शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

चांदोली परिसरात वाघांची शिकार

By admin | Updated: September 3, 2015 23:44 IST

एकाच वाघाचे अस्तित्व : तस्करीमुळे निसर्गप्रेमींमध्ये उलटसुलट चर्चा

गंगाराम पाटील - वारणावती  चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये केवळ एकाच वाघाचे अस्तित्व आढळत असल्याने अनेक वाघांची शिकार झाली असण्याची शक्यता असून, इस्लामपुरातील वाघांची कातडी व नख्यांच्या तस्करी प्रकरणामुळे निसर्गप्रेमींमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. वनक्षेत्रपाल व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे उद्यानामध्ये वन्यप्राण्यांची चोरटी शिकार होत आहे. वाघांची चोरटी शिकार रोखण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर आहे. जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील वाघांच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी केंद्राने या प्रकल्पाला ५ जानेवारी २०१० ला मान्यता दिली आहे. राज्यातला हा चौथा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पासाठी कोयना अभयारण्याच्या ४२३.५५ व चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३१७.६७ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश केलेला आहे. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर चांदोली अभयारण्य आहे. या अभयारण्याचे क्षेत्र सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आहे. नैसर्गिक व निर्मनुष्य असणारे राज्यातले हे सर्वांत मोठे अभयारण्य आहे. हे अभयारण्य निर्मनुष्य होण्यासाठी चांदोली धरणामुळे अडचणीत आलेल्या सांगली जिल्ह्यातील १४ गावे व कोल्हापूर जिल्ह्यातील १४ गावांचे व रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावाचे पुनर्वसन झाले. पुनर्वसन होऊन ती गावे त्या-त्या जिल्ह्यांच्या अन्य तालुक्यात गेली. जाताना त्यांनी घरेदारे मोडून मोडका-तोडका संसार गाड्या भरून नेला आणि चांदोलीचे अभयारण्य निर्मनुष्य झाले. प्राण्यांची संख्या वाढू लागली. जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघांचे अस्तित्व असल्याने केंद्राने या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला ५ जानेवारी २०१० ला मान्यता दिली आहे. गैरसमजुतीतून या प्रकल्पाविषयी लोकांत नाराजी दिसत असली तरी, वाघांच्या चोरट्या शिकारीमुळे वाघाची संख्या घटत आहे. वाघांचे व बिबट्यांचे अस्तित्व कमी होत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नेमके करतात काय, असा सवाल निसर्गपे्रमींतून विचारला जात आहे. इस्लामपुरातील वाघांच्या कातडीच्या तस्करी प्रकरणामुळे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील चोरट्या शिकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये केवळ एकाच वाघाचे अस्तित्व आढळत असल्याने चांदोली उद्यानामध्ये अनेक वाघांची शिकार झाली असण्याची शक्यता असून त्याची निसर्गप्रेमींमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. बिबट्यांचे अस्तित्वही कमी झालेगैरसमजुतीतून या प्रकल्पाविषयी लोकांत नाराजी दिसत असली तरी, वाघांच्या चोरट्या शिकारीमुळे वाघाची संख्या घटत आहे. वाघांचे व बिबट्यांचे अस्तित्व कमी होत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नेमके करतात काय, असा सवल निसर्गपे्रमींतून विचारला जात आहे.