शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

दोन्ही पॅनेलकडून जतला झुकते माप

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

बाजार समिती निवडणूक : ‘रयत’कडून सात, तर शेतकरी पॅनेलकडून सहाजण रिंगणात

जयवंत आदाटे - जत-सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी वसंतदादा रयत पॅनेलच्या नेत्यांनी जत तालुक्यासाठी प्रथमच सात जणांना उमेदवारी देऊन झुकते माप दिले आहे. तसेच शेतकरी विकास पॅनेलच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे सहा नवख्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक मतदारांची संख्या आहे. त्यामुळे पॅनेल प्रमुखांनी येथे जादा लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाठोपाठ आता बाजार समिती निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे. वसंतदादा आणि शेतकरी पॅनेलच्या नेत्यांनी तालुक्यातील जत, शेगाव व उमदी या तीन जिल्हा परिषद मतदार संघातील एकही उमेदवार दिला नाही. बनाळी जिल्हा परिषद मतदार संघातील दोन्ही पॅनेलमध्ये प्रत्येकी दोन उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरी विकास पॅनेलकडे दिग्गजांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरु ठेवले होते. परंतु या सर्वांना बाजूला ठेवून नवीन चेहरे उमेदवार म्हणून निवडण्यात आले आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक निकालानंतर आमदार विलासराव जगताप यांनी सावध भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीला भाजपसोबत घेऊन त्यांना दोन जागा त्यांनी दिल्या आहेत. परंतु उमेदवारी डावलण्यात आलेल्या भाजपातील नाराज कार्यकर्त्यांची नाराजी त्यांना दूर करावी लागणार आहे. हे करीत असताना त्यांची तालुक्यात दमछाक होण्याची शक्यता आहे. बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे प्रचाराची जबाबदारी स्वीकारणार आहेत. सोसायटी गट - रामचंद्र माने (येळवी), बसगोंडा जाबगोंड (बिळूर), ग्रामपंचायत गट - प्रमोद सावंत (अचकनहळ्ळी), आर्थिक दुर्बल गट - सदाशिव माळी (माडग्याळ), ओबीसी गट - सिद्धनगौडा पाटील (बोर्गी खु.), महिला - शारदा पाटील (पाच्छापूर) हे त्यांचे उमेदवार आहेत.वसंतदादा पॅनेलने प्रथमच सर्वाधिक सात जणांना उमेदवारी देऊन इच्छुक कार्यकर्त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय समतोल राखण्यासाठी ऐनवेळी जत नगरपालिका नगरसेवक सुजय शिंदे यांची उमेदवारी कमी करुन रवींद्र सावंत यांचे नाव कायम केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाची मदत झाली होती. आता बाजार समिती निवडणुकीत त्यांनी जनसुराज्य पक्षासोबत युती करुन त्यांना एक जागा दिली आहे. जत तालुका राष्ट्रवादीने महादेव पाटील व सिद्धू सिरसाड या दोघांना उमेदवारी मिळावी, अशी शिफारस केली होती. परंतु तांत्रिक कारणामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत नसली तरी, त्यांचे मतदार आमच्यासोबत आहेत, असा दावा जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत व बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे येथील राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे. प्रचारात जाहीरपणे सहभाग न घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या येथील काही नेत्यांनी घेतला आहे. याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. खरी लढत काँग्रेस-भाजपमध्येचबाजार समिती निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादी आणि काँग्रेस-जनसुराज्य युती असली तरी, खरी लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.सोसायटी गट- दयगोंडा पाटील ऊर्फ बिरादार (संख), मच्छिंद्र वाघमोडे (रेवनाळ), रवींद्र सावंत (बनाळी), ग्रामपंचायत गट - रामगोंडा संती (खोजानवाडी), आर्थिक दुर्बल गट - अभिजित चव्हाण (डफळापूर), ओबीसी - संतोष पाटील (सोन्याळ), महिला - सुगलाबाई बिराजदार (मुचंडी) असे वसंतदादा रयत पॅनेलचे जत तालुक्यातील उमेदवार आहेत.