शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

६७ वर्षांत चारच महिला आमदार - सांगली जिल्ह्यात यावर्षी तीनच महिला रिंगणात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 22:32 IST

सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री अशोक पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तासगाव आणि सांगली विधानसभा मतदारसंघ सोडल्यास, सहा मतदारसंघात महिला उमेदवारच नाहीत.

ठळक मुद्देराजकारणात दुय्यम स्थानाबद्दल महिलांची सर्व राजकीय पक्षांबद्दल नाराजी

अशोक डोंबाळे ।सांगली : जिल्ह्यात नेत्यांच्या मांदियाळीत महिलांचे नेतृत्व झाकोळले गेले आहे. जिल्ह्याच्या ६७ वर्षांच्या राजकारणात केवळ सरोजिनी बाबर, श्रीमती कळंत्रे (आक्का), शालिनीताई पाटील, सुमनताई पाटील या चौघींनाच आमदार पदाची संधी मिळाली आहे. सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंंगणात तर तीनच महिला उमेदवार आहेत.

जिल्ह्यात विधानसभेची पहिली निवडणूक १९५२ मध्ये झाली. या पहिल्याच निवडणुकीमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातून श्रीमती कळंत्रे (आक्का), तर शिराळा विधानसभा मतदारसंघातून सरोजिनी बाबर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. या निवडणुकीत कळंत्रेआक्का व सरोजिनी बाबर या दोन्ही महिला विजयी झाल्या. त्यानंतर १९८० मध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून शालिनीताई पाटील यांना काँग्रेसकडून संधी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात नामदेवराव मोहिते निवडणूक मैदानात होते. या निवडणुकीमध्ये शालिनीताई यांना ४४ हजार ३४१, तर मोहिते यांना १४ हजार ७९९ मते मिळाली होती.

शालिनीतार्इंनी विक्रमी २९ हजार ५४२ मताधिक्य घेऊन विजय मिळविला होता. त्यानंतर ३५ वर्षांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर २०१५ मध्ये राष्ट्रवादीने सुमनताई पाटील यांना तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. सुमनताई पाटील विक्रमी एक लाख १२ हजार ९६३ मतांनी विजयी झाल्या.

राष्ट्रवादीने आता पुन्हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून सुमनताई पाटील यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार आहे. मात्र यावेळी कुमठे (ता. तासगाव) येथील सुमनताई पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत सुमनताई पाटील पुन्हा विजय खेचून आणणार का, हा चर्चेचा मुद्दा आहे. उर्वरित सात विधानसभा मतदारसंघात नारीशक्तीचा जयघोष करणाऱ्या एकाही पक्षाने महिलांना उमेदवारीच दिलेली नाही. सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री अशोक पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तासगाव आणि सांगली विधानसभा मतदारसंघ सोडल्यास, सहा मतदारसंघात महिला उमेदवारच नाहीत.

जिल्ह्यात १२ लाख २१ हजार २१३ पुुरुष आणि ११ लाख ५३ हजार ०८६ महिला मतदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले आणि गावापासून महानगरांपर्यंत राजकीय क्षेत्रात महिलांची मोठी फळी उभी राहू लागली. जिल्हा परिषद अध्यक्ष, महापालिकेच्या महापौर पदापर्यंतची संधी त्यांना मिळाली. इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती व जमातीतील महिलांना स्वतंत्र आरक्षण असल्यामुळे गावगाड्यातील उपेक्षित, शोषितांना प्रथमच राजकारणाचे अवकाश मोकळे झाले.

राजकारणात महिलांसाठी राखीव जागांमुळे, त्यांच्या सहभागामुळे सर्वसामान्य महिलांचे जीवनमान बदलू लागले आहे. कालपर्यंत शेतात खुरपणारी, चूल आणि मूल सांभाळणारी, खरकटे काढणारी स्त्री पंचायतीत जाऊन गावाचा कारभार पाहू लागली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ५० टक्के राहिले, किमान १० टक्के तरी महिलांना संधी देण्याचे धाडस राजकीय पक्षांनी दाखविण्याची गरज होती. पण, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्षांनी सांगली जिल्ह्यातील महिलांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राजकारणापासून दूरच ठेवले आहे.

सांगली जिल्ह्यातील : महिला आमदारआमदार मतदारसंघ पक्ष वर्षकळंत्रेआक्का मिरज काँग्रेस १९५२सरोजिनी बाबर शिराळा काँग्रेस १९५२शालिनीताई पाटील सांगली काँग्रेस १९८०सुमनताई पाटील तासगाव-क.महांकाळ राष्ट्रवादी २०१५

सुमनताई पाटील यांना २0१५ च्या निवडणुकीत सव्वालाखाचे मताधिक्य.

टॅग्स :SangliसांगलीMLAआमदार