शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

एक रुपयात पीकविमा, तरीही सांगली जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचे दुर्लक्षच

By अशोक डोंबाळे | Updated: July 22, 2023 18:06 IST

शेतकरी स्वत:च्या मोबाइलवरूनही पीकविमा उतरवू शकतात

सांगली : खरीप हंगामासाठी शासनाने एक रुपयात पीकविमा योजना आणली आहे; पण जिल्ह्यातील चार लाख ५० हजार शेतकरी खातेदारापैकी एक लाख नऊ हजार ६८० खातेदारांनीच ६१ हजार ३३४.५० हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरविला आहे. उर्वरित तीन लाख ४० हजार ३२० शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे दुर्लक्ष केले आहे.जुलैचा तिसरा आठवडा उलटलेला असताना जिल्ह्यात अवघ्या २१.८३ टक्के पेरण्या झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी दोन लाख ५५ हजार ९८४हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. यापैकी शनिवारपर्यंत ५५ हजार ९९६ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली आहे. अजूनही जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी नुकसान होते. एकतरी जास्त पाऊस पडतो किंवा पाऊसच न पडल्याने शेतकऱ्यांचे पीक हातातून जाते. अशा परिस्थितीत त्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारने ‘एक रुपयात पीकविमा’ ही योजना लागू केली.यापूर्वी या योजनेसाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे शेतकरी या योजनेत सहभागी होत नव्हते. यावर्षी शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी घ्यायचा आहे. यंदा ३१ जुलै २०२३ पर्यंत मुदत असताना आजपर्यंत एक लाख नऊ हजार ६८० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. उर्वरित तीन लाख ४० हजार ३२० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला नाही.अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यापर्यंत जाण्याची गरजनाममात्र म्हणजे एक रुपयात शेतकरी स्वत:च्या मोबाइलवरून आपल्या पिकांचा विमा उतरवू शकतात; परंतु याविषयी त्यांना माहिती नाही किंवा कृषी विभाग त्यांच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाही. शेतकरी या योजनेपासून दूर असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत जाण्याची गरज आहे.३१ जुलै अंतिम मुदतएक रुपयात पीकविमा उतरण्यासाठी शेतकऱ्यांना दि. ३१ जुलैपर्यंतची अंतिम मुदत शासनाने दिलेली आहे.

शेतकरी स्वत:च्या मोबाइलवरूनही पीकविमा उतरवू शकतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हायला हवे, यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. एक रुपयात पीकविमा असल्याने शेतकऱ्यांची भविष्यातील चिंता मिटणार आहे. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी