शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

बंदमुळे पान उत्पादक अडचणीत

By admin | Updated: July 21, 2016 00:49 IST

आर्थिक फटका : मिरज पूर्व भागातील स्थिती, नाराजीचे चित्र

दिलीप कुंभार -- नरवाड -मिरज पूर्व भागातील लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांना किरकोळ व्यापाऱ्यांच्या बंदमुळे आर्थिक फटका बसत आहे. मिरज तालुक्यातील नरवाड, मालगाव, बेडग, आरग आदी भागातून मुंबई, नाशिक, पुणे, लातूर, पंढरपूर, उस्मानाबाद, राजकोट (गुजरात) या बाजारात विक्रीसाठी खाऊची पाने पाठविली जातात. तेथील घाऊक आणि किरकोळ व्यापारी पाने खरेदी करून विक्रीसाठी सर्वत्र वितरित केली जातात. मात्र सध्या चालू असलेल्या अडतप्रश्नी किरकोळ व्यापाऱ्यांच्या संपामुळे पान उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे. पान बाजारात यापूर्वी ६०० ते ९०० रुपयाला विकली जाणारी दहा कवळीची ‘कळी’ (तीन हजार पानांची एक करंडी) बंदमुळे २०० ते ३०० रुपयाला विकली जात आहे. परिणामी पान उत्पादकांनी कमी प्रमाणात पानांचा खुडा सुरू ठेवला आहे. यामुळे उत्पादकास आर्थिक झळ सोसावी लागत आहे. पान बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मालाला उठाव नसल्याने याचा थेट परिणाम झाला आहे. घाऊक पान दलालांनी मात्र याचा फायदा उठविला असून, कमी दरात चांगला माल मिळत आहे. फापडा पाने भट्टीला लावून, ती पिकवून मुंबईच्या पान बाजारात विकली जात असल्याने सध्या या पानांना चांगला भाव मिळत आहे. त्यावर बंदचा फारसा परिणाम झाला नाही.शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष एम. के. माळी म्हणाले की, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने त्वरित धोरणात बदल करून अडतप्रश्नी तोडगा काढला पाहिजे. किरकोळ व्यापाऱ्यांचा जेवढा संप लांबेल तेवढा आर्थिक फटका पान उत्पादकांना सोसावा लागणार आहे. गेल्या दोन वर्षापासून पानांना दर मिळाला नाही. आता कुठे सुरुवात झाली, तेवढ्यात झालेल्या संपामुळे पान उत्पादकांचे कंबरडे मोडणार आहे.