शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

दोन्ही काँग्रेसकडून स्वबळाची तालीम

By admin | Updated: October 24, 2016 00:15 IST

विधानपरिषद निवडणूक : आघाडीचे सूर बिघडले

सांगली : आघाडीच्या माध्यमातून एकहाती सांगली-सातारा विधानपरिषदेचे मैदान मारण्याचे दोन्ही काँग्रेसचे मनसुबे उधळले गेले आहेत. राष्ट्रवादीने मतदार संघातील ताकदीच्या जोरावर जागेचा दावा सोडला नाही, तर काँग्रेसने राष्ट्रवादीपेक्षा कमी संख्याबळ असतानाही, स्वबळाचा नारा देऊन मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेस सध्या आमने-सामने दिसत आहेत. शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांच्या आग्रहानुसार ही जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ पातळीवर आघाडीची चर्चा यशस्वी होईल, अशी आशा राष्ट्रवादीला होती. मात्र काँग्रेस नेत्यांनी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू न ठेवता, थेट अट घालून स्वबळाचा इशारा दिला. सांगली-साताऱ्याची जागा यंदा आम्हाला मिळाली नाही, तर काँग्रेस स्वत:च्या ताकदीवर मैदानात उतरेल, असे स्पष्ट केल्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादीची ताकद अन्य कोणत्याही पक्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही जागा जिंकण्याची सर्वाधिक खात्री राष्ट्रवादी नेत्यांना वाटते. ताकद असूनही राष्ट्रवादीला तुल्यबळ उमेदवारीमुळे धाकधुकही वाटत आहे. पक्षीय ताकदीच्या गणितावर विधानपरिषदेची निवडणूक लढविली जात नसल्याची चांगली जाणीव राष्ट्रवादी नेत्यांना आहे. नानासाहेब महाडिक यांनी स्वत:च्या ताकदीवर खेचलेली भरमसाट मते, हे त्याचेच उदाहरण आहे. महाडिक ज्या गोष्टी करू शकतात, त्या गोष्टी त्यांच्यासारखाच अन्य तुल्यबळ उमेदवारही करू शकतो, याचीही कल्पना राष्ट्रवादीला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ही जागा लढविण्यासाठी कंबर कसली आहे. बैठकांवर बैठका सुरू असताना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापासूनच काँग्रेसला चितपट करण्याची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी) बैठक : औपचारिक ताएकूणच विधानपरिषदेच्या या जागेवर दोन्ही काँग्रेस आमने- सामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. २६ आॅक्टोबर रोजी आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे. तरीही काँग्रेसची स्वबळाची भूमिका जाहीर झाल्यामुळे चर्चेतून फारसे काही निष्पन्न होण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेस नेते म्हणतात... ४काँग्रेस गतवेळी आघाडीतर्फे राष्ट्रवादीला जागा दिल्याने यंदा ती काँग्रेसला मिळायला हवी ४संख्याबळावर जागा वाटपाचे गणित ठरलेच नव्हते ४तुल्यबळ उमेदवार असल्याने जिंकण्याची खात्री ४उमेदवारी सांगलीला मिळायला हवी ४राष्ट्रवादीकडूनच आघाडीचे संकेत पाळले जात नाहीत