शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटकातील हळदीचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अतिवृष्टी व महापुराचा सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांसह कर्नाटकातील काही भागातील हळदीच्या ...

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अतिवृष्टी व महापुराचा सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांसह कर्नाटकातील काही भागातील हळदीच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या भागातून पुढील हंगामासाठी येणाऱ्या राजापुरी हळदीमध्ये अंदाजे तीन लाख पोती आवक घटण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यासह राज्याच्या अन्य भागातील हळदीचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

भारतात दरवर्षी ९ ते १० लाख टन हळदीचे उत्पादन होते. एप्रिलच्या मध्यापासून जूनअखेर हळदीची लागवड केली जाते. यंदाही पाऊस वेळेत आल्यामुळे पेरण्या वेळेत झाल्या होत्या, मात्र महाराष्ट्रात जुलैमध्ये आलेल्या अतिवृष्टीने या पिकांना मोठा दणका दिला आहे. विशेषत: सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील महापुरामुळे पेरणी केलेल्या क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे. कर्नाटकातील अथणी, गोकाक आदी भागातील पिकांचेही नुकसान झाले आहे.

पिकाच्या नुकसानामुळे सांगलीच्या बाजारात येणाऱ्या राजापुरी हळदीच्या आवकेत आगामी हंगामात सुमारे २० ते २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांतून दरवर्षी समुारे साडेतीन ते चार लाख हळद पोती (५० किलोची) आवक सांगलीच्या मार्केट यार्डात होत असते. कर्नाटकातून सुमारे ८ लाख पोत्यांची आवक होते. कर्नाटकातील एकूण आवकेत पाऊण लाख ते एक लाख पोती तर सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील आवकेत दीड लाख पोत्यांची आवक घटण्याची चिन्हे आहेत.

पुढील हंगामावर या नुकसानाचा परिणाम होणार आहे. आवक घटल्यामुळे दरांमधील तेजी कायम राहण्याचीही शक्यता आहे. हळदीची मागणी गेल्या दोन वर्षांपासून कायम आहे. निर्यातीतही वाढ होत आहे.

कोट

दीड एकरावरील हळदीचे पीक पाण्यात आहे. महापुरामुळे आता तितक्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. पीक उगवण झाली तरी उतारा घटत असल्याने त्याचा फायदा होत नाही.

-विकास बाबर, हळद उत्पादक, भिलवडी

कोट

अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच कर्नाटकातील काही भागातील हळदीचे पीक पाण्याखाली गेले आहे. नुकसान किती झाले, याचा अंदाज अद्याप नसला तरी सुमारे अडीच लाख पोती राजापुरी हळदीची आवक पुढील हंगामात घटण्याची शक्यता आहे.

- मनोहरलाल सारडा, हळद व्यापारी, माजी अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, सांगली