शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

कृषी बाजार समितीचे त्रिभाजन करा

By admin | Updated: November 28, 2014 23:45 IST

मनोहर सारडा : ...अन्यथा एलबीटीविरोधात पुन्हा आंदोलन करणार

सांगली : जत, कवठेमहांकाळ बाजार समित्या आता सक्षम झाल्या असून, सांगली उत्पन्न बाजार समिती आता वेगळी करुन त्याचे त्रिभाजन करण्यात यावे, अशी मागणी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्य्ाक्ष मनोहर सारडा यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकार परिषदेत केली. राज्य शासनाने एलबीटी डिसेंबरअखेर हटवावा, अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांचा समावेश आहे. जत आणि कवठेमहांकाळ समित्या आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे मिरज तालुक्यासाठीची बाजार समिती वेगळी करण्यात यावी. सांगली उत्पन्न बाजार समितीमध्ये आता गोळा होणाऱ्या सेसमध्ये सुमारे ८५ टक्के वाटा हा मिरज तालुक्याचा आहे. त्यामुळे हा निधी आमच्या ठिकाणीच खर्च करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. मिरज तालुक्यामध्ये अनेक व्यापारी, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. त्या मिटल्या पाहिजेत. मोठ्या क्षमतेच्या गोदामाची, कोल्ड स्टोअरेजची गरज आहे. हळद ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे हजारो पोती हळद खराब झाली आहे. याकडे आता लक्ष दिले पाहिजे. या सर्व मागण्यांचे निवेदन आम्ही सहकरामंत्री चंद्रकांत पाटील यांना देणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक आल्यापासून अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. रस्ते, वीजसह नागरी सुविधा उपलब्ध होत आहे. राजकारणविरहीत विकास कामे झाली आहेत. पुढील कामासाठी निधीची गरज आहे. शेतकरी भवन उभारणी, बगीचा, पार्किंग व्यवस्था, वॉचमनची संख्या वाढवावी याचीही मागणी आम्ही सहकारमंत्र्याकडे करणार आहोत. एलबीटी हा कोणत्याही परिस्थितीत विनापर्याय हटवला पाहिजे. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पाळले पाहिजे. करप्रणाली सुटसुटीत हवी. येत्या डिसेंबरअखेर एलबीटी कर हटविला पाहिजे. अन्यथा व्यापारी शिखर परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. (प्रतिनिधी)चार व्यापारी प्रतिनिधी द्याकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या दोन व्यापाऱ्यांना संचालक म्हणून प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. व्यापाराची व्याप्ती पाहता ही संख्या चार करण्यात यावी. यामुळे व्यापारी व शेतकऱ्यांचे योग्य पध्दतीने प्रतिनिधीत्व होईल, अशी मागणीही यावेळी सारडा यांनी केली.