शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

पुरावेळी हेलिकॉप्टरमधून फिरणारे मते मागण्यासाठी पायी फिरताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:40 IST

शिराळा : ही निवडणूक दोन पक्षातील नसून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेच्या विचारांची आहे. पूरपरिस्थितीत महत्त्वाची भूमिका असताना हेलिकॉप्टरमधून पाहणी करणारे ...

शिराळा : ही निवडणूक दोन पक्षातील नसून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेच्या विचारांची आहे. पूरपरिस्थितीत महत्त्वाची भूमिका असताना हेलिकॉप्टरमधून पाहणी करणारे मुख्यमंत्री निवडणुकीतील मते मागण्यासाठी पायी फिरत आहेत. राज्यातील आणि देशातील सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.शिराळा येथे शिराळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.कोल्हे म्हणाले, महाराष्ट्रातल्या विकासावर बोलण्यासारखे काही नसल्यामुळे, देशाचे प्रश्न राज्यात घेऊन ते मांडत आहेत. २०१४ मध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या काही नेत्यांनी आणि आजी-माजी केंद्रीय मंत्र्यांनी पुंगी वाजवली; कमळ फुलले. मात्र त्यांना नागपंचमी उत्सव सुरू करता आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले भाजप सरकार हॉटेलसाठी भाडेतत्त्वावर देण्याचे काम करत आहे.जयंत पाटील म्हणाले, गेल्यावेळी वाळवा तालुक्यातील ४८ गावांतील मतांचा वाटा कमी पडला. यावेळी मात्र याची चिंता तुम्ही करू नका. सध्या सुरू असणारे वाकुर्डे बुद्रुक योजनेचे काम मतासाठी सुरू असून, या योजनेचा पाया फत्तेसिंगराव नाईक यांनी घातला आणि मानसिंगराव नाईक यांनी त्याला गती देण्याचे काम केले आहे, हे सर्वांना माहीत आहे.मानसिंगराव नाईक म्हणाले, विकासाच्या मुद्यावर या निवडणुकीत माझा विजय निश्चित असून, मी अर्ज भरला त्याच दिवशी निकाल काय लागणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.विजयराव नलवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चंद्रकांत पाटील, राजीव पाटील, राजश्री गोसावी, बी. के. नायकवडी, मनसेचे सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत, रवींद्र बर्डे, साधना पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.भगतसिंग नाईक, सम्राटसिंह नाईक, अमरसिंह नाईक, देवराज पाटील, रणजित पाटील, आनंदराव पाटील, संदीप जाधव, भीमराव गायकवाड, दिनकरराव पाटील, राजेंद्र नाईक, सुरेश चव्हाण, भाऊसाहेब नाईक, देवेंद्र धस, कीर्तिकुमार पाटील, सुनीता निकम, वंदना यादव, रुपाली भोसले यावेळी उपस्थित होते. सुनंदा सोनटक्के यांनी आभार मानले.