शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

मसुचीवाडी छेडछाडप्रकरणी तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: May 8, 2016 00:44 IST

मसुचीवाडीची घटना : जयंतराव, सदाभाऊ पोलिस ठाण्यात

इस्लामपूर : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील शाळेच्या मुलींच्या छेडछाडप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यातील इतर फरारींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. आ. जयंत पाटील यांनी पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे यांची भेट घेऊन गावगुंडांवर कारवाईची मागणी केली.मसुचीवाडी व बोरगाव परिसरात दोन आणि तीन मे रोजी झालेल्या मारहाणप्रकरणी संतोष विष्णू पवार व प्रणव प्रदीप पवार (दोघे रा. मसुचीवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी सागर खोत, रोहित खोत आणि आप्पासाहेब बबलेश्वर (तिघे रा. बोरगाव) यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा तिघांविरुद्ध पोलिसांकडून रितसर गुन्ह्याची नोंद करून त्यांना अटक करण्याची कारवाई करण्याचे काम सुरू होते. मसुचीवाडीतील हा खळबळजनक आणि संपूर्ण गावाला दहशतीखाली ठेवणाऱ्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आ. जयंत पाटील यांनी ग्रामस्थांसह पोलिस उपअधीक्षक कार्यालयात वैशाली शिंदे आणि पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्याशी चर्चा केली. पोलिसांकडे आलेल्या तक्रारी आणि त्यांचे स्वरूप याबाबत माहिती घेतली. उपअधीक्षक शिंदे यांनी त्यांना या छेडछाडीबाबत अधिकृत तक्रार पोलिसांकडे येणे गरजेचे आहे. त्याशिवाय संबंधित संशयितांवर कारवाई करता येत नाही, ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आ. पाटील यांनी येथील ग्रामस्थांशी चर्चा करून अधिकृतपणे पोलिसांत फिर्याद देण्याची सूचना केली. तसेच पोलिसांनी याप्रकरणी कसलीही हयगय न करता त्या गावगुंडांवर कठोर कारवाई करावी. जेणेकरून भविष्यात मसुचीवाडीसह परिसरातील मुलींना त्याचा पुन्हा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या. (वार्ताहर)महिला आयोगाच्या अध्यक्षा येणार..!मसुचीवाडी येथील मुलींची छेडछाड आणि त्यातून ग्रामसभेने मुलींना बोरगाव येथे शिकण्यासाठी न पाठवण्याचा केलेला ठराव अशा खळबळजनक घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या मसुचीवाडी गावाला भेट देणार आहेत. पोलिस गुंडगिरी मोडून काढतील : सदाभाऊ खोत४मसुचीवाडीतील मुलींचे छेडछाड प्रकरण अमानवी आणि निषेधार्ह आहे. गावाने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवून या संकटाचा मुकाबला करताना पिडित मुलींच्या कुटुंबाना आधार द्यावा, या तालुक्यातील अनेकांना राज्य व देशपातळीवर नेतृत्व केले आहे. मुली-महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत असताना त्यांची छेडछाड करणारी प्रवृत्ती ठेचून काढायला हवी. गुंडगिरीला लोकाश्रय आणि राजाश्रय मिळता कामा नये. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून, ही गुंडगिरी ते मोडून काढतील, असे स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सांगितले.४बोरगावच्या जि. प. सदस्या सौ. जयश्री जितेंद्र पाटील यांनी मसुचीवाडीच्या महाविद्यालयीन तरुणींवर झालेल्या अन्यायाचा निषेध केला आहे. छेडछाड करणाऱ्या गावगुंडांना पाठीशी घालणाऱ्यास शासन मिळावे. सर्व क्षेत्रात प्रगल्भ असणाऱ्या बोरगावात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वारंवार घडतात. गावातील काही सूज्ञ मंडळींनी सदरचे प्रकरण मिटवले त्यावेळीच या प्रवृत्तीला शासन मिळाले असते, तर हा प्रसंग घडला नसता. अशा प्रकारांना पोलिसांनी वेळीच आवर घालावा अन्यथा अन्यायग्रस्त मुलींसाठी प्रसंगी रस्यावर उतरू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला. विनयभंगाचा गुन्हा दाखलमसुचीवाडी येथील मुलींच्या छेडछाडप्रकरणी रात्री उशिरा एका पिडित मुलीने चौघांविरुध्द फिर्याद दिली आहे. त्यामध्ये रोहित ऊर्फ इंद्रजित प्रकाश खरात (वय २१), सागर प्रकाश खोत (२३), अमोसिध्द ऊर्फ आप्पासाहेब नरसाप्पा बबलेश्वर (२३), राजेंद्र विठ्ठल पवार-तपकिरे (३५, सर्व रा. बोरगाव) यांचा समावेश आहे. या सर्वांविरुध्द पोलिसांनी विनयभंग, छेडछाड व पाठलाग करणे अशा कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील राजेंद्र पवार हा फरारी असून, इतर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. विनयभंगाचा हा प्रकार गेल्या दहा महिन्यांपासून सुरू होता. मात्र याबाबत पिडित मुली, त्यांचे पालक अथवा ग्रामस्थांनी कल्पना दिली नव्हती. पोलिसांनी या प्रकारात क ोणतीही टाळाटाळ केलेली नाही. ग्रामसभेने केलेल्या ठरावातही पोलिसांना या घटनांची माहिती दिली नसल्याचे मान्य केले आहे, असे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.