वर : तालुक्यातील भिलार येथे गेली तीन दिवस सुरू असलेल्या स्ट्रॉबेरी महोत्सवाचा रविवारी शानदार समारोप झाला. या महोत्सवाच्या निमित्ताने सुमारे बारा हजारांहून अधिक पर्यटकांनी रानवाटा धुंडाळून थेट शेतातील स्ट्रॉबेरीची चव चाखली. भिलार येथील महोत्सवाला पुणे, मुंबई, नागपूर, सातारा तसेच गुजरात, सूरत, पंजाब तसेच परदेशातीलही पर्यटकांनी भेटी दिल्या. स्ट्रॉबेरी मनसोक्त खाण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या स्वागतासाठी व शेतावर घेऊन जाऊन त्यांना माहिती देण्यासाठी भिलार येथील शेतकरी तीन दिवस दिमतीला होते.स्ट्रॉबेरी महोत्सवाचे यंदाचे बारावे वर्ष असून, पर्यटकांच्या वाढत्या प्रतिसादाने आयोजकांचा हेतू साध्य होताना दिसत आहे. यानिमित्ताने विविध उद्योग व्यवसायांना गती मिळाली आहे. स्ट्रॉबेरीबरोबरच येथील शेतीची तसेच इतर पिकांची माहिती पर्यटक घेताना कुतूहलाने ती खरेदीही करीत आहेत. विविध ठिकाणांच्या मुलांच्या सहलीही महोत्सवात काढल्या होत्या.सांगताप्रसंगी बाळासाहेब भिलारे म्हणाले, ‘भिलारच्या स्ट्रॉबेरीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच ‘जी-आय’ मानांकन मिळाले आहे. जागतिक बाजारपेठेत स्ट्रॉबेरीची मोहर उमटल्याने अशा प्रकारचा महोत्सव भरवण्यास आमचा उत्साह आणखी दुणावला आहे.’कृषीतज्ज्ञ संतोष रांजणे म्हणाले, ‘महोत्सवाला मिळत असणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने शेतकऱ्यांमध्येही उत्साह ओसंडून वाहत आहे. याचा फायदा प्रत्यक्षात दिसत असून, यातूनच गतवर्षी तालुक्यात २५०० हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली होती.’ यावेळी गणपत पार्टे, सहायक पोलिस निरीक्षक नारायणराव पवार, प्रवीण भिलारे, प्रशांत भिलारे, बाबूराव भिलारे, नितीन भिलारे, शिवाजी भिलारे, प्रकाश भिलारे, जतीन भिलारे, प्रकाश गावडे, संतोष वाडकर, सुरेश भिलारे, वसंत भिलारे आदी उपस्थित होते. नितीन भिलारे यांनी सर्वांचे आभार मानले. (प्रतिनिधी)