शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

तिळगंगेत टायर बंधारा

By admin | Updated: March 31, 2017 23:05 IST

राज्यातील पहिला प्रयोग : दोन महिन्यात काम पूर्ण होणार

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा नदीचे (ओढा) गतवर्षी लोकसहभागातून पुनरुज्जीवन करून पात्राची स्वच्छता करण्यात आली होती. पहिल्याच पावसात या नदीचे पात्र दुथडी भरुन वाहिले होते. परंतु सर्व पाणी वाहून गेले. त्यामुळे या पाण्याचा म्हणावा तसा वापर करता आला नाही. त्यामुळेच यावर्षी पुन्हा तिळगंगा नदीमध्ये टायर बंधारा घालण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे. याचा प्रारंभ प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला.गतवर्षी डॉ. कौस्तुभ आमटे यांच्या नेतृत्वाखाली पेठ येथील तिळगंगा ओढ्यावर कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नावाने पश्चिम महाराष्ट्रात पहिला टायर बंधारा घालण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आमदार शिवाजीराव नाईक, इंद्रजित देशमुख, माजी जि. प. सदस्य सम्राट महाडिक, माजी पं. स. सदस्य प्रकाश पाटील यांच्याहस्ते या उपक्रमाचे भूमिपूजन करण्यात आले होते. प्रारंभीच्या टप्प्यात पात्राची स्वच्छता करण्यात आली. २ कि.मी. अंतरापर्यंतच्या पात्रातील गाळ काढून स्वच्छता करण्यात आली होती. पहिल्याच पावसात हे पात्र दुथडी भरुन वाहू लागले होते. त्यामुळे टायर बंधारा घालणे शक्य झाले नाही.सध्या पात्र कोरडे पडले असून यावर टायर बंधारा घालण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. सिमेंट काँक्रिटचा पाया भरुन घेण्यात आला आहे. त्यावर हा टायर बंधारा घालण्यात येणार आहे. पाणी साचून राहिल्याने परिसरातील पाणीप्रश्न मिटून विहिरी, कूपनलिकांनाही पाणी वाढण्यास मदत होणार आहे. दोन महिन्यात या बंधाऱ्याचे काम पूर्ण होणार आहे.या कामाच्या पाहणीप्रसंगी मंडल अधिकारी बी. एस. वडर, तलाठी राहुल काळे, संपतराव पवार, इंजिनिअर मांगलेकर, जि. प. सदस्य जगन्नाथ माळी, राजू हिरवे, शिवाजी थोरावडे, नितीन बारोडे, विलास पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)