शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
4
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
5
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
6
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
7
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
8
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
9
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
10
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
11
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
12
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
13
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
14
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
15
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
16
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
17
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
18
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
19
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
20
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...

‘कृष्णा’साठी तिहेरी संघर्ष...

By admin | Updated: April 2, 2015 00:43 IST

कोणाचा झेंडा हाती घ्यायचा? : नेत्यांसह कार्यकर्तेही संभ्रमात

निवास पवार - शिरटे -- यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची प्रत्येक निवडणूक दुरंगी व चुरशीची झाली आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते ठरलेलेच असायचे. मात्र यावेळी चित्र पालटले आहे. मोहिते—भोसले आणि मोहिते असा तिहेरी सामना ‘कृष्णा’च्या राजकीय कुरुक्षेत्रावर रंगणार असल्याने मातब्बर नेत्यांसह कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. कोणत्या नेत्याचा झेंडा हाती घ्यायचा?, असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे.कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वाळवा तालुक्यातील ४२, खानापूर तालुक्यातील तीन, कडेगाव तालुक्यातील २0 व कऱ्हाड तालुक्यातील ६५ गावांचा समावेश आहे. यापूर्वीच्या सर्वच निवडणुकीत दोन्ही गटांनी समावेशक धोरण आखत उमेदवारी दिली होती. गत निवडणुकीत वाळवा तालुक्यातील १0, कडेगाव तालुक्यातील एक हे संस्थापक पॅनेलमधून, तर एक संचालक विरोधी गटातून निवडून आला होता. यामुळे वाळवा तालुक्याची भूमिका निवडणुकीत नेहमीच निर्णायक ठरली आहे.वाळवा तालुक्यात माजी ग्रामविकासमंत्री आमदार जयंत पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेत निवडणुकीतील भूमिका जाहीर केली होती. यावेळच्या निवडणुकीत मात्र पाटील यांचे कार्यकर्ते तिन्ही गटात विभागले जाणार आहेत. त्यामुळे पाटील यांची भूमिका काय राहणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.रयत सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ असणारे शिलेदार सत्तांतरानंतर विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या पहिल्याच विजयी सभेत ‘आम्हीच तुमचे काम केले’, अशी जोरजोराने भाषणे देत होते. यावेळी या कार्यकर्त्यांची काय भूमिका राहील, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते, डॉ. सुरेश भोसले व मदनराव मोहिते—डॉ. इंद्रजित मोहिते अशी तिहेरी लढत यावेळच्या निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे कुंपणावर असणाऱ्या कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. अनेक मातब्बर नेते व कार्यकर्ते, कोणाचा झेंडा घेऊ हाती?, या विचारात आहेत. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसे वातावरणही कमालीचे तापू लागले आहे.सर्वांचीच सावध भूमिकाआजवरचा कारखान्याचा इतिहास पाहता, प्रत्येक निवडणूक चुरशीचीच झाली आहे. गतवेळच्या निवडणुकीत पारंपरिक भोसले-मोहिते विरोधक एकत्र आल्याने ‘कृष्णा’च्या राजकारणाचे संघर्षाचे रंग बदलणार असे वाटत असतानाच, संस्थापकांपैकी एक आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते यांनी पॅनेल उभे करून अक्षरश: चमत्कार घडवून सत्ता हस्तगत केली. गेल्या निवडणुकीतील अनुभव पाहता, यंदा मोहित्यांचे दोन व भोसले असे तीन गट सर्व ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे कार्यकर्तेच नव्हे, तर नेतेमंडळीही अद्याप सावध भूमिकेत दिसत आहेत.