शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

एकतीस वर्षांची सत्ता उलथवून टाका

By admin | Updated: October 27, 2016 23:23 IST

निशिकांत पाटील : इस्लामपुरात प्रचार सभा; सत्ताधाऱ्यांनी पैशाच्या गैरवापराने जनतेला गुलाम बनविले

इस्लामपूर : पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पैशाचा गैरवापर करुन शहरातील जनतेला गुलाम बनविले आहे. ३१ वर्षांची सत्ता उलथवून टाकताना मतदारांनी पवित्र मत न विकता, विचार करुन मतदान करावे. जनतेच्या झंझावातापुढे अनेक बलाढ्य शक्ती नेस्तनाबूत झाल्या आहेत. या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निशिकांत पाटील यांनी व्यक्त केला.इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येथील शिवाजी पुतळ्यासमोर जाहीर सभा झाली. या सभेत निशिकांत पाटील बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, विक्रम पाटील, राहुल महाडिक, बाबासाहेब सूर्यवंशी, सम्राट महाडिक, सरपंच गौरव नायकवडी, अरुण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.निशिकांत पाटील म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी शहरातील विकास कामांमध्ये ६0 टक्क्यांपर्यंत कमिशन घेतल्याने, ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. विकास आराखड्यातील आरक्षणापासून सत्ताधाऱ्यांच्या मोठ्या जमिनी मुक्त आहेत. मात्र सामान्यांच्या गुंठा, दोन गुंठा जमिनी आरक्षित झाल्या आहेत. या विकास आराखड्याच्या सॅटेलाईटला किल्ली कोणी दिली, याचा शोध घ्यावा लागेल.सदाभाऊ खोत म्हणाले, निशिकांतदादा अनेक वर्षे राष्ट्रवादीत होते. त्यामुळे सॅटेलाईटला किल्ली कोणी दिली, हे त्यांनी मतदारांना सांगावे. त्या किल्ल्या मतदार आपल्या हातात देतील. पालिकेकडून पाण्याचे कनेक्शन संध्याकाळची सोय केल्याशिवाय मिळत नाही. इस्लामपूरच्या जनतेला गुंडगिरी नव्हे, तर शांतता हवी आहे. विकास कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने रस्ते, घरकुलांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असल्याने निधी आणू. एका वर्षात शहराचा विकास करुन दाखवू.आ. शिवाजीराव नाईक म्हणाले, सर्वांनी एकदिलाने बलाढ्य शक्तीला टक्कर दिली, तर मोठे यश मिळते. राज्यात व देशात भाजपची सत्ता असल्याने इथेही सत्ता द्या, विकास काय असतो हे आम्ही दाखवतो.नानासाहेब महाडिक म्हणाले, निवडणुकीचा निकाल काय लागणार याची साक्ष ही गर्दी देत आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते विकास आघाडीत येत आहेत. कोट्यवधीचा निधी कोणाच्या खिशात गेला, हे शोधून काढावे लागेल. यावेळी विक्रम पाटील, राहुल महाडिक, अरुण कांबळे, गौरव नायकवडी यांचीही भाषणे झाली. विजय कुंभार यांनी आभार मानले. सभेला वैभव पवार, कपिल ओसवाल, महेश पाटील, एल. एन. शहा, सागर खोत, अमित ओसवाल, सतीश महाडिक, अजित पाटील, विजय पवार, आप्पासाहेब पाटील, जलाल मुल्ला, सनी खराडे, अ‍ॅड. फिरोज मगदूम उपस्थित होते. (वार्ताहर)चंगू-मंगू आणि बाकडंनिशिकांत पाटील यांनी पालिकेतील बाकड्याची गोष्ट सांगितली. या बाकड्यावर दोन्ही बाजूला चंगू—मंगू असतात आणि मध्ये एकजण बसलेला असतो. त्या चेहऱ्याला लोक कंटाळलेत. हा चेहरा पाहिला की काम होत नाही, अशी भावना पसरल्याने पालिकेत कोणीच जात नाही. तुम्हाला ७0 वर्षांचा उमेदवार हवा का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.लक्षवेधी नव्हे, एकतर्फीचबाबासाहेब सूर्यवंशी म्हणाले, ‘आम्ही तगडा उमेदवार दिला आहे. त्यामुळे विरोधक डगमगले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कितीही मोठ्या अंगाचा पैलवान असू दे, आमचा पैलवान त्याला चारीमुंड्या चित करणारच. ही लढत लक्षवेधी नसून, एकतर्फी होणार आहे.’ यावेळी ‘राष्ट्रवादी हटाव—इस्लामपूर बचाव’ अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला