शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

दोन्ही काँग्रेसकडून स्वबळाची तालीम

By admin | Updated: October 24, 2016 00:15 IST

विधानपरिषद निवडणूक : आघाडीचे सूर बिघडले

सांगली : आघाडीच्या माध्यमातून एकहाती सांगली-सातारा विधानपरिषदेचे मैदान मारण्याचे दोन्ही काँग्रेसचे मनसुबे उधळले गेले आहेत. राष्ट्रवादीने मतदार संघातील ताकदीच्या जोरावर जागेचा दावा सोडला नाही, तर काँग्रेसने राष्ट्रवादीपेक्षा कमी संख्याबळ असतानाही, स्वबळाचा नारा देऊन मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेस सध्या आमने-सामने दिसत आहेत. शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांच्या आग्रहानुसार ही जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ पातळीवर आघाडीची चर्चा यशस्वी होईल, अशी आशा राष्ट्रवादीला होती. मात्र काँग्रेस नेत्यांनी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू न ठेवता, थेट अट घालून स्वबळाचा इशारा दिला. सांगली-साताऱ्याची जागा यंदा आम्हाला मिळाली नाही, तर काँग्रेस स्वत:च्या ताकदीवर मैदानात उतरेल, असे स्पष्ट केल्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादीची ताकद अन्य कोणत्याही पक्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही जागा जिंकण्याची सर्वाधिक खात्री राष्ट्रवादी नेत्यांना वाटते. ताकद असूनही राष्ट्रवादीला तुल्यबळ उमेदवारीमुळे धाकधुकही वाटत आहे. पक्षीय ताकदीच्या गणितावर विधानपरिषदेची निवडणूक लढविली जात नसल्याची चांगली जाणीव राष्ट्रवादी नेत्यांना आहे. नानासाहेब महाडिक यांनी स्वत:च्या ताकदीवर खेचलेली भरमसाट मते, हे त्याचेच उदाहरण आहे. महाडिक ज्या गोष्टी करू शकतात, त्या गोष्टी त्यांच्यासारखाच अन्य तुल्यबळ उमेदवारही करू शकतो, याचीही कल्पना राष्ट्रवादीला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ही जागा लढविण्यासाठी कंबर कसली आहे. बैठकांवर बैठका सुरू असताना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापासूनच काँग्रेसला चितपट करण्याची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी) बैठक : औपचारिक ताएकूणच विधानपरिषदेच्या या जागेवर दोन्ही काँग्रेस आमने- सामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. २६ आॅक्टोबर रोजी आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे. तरीही काँग्रेसची स्वबळाची भूमिका जाहीर झाल्यामुळे चर्चेतून फारसे काही निष्पन्न होण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेस नेते म्हणतात... ४काँग्रेस गतवेळी आघाडीतर्फे राष्ट्रवादीला जागा दिल्याने यंदा ती काँग्रेसला मिळायला हवी ४संख्याबळावर जागा वाटपाचे गणित ठरलेच नव्हते ४तुल्यबळ उमेदवार असल्याने जिंकण्याची खात्री ४उमेदवारी सांगलीला मिळायला हवी ४राष्ट्रवादीकडूनच आघाडीचे संकेत पाळले जात नाहीत