शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

म्हैसाळ योजनेच्या तीन पंप सुरू

By admin | Updated: April 9, 2015 00:02 IST

पाणी तिसऱ्या टप्प्यात : मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जतपर्यंत पाण्याचे नियोजन

मिरज : म्हैसाळ योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील तीन पंप मंगळवारी रात्री सुरू झाले. आज सायंकाळपर्यंत तिसऱ्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचले. मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, जतपर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन आहे, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने पाणी मागणी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन ‘म्हैसाळ’चे कार्यकारी अभियंता महादेव धुळे यांनी केले आहे. गेली चार वर्षे राज्य सरकारने टंचाई निधीतून वीज बिल भरल्याने म्हैसाळ योजना सुरू राहिली होती. गेल्या आॅक्टोबर महिन्यापासून वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. १ कोटी ६४ लाखांचा निधी टंचाई निधीतून उपलब्ध झाल्यानंतर महावितरणने वीज पुरवठा सुरू केला. शेतकऱ्यांसाठीच असलेली ही योजना वीज बिले भरली तरच सुरू राहील, असे धुळे यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची मागणी अर्ज येतील त्या शेतकऱ्यांना पाणी देण्याची भूमिका आहे. चोरून पाणी घेणाऱ्यांवर पंचनामे करून कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू ठेवण्यासाठी १० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी मागणी अर्ज अपेक्षित आहेत. मात्र अद्याप मागणी अर्ज कमी असल्याने पाणी मागणी अर्ज गोळा करण्यासाठी आधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. योजना सुरू झाल्यानंतर लगेचच पाणी तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचले असून, चौथ्या टप्प्यात पाणी पोहोचल्यानंतर डोंगरवाडी योजनेच्या उद्घाटनाचे नियोजन सुरू असल्याची माहिती मिळाली. (वार्ताहर)पाणी मागणी अर्ज द्याखासदार संजय पाटील यांनी बुधवारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या परिसरास भेट दिली. म्हैसाळचे कार्यकारी अभियंता महादेव धुळे व अन्य अधिकाऱ्यांसोबत योजनेची पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून योजनेतील तांत्रिक अडचणी, पाणी गळती आदींची माहिती घेऊन सूचना दिल्या. यावेळी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू ठेवण्यासाठी १० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी मागणी अर्ज मिळणे अपेक्षित आहेत. मात्र अद्याप वारंवार आवाहन करूनही मागणी अर्ज कमी आहेत. यापुढे शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज देऊन पाणीपट्टी भरली तरच योजनेचे वीजबील भरणे शक्य आहे, अन्यथा योजना पुन्हा बंद होईल, असे धुळे यांनी सांगितले. खासदार पाटील यांनी शनिवारी पुन्हा म्हैसाळ योजनेचा दौरा करून शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्ज देण्याबाबत आवाहन करणार असल्याचे सांगितले.