शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

टोलची याचिका शुक्रवारी दाखल होणार

By admin | Updated: August 12, 2015 23:27 IST

नाक्यावर ‘वॉच’ कायम : कृती समिती-‘सार्वजनिक बांधकाम’च्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा

सांगली : सांगलीतील टोलविरोधातील शासनाची याचिका येत्या शुक्रवारी दाखल होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कृती समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सक्षमपणे शासनाने उच्च न्यायालयात नागरिकांची बाजू मांडावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, सांगलीवाडी येथील नाक्यावर समितीचे कार्यकर्ते ‘वॉच’ ठेवून आहेत. सांगलीतील टोलचा प्रश्न पुन्हा जिवंत झाला आहे. टोल बंद करण्याबाबत २0१३ मध्ये सर्वपक्षीय आंदोलनाला सुरुवात झाली. टोल नाक्यावर हल्लाही करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी हाकलून लावले होते. हे आंदोलन पेटले असतानाच शासनस्तरावर दबाव वाढल्याने २९ जानेवारी २0१४ रोजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी हा टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा हा टोल सुरू होऊ शकला नाही. प्रकल्पाच्या वाढीव किमतीचा दावा कंपनीने केल्यानंतर नियुक्त लवादाने कंपनीला १६ वर्षे टोल वसुलीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा न्यायालयाने कंपनीच्या दरखास्तीवर यापूर्वीच्या निकालाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याने टोलविरोधात पुन्हा कृती समिती एकवटली आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या चार दिवसांपासून टोलनाक्यावर पहारा सुरू केला आहे. कोणत्याही परिस्थितीत टोल सुरू होऊ न देण्याची त्यांची भूमिका आहे. शासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तसेच कंपनीची देणी भागवून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. याचिका सोमवारीच दाखल करण्याचा शासनाचा बेत होता, मात्र कागदोपत्री तयारी पूर्ण झाली नाही. याच गोष्टीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेजाळ यांची भेट घेतली. याचिका दाखल करण्यासंदर्भात शासनाने काय तयारी केली आहे, याबाबत माहिती घेण्यात आली. यावेळी निमंत्रक सतीश साखळकर, प्रशांत मजलेकर, अजिंक्य पाटील, रवींद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी टोल वसुलीच्या फ्लो चार्टबाबतही विचारणा झाली. फ्लो चार्ट सादर केल्याची माहिती चुकीची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तातडीने निर्णय घेण्याची मागणीकृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर म्हणाले की, कोणत्याही मार्गाने कंपनीला पैसे दिले तरी ते पैसे जनतेच्या खिशातूनच जाणार आहेत. कररुपाने गोळा केलेल्या पैशातूनच ते पैसे भागविले जाणार आहेत. त्यामुळे शासनाने भरपाईबाबत निर्णय घेताना कंपनीच्या मागणीप्रमाणे २३ टक्केप्रमाणे व्याज देऊ नये. रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित दरानुसार वाढीव खर्चावरील व्याज द्यावे. जनतेचा हा पैसा असल्याने शासनाने त्याबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा. राज्यातील अन्य छोटे टोल ज्यापद्धतीने शासनाने भरपाई सोसून बंद केले, त्याचपद्धतीने सांगलीचा टोलही बंद करण्यात यावा. हालचालींवर नजर...टोल नाक्यावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांची हजेरी सुरू असल्याने कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रात्रं-दिवस नाक्यावर ‘वॉच’ ठेवला आहे. बुधवारीही समितीचे कार्यकर्ते नाक्यावरच्या हालचालींचा आढावा घेत होते. कंपनीनेही वसुलीबाबत सध्या सावध भूमिका घेतली आहे. तरीही कर्मचारी नाक्यावर येऊ लागल्याने कृती समितीच्या कार्यकर्त्यांनीही पहारा सुरू केला आहे.