शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पर्यटन दिन विशेष: सांगली जिल्ह्यात पर्यटनाचा बोऱ्या, नागरिकांच्या देश-विदेश वाऱ्या

By अविनाश कोळी | Updated: September 27, 2023 16:51 IST

सह्याद्री पर्वतरांगेचा झालेला स्पर्श, जैवविविधतेने समृद्ध असलेले जंगल, हिरवाईने नटलेले डोंगर, बारमाही वाहणाऱ्या नद्या, महापुरुषांच्या स्मारकांचा समृद्ध वारसा जिल्ह्याला लाभला

अविनाश कोळीसांगली : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांबाबत नाके मुरडून स्थानिक नागरिक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर देश-विदेशात फिरायला जात आहेत. कोरोनानंतर पर्यटनाला पसंती देणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यात बाहेरून पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या अत्यंत तुरळक आहे. जिल्ह्यात प्रत्येकवर्षी एका पर्यटनस्थळावर सरासरी केवळ ५ हजार ७४० रुपये खर्च होत आहेत.सह्याद्री पर्वतरांगेचा झालेला स्पर्श, जैवविविधतेने समृद्ध असलेले जंगल, हिरवाईने नटलेले डोंगर, बारमाही वाहणाऱ्या नद्या, नद्यांची संगमस्थळे या माध्यमातून निसर्गाने मुक्तपणे दिलेले दान तसेच साहित्यिक, कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, महापुरुषांच्या स्मारकांचा समृद्ध वारसा जिल्ह्याला लाभला आहे. तरीही पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा विकास करण्याकडे ना राजकीय नेत्यांचे लक्ष आहे ना प्रशासकीय अधिकाऱ्यांचे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर एकूण २ कोटी ८४ लाख रुपये खर्च झाले. प्रती पर्यटनस्थळ हा खर्च केवळ ५ हजार ७४० रुपये आहे.

तालुकानिहाय पर्यटनस्थळेशिराळा ८वाळवा ५पलूस ४कडेगाव ४खानापूर ४आटपाडी २तासगाव ४मिरज १०क. महांकाळ ४जत   ५एकूण - ५०

केवळ ‘क’ दर्जाची पर्यटनस्थळेराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनस्थळांचा अ वर्गात, राज्य स्तरावरील स्थळांचा ब वर्गात, जिल्हा स्तरावरील स्थळांचा क वर्गात तर स्थानिक स्तरावरील पर्यटनस्थळांचा ड वर्गात समावेश होतो. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पर्यटनस्थळे क वर्गात मोडतात.

दरवर्षी ४५०० लोक जातात देश, विदेशातजिल्ह्यातून दरवर्षी सुमारे ४ हजार ५०० लोक देशांतर्गत व परदेशातील पर्यटनास जातात. यातही परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के असल्याचे ट्रॅव्हल्स् कंपनीचालकांनी सांगितले.

जिल्ह्यात पाहण्यासारखे कायचांदोली अभयारण्य, दंडोबा, सागरेश्वर अभयारण्य आदी महत्त्वाची पर्यटनस्थळे असली तरी त्यांच्या विकासाबाबत उदासीनता दिसून येते. जिल्ह्याच्या संकेतस्थळावरही चारही पर्यटनस्थळांचा उल्लेख आहे.

निसर्गाने जिल्ह्याला खूप काही दिले, मात्र पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याचा विकास झाला नाही. शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन विकास होतो, मग सांगलीबाबत उदासिनता का?  - प्रदीप सुतार, पर्यटनप्रेमी 

कोरोनानंतर पर्यटनास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. देशांतर्गत पर्यटनस्थळांना भेटी देतानाच परदेशात व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया याठिकाणी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. - मंगेश शहा, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स् व्यावसायिक

टॅग्स :Sangliसांगलीtourismपर्यटन