शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत रुग्णांवर रस्त्यावर मरण्याची वेळ : शरद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 14:34 IST

कोरोनाच्या उद्रेकाबद्दल प्रशासनाला कल्पना असूनही त्यांनी योग्य उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सांगलीत उपचाराविना रुग्णांना रस्त्यावर मरण्याची वेळ आली आहे, अशी टीका जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देसांगलीत रुग्णांवर रस्त्यावर मरण्याची वेळ : शरद पाटीलउपाय करा, अन्यथा रस्त्यावर उतरू

सांगली : कोरोनाच्या उद्रेकाबद्दल प्रशासनाला कल्पना असूनही त्यांनी योग्य उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सांगलीत उपचाराविना रुग्णांना रस्त्यावर मरण्याची वेळ आली आहे, अशी टीका जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, सांगली जिल्हयात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्हयाला वैद्यकीय सेवेची १२५ वर्षांची परंपरा असून सांगली-मिरज शहरांना वैद्यकीय पंढरी म्हणून जगभर ओळखले जाते. १२५ वषार्पूर्वी डॉ. विल्यम वान्लेस यांनी ज्या परिसरात वैद्यकीय सेवेचा पाया घातला आणि केवळ देशातील नव्हे तर परेदशातही अनेक दुर्धर रोगाने ग्रस्त असलेले रुग्ण मिरजेमध्ये येऊन उपचार घेऊन बरे व्हायचे. परंतु कोरोना साथीचा प्रसार रोखण्यामध्ये आणि कोरोना बाधितांवर उपचार करण्यामध्ये सांगली जिल्हयाचे काम परंपरेला साजेसे राहिले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.ते म्हणाले की, राजकीय नेतृत्वाने आणि प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य धोका ओळखून या साथीचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सुरूच ठेवली नाही, त्यामुळे आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये दोन शासकीय सर्वोपचार रुग्णालये, एक वान्लेस हॉस्पिटल अशी सर्व रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता असलेली रुग्णालये असताना, दहा बेडस, पन्नास बेडस असणाऱ्या रुग्णालय किंवा मंगल कार्यालयामध्ये उपचार सुरु करण्यात धन्यता मानली. काही खासगी रुग्णालयांनी या संधीचा फायदा घेऊन रुग्णांची प्रचंड लूट सुरु केली.व्हेन्टीलेटरची संख्या अपुरी असल्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराविना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक रुग्ण एका हॉस्पिटलकडून दुसऱ्या हॉस्पिटलकडे प्रवेशासाठी फेऱ्या मारतच मृत्यूमुखी पडताहेत व प्रशासन मात्र ठप्प आहे. यंत्रणेत सुधारणा न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी अ‍ॅड. के. डी. शिंदे, शशिकांत गायकवाड, जनार्दन गोंधळी उपस्थित होते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली