शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

पळशीतील तिहेरी खून खटल्याची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 21:23 IST

बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्या पळशी (ता. खानापूर) येथील सासरकडील तीन महिलांचा गळा चिरून झालेल्या खून खटल्याच्या सुनावणीस गुरुवारी जिल्हा न्यायालयात प्रारंभ झाला.

सांगली, दि. 14 - बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्या पळशी (ता. खानापूर) येथील सासरकडील तीन महिलांचा गळा चिरून झालेल्या खून खटल्याच्या सुनावणीस गुरुवारी जिल्हा न्यायालयात प्रारंभ झाला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. ते सुनावणीला हजर राहिले. दोषारोपत्रात बदल करणार असल्याचा अर्ज त्यांनी न्यायालयात दिल्याने पुढील सुनावणी १० आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.सुधीर सदाशिव घोरपडे, रवींद्र रामचंद्र कदम (रा. भूड, ता. खानापूर) व एक अल्पवयीन अशा तिघांविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात तीन महिलांचा खून केल्याचा गुन्हा नोंद आहे. सुधीर घोरपडे याच्या बहीण विद्याराणी हिचा विवाह पळशीतील बाळासाहेब ब्रम्हदेव शिंदे यांचा मुलगा बळवंतशी झाला होता. कौटुंबिक कलहातून २००९ मध्ये विद्याराणीने विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येस सासरे बाळासाहेब शिंदे व घरातील अन्य लोकांनी प्रवृत्त केल्याचा संशय सुधीर घोरपडे याला होता. या घटनेपासून तो शिंदे कुटूंबावर चिडून होता. यातून त्याने मित्र रवींद्र कदम व एक अल्पवयीन यांच्या मदतीने २१ जून २०१५ रोजी पळशीतील शिंदे वस्तीवर जाऊन ब्रम्हदेव शिंदे यांची आई प्रभावती शिंदे, बहिन सुनीता संजय पाटील व पत्नी निशिगंधा शिंदे यांच्या चाकूने गळा चिरुन खून केला होता.सरकार पक्षातर्फे या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्त करण्यात आहे. संशयितातर्फे सांगलीतील अ‍ॅड. प्रमोद सुतार काम पाहत आहेत. गुरुवारी खून खटल्यास प्रारंभ झाला. अ‍ॅड. निकम उपस्थित होते. त्यांनी दोषारोपपत्रामध्ये बदल करणार असल्याने सांगून तसा अर्जही सादर केला. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी १८ आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. भरदिवसा घरात घुसून झालेल्या या तिहेरी खून प्रकरणामुळे जिल्हा हादरला होता. विटा पोलिसांनी दोन दिवसात याचा छडा लाऊन संशयितांना अटक केली होती. गुलबर्ग्यातून चाकू खरेदीसंशयितांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथे जाऊन खुनाचा कट रचला. ब्रम्हदेव शिंदे याच्या घरात कोणी सापडेल, त्याला संपवायचे, असा निर्णय घेतला होता. तेथील एका लॉजवर त्यांनी मुक्काम केला होता. तिथेच त्यांनी तीन चाकू खरेदी केले. पळतील शिंदे वस्तीवर पाणी मागण्याचा बहाणा करुन तिघांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर तीन महिलांचा खून केला होता.