शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

पळशीतील तिहेरी खून खटल्याची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 21:23 IST

बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्या पळशी (ता. खानापूर) येथील सासरकडील तीन महिलांचा गळा चिरून झालेल्या खून खटल्याच्या सुनावणीस गुरुवारी जिल्हा न्यायालयात प्रारंभ झाला.

सांगली, दि. 14 - बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्या पळशी (ता. खानापूर) येथील सासरकडील तीन महिलांचा गळा चिरून झालेल्या खून खटल्याच्या सुनावणीस गुरुवारी जिल्हा न्यायालयात प्रारंभ झाला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. ते सुनावणीला हजर राहिले. दोषारोपत्रात बदल करणार असल्याचा अर्ज त्यांनी न्यायालयात दिल्याने पुढील सुनावणी १० आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.सुधीर सदाशिव घोरपडे, रवींद्र रामचंद्र कदम (रा. भूड, ता. खानापूर) व एक अल्पवयीन अशा तिघांविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात तीन महिलांचा खून केल्याचा गुन्हा नोंद आहे. सुधीर घोरपडे याच्या बहीण विद्याराणी हिचा विवाह पळशीतील बाळासाहेब ब्रम्हदेव शिंदे यांचा मुलगा बळवंतशी झाला होता. कौटुंबिक कलहातून २००९ मध्ये विद्याराणीने विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येस सासरे बाळासाहेब शिंदे व घरातील अन्य लोकांनी प्रवृत्त केल्याचा संशय सुधीर घोरपडे याला होता. या घटनेपासून तो शिंदे कुटूंबावर चिडून होता. यातून त्याने मित्र रवींद्र कदम व एक अल्पवयीन यांच्या मदतीने २१ जून २०१५ रोजी पळशीतील शिंदे वस्तीवर जाऊन ब्रम्हदेव शिंदे यांची आई प्रभावती शिंदे, बहिन सुनीता संजय पाटील व पत्नी निशिगंधा शिंदे यांच्या चाकूने गळा चिरुन खून केला होता.सरकार पक्षातर्फे या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्त करण्यात आहे. संशयितातर्फे सांगलीतील अ‍ॅड. प्रमोद सुतार काम पाहत आहेत. गुरुवारी खून खटल्यास प्रारंभ झाला. अ‍ॅड. निकम उपस्थित होते. त्यांनी दोषारोपपत्रामध्ये बदल करणार असल्याने सांगून तसा अर्जही सादर केला. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी १८ आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. भरदिवसा घरात घुसून झालेल्या या तिहेरी खून प्रकरणामुळे जिल्हा हादरला होता. विटा पोलिसांनी दोन दिवसात याचा छडा लाऊन संशयितांना अटक केली होती. गुलबर्ग्यातून चाकू खरेदीसंशयितांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथे जाऊन खुनाचा कट रचला. ब्रम्हदेव शिंदे याच्या घरात कोणी सापडेल, त्याला संपवायचे, असा निर्णय घेतला होता. तेथील एका लॉजवर त्यांनी मुक्काम केला होता. तिथेच त्यांनी तीन चाकू खरेदी केले. पळतील शिंदे वस्तीवर पाणी मागण्याचा बहाणा करुन तिघांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर तीन महिलांचा खून केला होता.