शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’च्या निवडीवरून नाराजीचा सूर

By admin | Updated: August 29, 2016 23:17 IST

महापालिकेत राजकारण रंगले : नेत्यांच्या आदेशाकडे नगरसेवकांसह इच्छुकांचे लक्ष

सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीत वर्णी लागावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांत खलबते सुरू आहेत. इच्छुकांनी नेत्यांना साकडे घातले आहे. आता नेतेमंडळी काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. प्रतिस्पर्धी इच्छुकांचे पंख छाटण्याचीही व्यूहरचना आखली जात आहे. गेल्या तीन वर्षात कोणतेच पद पदरात न पडलेल्या इच्छुकांनी, आता नाही तर कधीच नाही म्हणत, स्थायी समितीत जाण्यासाठी कंबर कसली आहे. त्यात नेत्यांच्या मर्जीतील इच्छुकांनी आपलीच वर्णी लागणार, असा दावा केल्याने इतर सदस्यांत नाराजीचा सूर उमटत आहे. महापालिकेच्या अर्थपूर्ण व्यवहाराची जबाबदारी असलेल्या स्थायी समितीत जाण्यासाठी यंदा नगरसेवकांची मोठी रांग लागली आहे. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीतून आठ नवे सदस्य स्थायी समितीत जातील. १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासभेत त्याचा फैसला होणार आहे. त्या त्या पक्षाचे गटनेते बंद लिफाफ्यातून सदस्यांची नावे महापौर हारूण शिकलगार यांच्याकडे देणार आहेत. या बंद लिफाफ्यात आपलेच नाव असावे, यासाठी इच्छुकांची धडपड सुरू झाली आहे. काँग्रेसमधून तीन सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. विद्यमान सदस्य दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे यांनीही सदस्यपदासह सभापती पदावरही दावा केला आहे. गुंठेवारी समितीच्या सभापती शालन चव्हाण, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, अतहर नायकवडी, निरंजन नायकवडी, बबीता मेंढे, गटनेते किशोर जामदार, किशोर लाटणे अशी लांबच लांब यादी आहे. काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम यांनी दोन दिवसांपूर्वी सदस्य निवडीबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नव्या सदस्यांना स्थायी समितीत संधी दिली जाईल, असे जाहीर केल्याने दिग्गज नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात नगरसेविका प्रियंका बंडगर, अंजना कुंडले, संगीता हारगे, प्रार्थना मदभावीकर या चार जणांना गेल्या तीन वर्षात कोणत्याच पदाची संधी मिळालेली नाही. उर्वरित नगरसेवकांना स्थायी समिती, प्रभाग सभापती अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या चार नगरसेवकांची प्रबळ दावेदारी आहे. त्यापैकी किमान दोन जणींना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्वाभिमानी आघाडीतही सारेच आलबेल राहिलेले नाही. गटनेते शिवराज बोळाज हेच इच्छुक असल्याने इतर सदस्यांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. गेली तीन वर्षे गटनेतेपद असताना, पुन्हा स्थायी समितीत कशाला संधी हवी, असा सवाल केला जात आहे. पण स्वाभिमानीच्या नेत्यांची मर्जी बोळाज यांच्यावर असल्याने त्यांनाच संधी मिळेल, अशी शक्यता दिसते. बाळासाहेब गोंधळी, अश्विनी खंडागळे हेही इच्छुक आहेत. सहयोगी सदस्या सुनीता पाटील यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभिमानीत अंतर्गत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)जयश्रीतार्इंचा निर्णय : सर्वांसाठी अंतिमकाँग्रेसच्या तीन सदस्य निवडीचे अधिकार जयश्रीताई पाटील व आमदार पतंगराव कदम यांच्याकडे असले तरी अंतिम निर्णय मात्र जयश्रीताई पाटील याच घेणार आहेत. गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी काँग्रेसला उपमहापौर गटाची मोठी डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे स्थायीत उपमहापौर गटातील कोणालाही संधी मिळणार नाही, हे उघड आहे. बुधवारी जयश्रीताई काँग्रेस पदाधिकारी व प्रमुख नगरसेवकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर त्या गटनेते किशोर जामदार यांच्याकडे तीन सदस्यांची नावे देतील, असे काँग्रेस सूत्रांकडून सांगण्यात आले.