शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
3
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
4
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
5
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
7
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
8
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
9
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
11
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
12
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
13
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
14
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
15
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
16
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
17
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
18
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
19
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
20
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

कारंदवाडी येथील तुषार कणसे यांची अवयव दान मोहीम समाजासाठी ठरतेय प्रेरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:40 IST

आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील डॉ. तुषार कणसे यांनी अवयव दान मोहीम प्रभावीपणे राबवून युवा पिढीला प्रेरणा देणारे काम केले आहे.

ठळक मुद्दे४० जणांचा प्रतिसाद : अनेक रुग्णांचे जीव वाचण्यास मदत होणार

आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील डॉ. तुषार कणसे यांनी अवयव दान मोहीम प्रभावीपणे राबवून युवा पिढीला प्रेरणा देणारे काम केले आहे. आजअखेर सुमारे ४० अवयव दात्यांना अवयव दानाचे महत्त्व पटवून देण्यात ते यशस्वी ठरले असून, या मोहिमेत सर्वांनी सहकार्य केल्यास भविष्यात अनेक रुग्णांचा जीव वाचणार आहे.

कारंदवाडी हे आष्टा-सांगली रस्त्यावरील एक छोटे खेडेगाव. वडील राजाराम कणसे या सुसंस्कृत शिक्षकाच्या संस्कारांमुळे लहानपणापासून डॉ. कणसे गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर मोठ्या शहरात व्यवसाय न करता गावातील रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

आष्टा, कारंदवाडी, तुंग येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये अनेकदा आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. त्यांना राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे राज्य सरचिटणीस पद मिळाले. आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक आरोग्य शिबिरे घेतली. या शिबिरातूनच त्यांना अवयवदान विषयावर काम करण्याची प्रेरणा मिळाली. एखाद्या रुग्णाचे अवयव निकामी झाल्यास त्याला दुसरा अवयवदाता मिळाला, तरच त्याचे जीवन सुसह्य होते अन्यथा मृत्यू अटळ ठरतो.

वेळेत अवयव दाते उपलब्ध न झाल्याने आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबद्दल समाजात जनजागृती करून लोकांना अवयव दानासाठी प्रेरित करण्याची मोहीम कणसे यांनी हाती घेतली. वाळवा, तासगाव, शिराळा, मिरज यासह जिल्ह्यातील अनेक गावात जाऊन अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले. प्रारंभी लोकांना पटले नाही, मात्र त्यांनी प्रयत्न सुरुच ठेवले. हळूहळू लोकांना आपल्या अवयवांची मृत्यूनंतर राख होण्यापेक्षा, त्यांची कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होईल, ही जाणीव होत आहे. यातूनच आजअखेर सुमारे चाळीस अवयव दात्यांनी उपक्रमास प्रतिसाद दिला.शरद पवारांकडून कौतुकहजारो अवयवदाते तयार झाले, तर अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचतील, असा विश्वास डॉ. कणसे यांनी व्यक्त केला. डॉ. कणसे यांच्या कार्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही कौतुक केले. त्यांचा हा समाजोपयोगी उपक्रम आदर्शवत ठरला आहे.