शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘झोळंबी’तील सौंदर्यापासून पर्यटक वंचित

By admin | Updated: December 1, 2014 00:04 IST

चांदोली अभयारण्य : निसर्गाच्या अवकृपेमुळे पुष्पप्रेमींची निराशा

कोकरूड : सध्या शिराळा तालुक्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यानला अनेक पर्यटक भेट देत आहेत. कास पठाराप्रमाणे झोळंबी परिसरात फुलणाऱ्या विविध फुलांचे मनोहारी दृश्य पहायला मिळेल म्हणून भटकंती करत आहेत. मात्र त्यांची घोर निराशा होत आहे. निसर्गाच्या अवकृपेने यंदा विविध फुले फुललेली नाहीत. निसर्ग हा एक जादूगार आहे. याची प्रचिती चांदोली राष्ट्रीय उद्यान पाहिल्यावर आल्यावाचून रहात नाही. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, हिरवीगार वनराई, भर उन्हात गारवा देणारा वसंतसागर जलाशय यामुळे अनेक पर्यटक चांदोलीला दररोज भेट देऊन निसर्गाने केलेल्या मुक्त उधळणीचा आनंद घेतात.दर पावसाळ्यात हे उद्यान ४ महिने पर्यटकांसाठी बंद असते. याच कालावधित म्हणजे सप्टेंबर ते आॅक्टोबरमध्ये उद्यानातील झोळंबी परिसरात कास पठराप्रमाणे स्मिथीया, सदाफुली, सोनकी, मंजिरी, नीलिमा, अबोलीमा, सिटीचे अश्रू, धनगरी फेटा अशा अनेक जातींची फुले फुलतात. हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं इतकं विलोभनीय असतं.मात्र उद्यान बंद असल्यामुळे या सौंदर्याला पाहण्यापासून पर्यटक वंचित राहतो. केवळ १५ ते ३० दिवसच या फुलांचा हंगाम असतो. उद्यान ४ महिन्यांनी सुरू झाल्यानंतरही दृश्य पहायला मिळत नाही. पर्यटकांना या सौंदर्याचा आनंद घेता यावा म्हणून या वर्षापासून वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन पावसाळ्यातही उद्यान पर्यटकांसाठी खुले ठेवले. अनेक पर्यटक हा सडा पाहण्याच्या उद्देशाने चांदोलीत आले; मात्र त्यांची यंदा घोर निराशा झाली. आता सड्यावरील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांना पुढच्या वर्षाची वाट पहावी लागणार आहे. (वार्ताहर)