शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

एक रुपयात पीकविमा, तरीही सांगली जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचे दुर्लक्षच

By अशोक डोंबाळे | Updated: July 22, 2023 18:06 IST

शेतकरी स्वत:च्या मोबाइलवरूनही पीकविमा उतरवू शकतात

सांगली : खरीप हंगामासाठी शासनाने एक रुपयात पीकविमा योजना आणली आहे; पण जिल्ह्यातील चार लाख ५० हजार शेतकरी खातेदारापैकी एक लाख नऊ हजार ६८० खातेदारांनीच ६१ हजार ३३४.५० हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरविला आहे. उर्वरित तीन लाख ४० हजार ३२० शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे दुर्लक्ष केले आहे.जुलैचा तिसरा आठवडा उलटलेला असताना जिल्ह्यात अवघ्या २१.८३ टक्के पेरण्या झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी दोन लाख ५५ हजार ९८४हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. यापैकी शनिवारपर्यंत ५५ हजार ९९६ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली आहे. अजूनही जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी नुकसान होते. एकतरी जास्त पाऊस पडतो किंवा पाऊसच न पडल्याने शेतकऱ्यांचे पीक हातातून जाते. अशा परिस्थितीत त्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारने ‘एक रुपयात पीकविमा’ ही योजना लागू केली.यापूर्वी या योजनेसाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे शेतकरी या योजनेत सहभागी होत नव्हते. यावर्षी शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी घ्यायचा आहे. यंदा ३१ जुलै २०२३ पर्यंत मुदत असताना आजपर्यंत एक लाख नऊ हजार ६८० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. उर्वरित तीन लाख ४० हजार ३२० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला नाही.अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यापर्यंत जाण्याची गरजनाममात्र म्हणजे एक रुपयात शेतकरी स्वत:च्या मोबाइलवरून आपल्या पिकांचा विमा उतरवू शकतात; परंतु याविषयी त्यांना माहिती नाही किंवा कृषी विभाग त्यांच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाही. शेतकरी या योजनेपासून दूर असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत जाण्याची गरज आहे.३१ जुलै अंतिम मुदतएक रुपयात पीकविमा उतरण्यासाठी शेतकऱ्यांना दि. ३१ जुलैपर्यंतची अंतिम मुदत शासनाने दिलेली आहे.

शेतकरी स्वत:च्या मोबाइलवरूनही पीकविमा उतरवू शकतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हायला हवे, यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. एक रुपयात पीकविमा असल्याने शेतकऱ्यांची भविष्यातील चिंता मिटणार आहे. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी