शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पुरावेळी हेलिकॉप्टरमधून फिरणारे मते मागण्यासाठी पायी फिरताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:40 IST

शिराळा : ही निवडणूक दोन पक्षातील नसून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेच्या विचारांची आहे. पूरपरिस्थितीत महत्त्वाची भूमिका असताना हेलिकॉप्टरमधून पाहणी करणारे ...

शिराळा : ही निवडणूक दोन पक्षातील नसून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेच्या विचारांची आहे. पूरपरिस्थितीत महत्त्वाची भूमिका असताना हेलिकॉप्टरमधून पाहणी करणारे मुख्यमंत्री निवडणुकीतील मते मागण्यासाठी पायी फिरत आहेत. राज्यातील आणि देशातील सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.शिराळा येथे शिराळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.कोल्हे म्हणाले, महाराष्ट्रातल्या विकासावर बोलण्यासारखे काही नसल्यामुळे, देशाचे प्रश्न राज्यात घेऊन ते मांडत आहेत. २०१४ मध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या काही नेत्यांनी आणि आजी-माजी केंद्रीय मंत्र्यांनी पुंगी वाजवली; कमळ फुलले. मात्र त्यांना नागपंचमी उत्सव सुरू करता आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले भाजप सरकार हॉटेलसाठी भाडेतत्त्वावर देण्याचे काम करत आहे.जयंत पाटील म्हणाले, गेल्यावेळी वाळवा तालुक्यातील ४८ गावांतील मतांचा वाटा कमी पडला. यावेळी मात्र याची चिंता तुम्ही करू नका. सध्या सुरू असणारे वाकुर्डे बुद्रुक योजनेचे काम मतासाठी सुरू असून, या योजनेचा पाया फत्तेसिंगराव नाईक यांनी घातला आणि मानसिंगराव नाईक यांनी त्याला गती देण्याचे काम केले आहे, हे सर्वांना माहीत आहे.मानसिंगराव नाईक म्हणाले, विकासाच्या मुद्यावर या निवडणुकीत माझा विजय निश्चित असून, मी अर्ज भरला त्याच दिवशी निकाल काय लागणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.विजयराव नलवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चंद्रकांत पाटील, राजीव पाटील, राजश्री गोसावी, बी. के. नायकवडी, मनसेचे सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत, रवींद्र बर्डे, साधना पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.भगतसिंग नाईक, सम्राटसिंह नाईक, अमरसिंह नाईक, देवराज पाटील, रणजित पाटील, आनंदराव पाटील, संदीप जाधव, भीमराव गायकवाड, दिनकरराव पाटील, राजेंद्र नाईक, सुरेश चव्हाण, भाऊसाहेब नाईक, देवेंद्र धस, कीर्तिकुमार पाटील, सुनीता निकम, वंदना यादव, रुपाली भोसले यावेळी उपस्थित होते. सुनंदा सोनटक्के यांनी आभार मानले.