शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

तिळगंगेत टायर बंधारा

By admin | Updated: March 31, 2017 23:05 IST

राज्यातील पहिला प्रयोग : दोन महिन्यात काम पूर्ण होणार

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा नदीचे (ओढा) गतवर्षी लोकसहभागातून पुनरुज्जीवन करून पात्राची स्वच्छता करण्यात आली होती. पहिल्याच पावसात या नदीचे पात्र दुथडी भरुन वाहिले होते. परंतु सर्व पाणी वाहून गेले. त्यामुळे या पाण्याचा म्हणावा तसा वापर करता आला नाही. त्यामुळेच यावर्षी पुन्हा तिळगंगा नदीमध्ये टायर बंधारा घालण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे. याचा प्रारंभ प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला.गतवर्षी डॉ. कौस्तुभ आमटे यांच्या नेतृत्वाखाली पेठ येथील तिळगंगा ओढ्यावर कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नावाने पश्चिम महाराष्ट्रात पहिला टायर बंधारा घालण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आमदार शिवाजीराव नाईक, इंद्रजित देशमुख, माजी जि. प. सदस्य सम्राट महाडिक, माजी पं. स. सदस्य प्रकाश पाटील यांच्याहस्ते या उपक्रमाचे भूमिपूजन करण्यात आले होते. प्रारंभीच्या टप्प्यात पात्राची स्वच्छता करण्यात आली. २ कि.मी. अंतरापर्यंतच्या पात्रातील गाळ काढून स्वच्छता करण्यात आली होती. पहिल्याच पावसात हे पात्र दुथडी भरुन वाहू लागले होते. त्यामुळे टायर बंधारा घालणे शक्य झाले नाही.सध्या पात्र कोरडे पडले असून यावर टायर बंधारा घालण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. सिमेंट काँक्रिटचा पाया भरुन घेण्यात आला आहे. त्यावर हा टायर बंधारा घालण्यात येणार आहे. पाणी साचून राहिल्याने परिसरातील पाणीप्रश्न मिटून विहिरी, कूपनलिकांनाही पाणी वाढण्यास मदत होणार आहे. दोन महिन्यात या बंधाऱ्याचे काम पूर्ण होणार आहे.या कामाच्या पाहणीप्रसंगी मंडल अधिकारी बी. एस. वडर, तलाठी राहुल काळे, संपतराव पवार, इंजिनिअर मांगलेकर, जि. प. सदस्य जगन्नाथ माळी, राजू हिरवे, शिवाजी थोरावडे, नितीन बारोडे, विलास पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)