शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एकतीस वर्षांची सत्ता उलथवून टाका

By admin | Updated: October 27, 2016 23:23 IST

निशिकांत पाटील : इस्लामपुरात प्रचार सभा; सत्ताधाऱ्यांनी पैशाच्या गैरवापराने जनतेला गुलाम बनविले

इस्लामपूर : पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पैशाचा गैरवापर करुन शहरातील जनतेला गुलाम बनविले आहे. ३१ वर्षांची सत्ता उलथवून टाकताना मतदारांनी पवित्र मत न विकता, विचार करुन मतदान करावे. जनतेच्या झंझावातापुढे अनेक बलाढ्य शक्ती नेस्तनाबूत झाल्या आहेत. या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निशिकांत पाटील यांनी व्यक्त केला.इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येथील शिवाजी पुतळ्यासमोर जाहीर सभा झाली. या सभेत निशिकांत पाटील बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, विक्रम पाटील, राहुल महाडिक, बाबासाहेब सूर्यवंशी, सम्राट महाडिक, सरपंच गौरव नायकवडी, अरुण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.निशिकांत पाटील म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी शहरातील विकास कामांमध्ये ६0 टक्क्यांपर्यंत कमिशन घेतल्याने, ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. विकास आराखड्यातील आरक्षणापासून सत्ताधाऱ्यांच्या मोठ्या जमिनी मुक्त आहेत. मात्र सामान्यांच्या गुंठा, दोन गुंठा जमिनी आरक्षित झाल्या आहेत. या विकास आराखड्याच्या सॅटेलाईटला किल्ली कोणी दिली, याचा शोध घ्यावा लागेल.सदाभाऊ खोत म्हणाले, निशिकांतदादा अनेक वर्षे राष्ट्रवादीत होते. त्यामुळे सॅटेलाईटला किल्ली कोणी दिली, हे त्यांनी मतदारांना सांगावे. त्या किल्ल्या मतदार आपल्या हातात देतील. पालिकेकडून पाण्याचे कनेक्शन संध्याकाळची सोय केल्याशिवाय मिळत नाही. इस्लामपूरच्या जनतेला गुंडगिरी नव्हे, तर शांतता हवी आहे. विकास कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने रस्ते, घरकुलांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असल्याने निधी आणू. एका वर्षात शहराचा विकास करुन दाखवू.आ. शिवाजीराव नाईक म्हणाले, सर्वांनी एकदिलाने बलाढ्य शक्तीला टक्कर दिली, तर मोठे यश मिळते. राज्यात व देशात भाजपची सत्ता असल्याने इथेही सत्ता द्या, विकास काय असतो हे आम्ही दाखवतो.नानासाहेब महाडिक म्हणाले, निवडणुकीचा निकाल काय लागणार याची साक्ष ही गर्दी देत आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते विकास आघाडीत येत आहेत. कोट्यवधीचा निधी कोणाच्या खिशात गेला, हे शोधून काढावे लागेल. यावेळी विक्रम पाटील, राहुल महाडिक, अरुण कांबळे, गौरव नायकवडी यांचीही भाषणे झाली. विजय कुंभार यांनी आभार मानले. सभेला वैभव पवार, कपिल ओसवाल, महेश पाटील, एल. एन. शहा, सागर खोत, अमित ओसवाल, सतीश महाडिक, अजित पाटील, विजय पवार, आप्पासाहेब पाटील, जलाल मुल्ला, सनी खराडे, अ‍ॅड. फिरोज मगदूम उपस्थित होते. (वार्ताहर)चंगू-मंगू आणि बाकडंनिशिकांत पाटील यांनी पालिकेतील बाकड्याची गोष्ट सांगितली. या बाकड्यावर दोन्ही बाजूला चंगू—मंगू असतात आणि मध्ये एकजण बसलेला असतो. त्या चेहऱ्याला लोक कंटाळलेत. हा चेहरा पाहिला की काम होत नाही, अशी भावना पसरल्याने पालिकेत कोणीच जात नाही. तुम्हाला ७0 वर्षांचा उमेदवार हवा का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.लक्षवेधी नव्हे, एकतर्फीचबाबासाहेब सूर्यवंशी म्हणाले, ‘आम्ही तगडा उमेदवार दिला आहे. त्यामुळे विरोधक डगमगले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कितीही मोठ्या अंगाचा पैलवान असू दे, आमचा पैलवान त्याला चारीमुंड्या चित करणारच. ही लढत लक्षवेधी नसून, एकतर्फी होणार आहे.’ यावेळी ‘राष्ट्रवादी हटाव—इस्लामपूर बचाव’ अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला