शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

दोन्ही काँग्रेसकडून स्वबळाची तालीम

By admin | Updated: October 24, 2016 00:15 IST

विधानपरिषद निवडणूक : आघाडीचे सूर बिघडले

सांगली : आघाडीच्या माध्यमातून एकहाती सांगली-सातारा विधानपरिषदेचे मैदान मारण्याचे दोन्ही काँग्रेसचे मनसुबे उधळले गेले आहेत. राष्ट्रवादीने मतदार संघातील ताकदीच्या जोरावर जागेचा दावा सोडला नाही, तर काँग्रेसने राष्ट्रवादीपेक्षा कमी संख्याबळ असतानाही, स्वबळाचा नारा देऊन मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेस सध्या आमने-सामने दिसत आहेत. शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांच्या आग्रहानुसार ही जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ पातळीवर आघाडीची चर्चा यशस्वी होईल, अशी आशा राष्ट्रवादीला होती. मात्र काँग्रेस नेत्यांनी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू न ठेवता, थेट अट घालून स्वबळाचा इशारा दिला. सांगली-साताऱ्याची जागा यंदा आम्हाला मिळाली नाही, तर काँग्रेस स्वत:च्या ताकदीवर मैदानात उतरेल, असे स्पष्ट केल्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादीची ताकद अन्य कोणत्याही पक्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही जागा जिंकण्याची सर्वाधिक खात्री राष्ट्रवादी नेत्यांना वाटते. ताकद असूनही राष्ट्रवादीला तुल्यबळ उमेदवारीमुळे धाकधुकही वाटत आहे. पक्षीय ताकदीच्या गणितावर विधानपरिषदेची निवडणूक लढविली जात नसल्याची चांगली जाणीव राष्ट्रवादी नेत्यांना आहे. नानासाहेब महाडिक यांनी स्वत:च्या ताकदीवर खेचलेली भरमसाट मते, हे त्याचेच उदाहरण आहे. महाडिक ज्या गोष्टी करू शकतात, त्या गोष्टी त्यांच्यासारखाच अन्य तुल्यबळ उमेदवारही करू शकतो, याचीही कल्पना राष्ट्रवादीला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ही जागा लढविण्यासाठी कंबर कसली आहे. बैठकांवर बैठका सुरू असताना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापासूनच काँग्रेसला चितपट करण्याची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी) बैठक : औपचारिक ताएकूणच विधानपरिषदेच्या या जागेवर दोन्ही काँग्रेस आमने- सामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. २६ आॅक्टोबर रोजी आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे. तरीही काँग्रेसची स्वबळाची भूमिका जाहीर झाल्यामुळे चर्चेतून फारसे काही निष्पन्न होण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेस नेते म्हणतात... ४काँग्रेस गतवेळी आघाडीतर्फे राष्ट्रवादीला जागा दिल्याने यंदा ती काँग्रेसला मिळायला हवी ४संख्याबळावर जागा वाटपाचे गणित ठरलेच नव्हते ४तुल्यबळ उमेदवार असल्याने जिंकण्याची खात्री ४उमेदवारी सांगलीला मिळायला हवी ४राष्ट्रवादीकडूनच आघाडीचे संकेत पाळले जात नाहीत