शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

सांगलीत आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन : मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:38 IST

राज्य सरकारने घोषित केलेली मेगा भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा समाजाने कधीही केली नव्हती. मात्र, राज्यातील मराठा समाज व इतर समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी

ठळक मुद्देमेगा भरतीला मराठा समाजाचा विरोध नाही; नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फसवे

सांगली : राज्य सरकारने घोषित केलेली मेगा भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा समाजाने कधीही केली नव्हती. मात्र, राज्यातील मराठा समाज व इतर समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही स्थगिती देऊन मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही फसवे असल्यानेच मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज, मंगळवारपासून सांगलीत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.त्यांनी सांगितले की, संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना, राज्य सरकार जाणून-बुजून आरक्षणाचा मुद्दा लांबणीवर टाकत आहे. अनेक तरुणही आत्महत्या करू लागल्याने या आंदोलनाने गंभीर रूप घेतले आहे. समाजातील तरुणांना आमचे सांगणे आहे की, आरक्षण हे आपल्या हक्काचे आहे. त्यासाठी कोणीही आपला जीव देऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांवरही अनेक संकटे आली; मात्र त्यांनीही धिराने तोंड देत संकटांचा सामना केला.मुख्यमंत्र्यांनी रविवारी मेगा भरतीला स्थगिती देत राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात मेगा भरती रद्द करावी अथवा स्थगिती द्यावी, अशी कोणतीही मागणी मराठा समाजाने केली नव्हती. तरीही ही स्थगिती देऊन मुख्यमंत्र्यांनी रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळेच येत्या नोव्हेंबरपर्यंत आरक्षण देण्याची त्यांची घोषणाही फसवी असल्यानेच आता तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे.मंगळवारी सांगलीतील स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात होईल. सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. दहा हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करावे.यावेळी डॉ. संजय पाटील, विलास देसाई, प्रवीण पाटील, अ‍ॅड. अमित शिंदे, चंद्रकांत डिगे, नानासाहेब कदम, संकेत परब, अनिकेत परब, राहुल पाटील, श्रीरंग पाटील, योगेश पाटील, नाना हलवाई, सौरभ भोसले, राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.'मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोणतेही हिंसक आंदोलन करण्यात येणार नाही, असे संयोजकांनी स्पष्ट केले. ठिय्या आंदोलन अहिंसात्मक मार्गाने करण्यात येणार असून, कोणीही सरकारी कार्यालयांची मोडतोड, एसटी बसेसची तोडफोड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSangliसांगली