शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

एक रुपयात पीकविमा, तरीही सांगली जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचे दुर्लक्षच

By अशोक डोंबाळे | Updated: July 22, 2023 18:06 IST

शेतकरी स्वत:च्या मोबाइलवरूनही पीकविमा उतरवू शकतात

सांगली : खरीप हंगामासाठी शासनाने एक रुपयात पीकविमा योजना आणली आहे; पण जिल्ह्यातील चार लाख ५० हजार शेतकरी खातेदारापैकी एक लाख नऊ हजार ६८० खातेदारांनीच ६१ हजार ३३४.५० हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरविला आहे. उर्वरित तीन लाख ४० हजार ३२० शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे दुर्लक्ष केले आहे.जुलैचा तिसरा आठवडा उलटलेला असताना जिल्ह्यात अवघ्या २१.८३ टक्के पेरण्या झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी दोन लाख ५५ हजार ९८४हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. यापैकी शनिवारपर्यंत ५५ हजार ९९६ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली आहे. अजूनही जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी नुकसान होते. एकतरी जास्त पाऊस पडतो किंवा पाऊसच न पडल्याने शेतकऱ्यांचे पीक हातातून जाते. अशा परिस्थितीत त्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारने ‘एक रुपयात पीकविमा’ ही योजना लागू केली.यापूर्वी या योजनेसाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे शेतकरी या योजनेत सहभागी होत नव्हते. यावर्षी शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी घ्यायचा आहे. यंदा ३१ जुलै २०२३ पर्यंत मुदत असताना आजपर्यंत एक लाख नऊ हजार ६८० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. उर्वरित तीन लाख ४० हजार ३२० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला नाही.अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यापर्यंत जाण्याची गरजनाममात्र म्हणजे एक रुपयात शेतकरी स्वत:च्या मोबाइलवरून आपल्या पिकांचा विमा उतरवू शकतात; परंतु याविषयी त्यांना माहिती नाही किंवा कृषी विभाग त्यांच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाही. शेतकरी या योजनेपासून दूर असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत जाण्याची गरज आहे.३१ जुलै अंतिम मुदतएक रुपयात पीकविमा उतरण्यासाठी शेतकऱ्यांना दि. ३१ जुलैपर्यंतची अंतिम मुदत शासनाने दिलेली आहे.

शेतकरी स्वत:च्या मोबाइलवरूनही पीकविमा उतरवू शकतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हायला हवे, यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. एक रुपयात पीकविमा असल्याने शेतकऱ्यांची भविष्यातील चिंता मिटणार आहे. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी