शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

ऐन उन्हाळ्यात टोमॅटोचे आव्हान पेलले !

By admin | Updated: April 5, 2017 23:24 IST

शेतकऱ्यांसमोर आव्हान : वाढती उष्णता, नैसर्गिक आपत्तीचा करावा लागणार सामना; दलालांवरच शेतकरी अवलंबून

शंकर पोळ ल्ल कोपर्डे हवेलीकमी अवधीत जादा पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी टोमॅटोचे पीक घेतात. सध्या उन्हाळी हंगामातील टोमॅटोच्या लागणीस प्रारंभ झाला आहे. वाढत्या तापमानामुळे टोमॅटोच्या बागा जगवण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे.टोमॅटो उत्पादक शेतकरी तिन्ही हंगामांत टोमॅटोचे पीक घेतात. दोन्ही हंगामांच्या तुलनेत उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना जादा दर मिळाला आहे; पण पीक चांगले आणण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. रोगाचे प्रमाण आणि नैसर्गिक संकटाचा सामना उन्हाळी हंगामात जास्त असतो. हा हंगाम धोक्याचा ठरत असताना अनेक शेतकऱ्यांना तो फायद्याचाही ठरला आहे. अलीकडच्या काही वर्षांत फायद्यापेक्षा टोमॅटो तोट्याचाच ठरला आहे; पण दर मिळेल या आशेवर अनेक शेतकरी टोमॅटोच्या लागणी करत असतात. अलीकडच्या काही वर्षांत उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अतिरिक्त उत्पादन होत असल्याने टोमॅटोची शेती तोट्यात गेली आहे. तरीही शेतकरी धाडसाने आशेवर उत्पादन घेत असतात. तीन महिन्यांत निघणारे आणि वजनी असलेल्या टोमॅटोच्या पिकाने कुणाला लखपती केले आहे तर कुणाला कर्जात लोटले आहे. त्यामुळे काहींनी टोमॅटोच्या शेतीला फाटा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करू लागले आहेत. त्यामध्ये मलचिंग पेपरचा वापर, ठिबक सिंचन आदींसह नवनवीन बियाण्यांचा वापर करत आहेत. काही शेतकरी पोट सरीने पिकाला पाणी देत आहेत. अरली तसेच अन्य भरपूर उत्पादन देणाऱ्या वेगवेगळ्या जातीच्या रोपांची व रोगप्रतिकारक शक्ती जास्त असणाऱ्या वाणांची शेतकरी लागण करत आहेत. अडीच फूट सरीपासून साडेचार फूट सरीत लागणी सुरू आहेत. सरासरी एकरी एका लाखापर्यंत उत्पादन खर्च येत आहे.गतवर्षी टोमॅटोला सर्वात जास्त दर आॅगस्ट महिन्यात मिळाला होता. दहा किलोचा मुंबई मार्केटचा सहाशे दहा रुपये होता. नंतरच्या काही दिवसांत दर पडल्याने शेतकऱ्यांनी तोडे थांबविले होते. सध्या दहा किलोचा दर दीडशे ते दोनशे रुपये आहे. तरी हा दर उत्पादन खर्चाचा विचार केल्यास परवडत नाही. अडीचशे रुपये दर मिळाल्यास टोमॅटोची शेती काही प्रमाणात परवडते. उन्हाळी हंगामातील टोमॅटोचे पीक आणणे शेतकऱ्यांपुढे आव्हान असते. सध्या टोमॅटोच्या लागणीस गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. नैसर्गिक आपत्ती; रोगाचाही प्रादुर्भावउन्हाळी हंगामात टोमॅटो पिकावर करपा, आकसा, काळा ठिपका, पान आळी आदी रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यातून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार औषध फवारणी करावी लागते. तसेच गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस व वाढत्या उष्णतेपासूनही पिकाचे संरक्षण करावे लागते.टोमॅटोचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी काळानुसार बदल स्वीकारले आहेत. तोडा केल्यानंतर टोमॅटो साठविण्यासाठी पूर्वी लाकडी पेट्या, करंडे, कागदी बॉक्सचा वापर केला जायचा. त्यातूनच टोमॅटो विक्रीसाठी पाठवले जायचे. मात्र, सध्या कॅरेटचा वापर केला जात आहे. चार ते पाच रुपये दराने शेतकरी भाडेतत्त्वावर कॅरेट घेत आहेत. टोमॅटोला मुंबईसह कोल्हापूर, पुणे, अहमदाबाद, बेळगाव, कऱ्हाड, चिपळूण, पणवेल येथे बाजारपेठ उपलब्ध आहे. मात्र, विभागातील बहुतांश शेतकरी सध्या मुंबई बाजारपेठेतच टोमॅटो विक्रीसाठी पाठवतात. टोमॅटोचा दर दलालांवर अवलंबून असतो. दलालांवरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. तसेच जादा उत्पादन झाले तर त्याचा परिणाम दरावर होत असतो.