शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

म्हैसाळ योजनेच्या तीन पंप सुरू

By admin | Updated: April 9, 2015 00:02 IST

पाणी तिसऱ्या टप्प्यात : मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जतपर्यंत पाण्याचे नियोजन

मिरज : म्हैसाळ योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील तीन पंप मंगळवारी रात्री सुरू झाले. आज सायंकाळपर्यंत तिसऱ्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचले. मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, जतपर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन आहे, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने पाणी मागणी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन ‘म्हैसाळ’चे कार्यकारी अभियंता महादेव धुळे यांनी केले आहे. गेली चार वर्षे राज्य सरकारने टंचाई निधीतून वीज बिल भरल्याने म्हैसाळ योजना सुरू राहिली होती. गेल्या आॅक्टोबर महिन्यापासून वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. १ कोटी ६४ लाखांचा निधी टंचाई निधीतून उपलब्ध झाल्यानंतर महावितरणने वीज पुरवठा सुरू केला. शेतकऱ्यांसाठीच असलेली ही योजना वीज बिले भरली तरच सुरू राहील, असे धुळे यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची मागणी अर्ज येतील त्या शेतकऱ्यांना पाणी देण्याची भूमिका आहे. चोरून पाणी घेणाऱ्यांवर पंचनामे करून कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू ठेवण्यासाठी १० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी मागणी अर्ज अपेक्षित आहेत. मात्र अद्याप मागणी अर्ज कमी असल्याने पाणी मागणी अर्ज गोळा करण्यासाठी आधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. योजना सुरू झाल्यानंतर लगेचच पाणी तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचले असून, चौथ्या टप्प्यात पाणी पोहोचल्यानंतर डोंगरवाडी योजनेच्या उद्घाटनाचे नियोजन सुरू असल्याची माहिती मिळाली. (वार्ताहर)पाणी मागणी अर्ज द्याखासदार संजय पाटील यांनी बुधवारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या परिसरास भेट दिली. म्हैसाळचे कार्यकारी अभियंता महादेव धुळे व अन्य अधिकाऱ्यांसोबत योजनेची पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून योजनेतील तांत्रिक अडचणी, पाणी गळती आदींची माहिती घेऊन सूचना दिल्या. यावेळी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू ठेवण्यासाठी १० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी मागणी अर्ज मिळणे अपेक्षित आहेत. मात्र अद्याप वारंवार आवाहन करूनही मागणी अर्ज कमी आहेत. यापुढे शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज देऊन पाणीपट्टी भरली तरच योजनेचे वीजबील भरणे शक्य आहे, अन्यथा योजना पुन्हा बंद होईल, असे धुळे यांनी सांगितले. खासदार पाटील यांनी शनिवारी पुन्हा म्हैसाळ योजनेचा दौरा करून शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्ज देण्याबाबत आवाहन करणार असल्याचे सांगितले.