शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

गटांच्या सामर्थ्याची तिरंगी लढत

By admin | Updated: October 1, 2014 23:59 IST

चौघे अपक्ष रिंगणात : महाडिक, जयंत पाटील गटांची भूमिका निर्णायक

विकास शहा - शिराळा-विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख या तीन पारंपरिक गटांबरोबर निवडणूक रिंगणात नंदकिशोर नीलकंठ (शिवसेना), वैभव वाघमारे (बसपा) या पक्षीय उमेदवारांसह चार अपक्ष उमेदवारही आहेत. अपक्ष उमेदवार सम्राट महाडिक यांनी उमेदवारी मागे घेऊन शिवाजीराव नाईक यांना पाठिंबा देण्याच्या पवित्रा घेतल्याने रंगत आली आहे.या मतदारसंघातील राजकारण १९९५ पासून सतत बदलत आहे. दोन नाईक-देशमुख हे तीन प्रमुख गट प्रत्येकी वेगवेगळ्या भूमिकेतून पाठिंबा व्यक्त करीत होते. २००४ मध्ये तिन्ही गटांचे उमेदवार रिंगणात होते. यावेळीही हे तिन्ही गट एकमेकांसमोर आले आहेत. प्रत्येक निवडणुकीत माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, नानासाहेब महाडिक या गटांच्या भूमिका निर्णायक ठरल्या आहेत. त्यावेळी जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच, असा पवित्रा घेतला होता. मात्र त्यांनी शिवाजीराव नाईक यांना पाठिंबा देण्याचा पवित्रा घेतला आहे. तिन्ही गटांचे नेते महाडिक गटाच्या संपर्कात होते. याबाबत महाडिक गट उद्या, दि. २ आॅक्टोबर रोजी अधिकृत भूमिका स्पष्ट करणार आहे. जयंत पाटील हे मानसिंगराव नाईक यांच्याबरोबर असल्याने वाळवा तालुक्यातील मतदान त्यांना मिळेल, असा दावा त्यांच्या गटाकडून केला जात आहे.आमदार नाईक गेल्या पाच वर्षात ५१७ कोटींची विकासकामे, वाकुर्डे योजना कार्यान्वित, गिरजवडे प्रकल्प कामास सुरुवात, विविध प्रकल्पांची उभारणी या मुद्यांवर निवडणूक लढवीत आहेत. माजी आमदार शिवाजीराव नाईक वाकुर्डे योजना, विविध प्रकल्पांची उभारणी, पाच वर्षातील खुंटलेला विकास हे विषय घेऊन रिंगणात उतरले आहेत. तसेच सत्यजित देशमुख यांनी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केलेली विकासकामे, पक्षीय कामे, गेल्या पाच वर्षात आणलेला विकास निधी यावर भर दिला आहे.२००४ मध्ये दोन नाईक गटात फूट पडली, त्यामुळे मानसिंगराव नाईक पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख बंडखोरी करून रिंगणात होते. त्यामध्ये शिवाजीराव नाईक विजयी झाले होते. या निवडणुकीत तिन्ही गट एकमेकांविरुध्द लढले होते. २००९ मध्ये सत्यजित देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांना पाठिंबा दिला होता. त्यामध्ये शिवाजीराव नाईक पराभूत झाले होते. आता यावेळी पुन्हा तीन गट एकमेकांसमोर आहेत. तसेच तिन्हीही उमेदवार यावेळी पक्षाच्या चिन्हावर लढत आहेत. आमदार नाईक, माजी आमदार नाईक यांनी सहा महिन्यांपासूनच प्रचाराला सुरुवातही केली आहे. तर सत्यजित यांनी आघाडी झाली नाही तर आपल्याला उमेदवारी मिळेल या विचारात प्रचार धिम्या गतीने चालू ठेवला होता. आता त्यांनी प्रचारात वेग घेतला आहे. भाजप-शिवसेना वेगळी झाल्याने याचा फटका या युतीच्या उमेदवारांना बसणार आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीच्या उमेदवारांनाही मतविभागणीचा फटका बसेल. तिन्ही उमेदवार गावेच्या गावे, वस्त्या न वस्त्या, वाड्या न वाड्या पिंजून काढत आहेत. कार्यकर्त्यांची पळवापळव, गेलेले कार्यकर्ते परत आणणे यासाठी प्रमुख नेत्यांची दमछाक होत आहे.शिवसेनेने नंदकिशोर नीलकंठ, बसपने वैभव वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना मिळणारी मते निर्णायक ठरतील. निवडणुकीत या मतदारसंघातील दोन नाईक-देशमुख या तीन गटांची ताकद स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ‘आर या पार’ याप्रमाणे तिन्ही नेते मैदानात आहेत.शिराळाएकूण मतदार २,७४,४२७ नावपक्षमानसिंगराव नाईक राष्ट्रवादीशिवाजीराव नाईकभाजपसत्यजित देशमुखकाँग्रेसनंदकिशोर नीलकंठ शिवसेनावैभव वाघमारेबसपाविश्वजित पवारअपक्षबबनराव परीटअपक्षमोहन ऐतवडेकरअपक्षसंजय जाधवअपक्ष