शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

बंदमुळे पान उत्पादक अडचणीत

By admin | Updated: July 21, 2016 00:49 IST

आर्थिक फटका : मिरज पूर्व भागातील स्थिती, नाराजीचे चित्र

दिलीप कुंभार -- नरवाड -मिरज पूर्व भागातील लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांना किरकोळ व्यापाऱ्यांच्या बंदमुळे आर्थिक फटका बसत आहे. मिरज तालुक्यातील नरवाड, मालगाव, बेडग, आरग आदी भागातून मुंबई, नाशिक, पुणे, लातूर, पंढरपूर, उस्मानाबाद, राजकोट (गुजरात) या बाजारात विक्रीसाठी खाऊची पाने पाठविली जातात. तेथील घाऊक आणि किरकोळ व्यापारी पाने खरेदी करून विक्रीसाठी सर्वत्र वितरित केली जातात. मात्र सध्या चालू असलेल्या अडतप्रश्नी किरकोळ व्यापाऱ्यांच्या संपामुळे पान उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे. पान बाजारात यापूर्वी ६०० ते ९०० रुपयाला विकली जाणारी दहा कवळीची ‘कळी’ (तीन हजार पानांची एक करंडी) बंदमुळे २०० ते ३०० रुपयाला विकली जात आहे. परिणामी पान उत्पादकांनी कमी प्रमाणात पानांचा खुडा सुरू ठेवला आहे. यामुळे उत्पादकास आर्थिक झळ सोसावी लागत आहे. पान बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मालाला उठाव नसल्याने याचा थेट परिणाम झाला आहे. घाऊक पान दलालांनी मात्र याचा फायदा उठविला असून, कमी दरात चांगला माल मिळत आहे. फापडा पाने भट्टीला लावून, ती पिकवून मुंबईच्या पान बाजारात विकली जात असल्याने सध्या या पानांना चांगला भाव मिळत आहे. त्यावर बंदचा फारसा परिणाम झाला नाही.शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष एम. के. माळी म्हणाले की, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने त्वरित धोरणात बदल करून अडतप्रश्नी तोडगा काढला पाहिजे. किरकोळ व्यापाऱ्यांचा जेवढा संप लांबेल तेवढा आर्थिक फटका पान उत्पादकांना सोसावा लागणार आहे. गेल्या दोन वर्षापासून पानांना दर मिळाला नाही. आता कुठे सुरुवात झाली, तेवढ्यात झालेल्या संपामुळे पान उत्पादकांचे कंबरडे मोडणार आहे.