शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष हंगामात दलालांचा तीन कोटीचा डल्ला-एका वर्षातील फसवणूक : पोलीस हतबल, शेतकरी कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:29 IST

तासगाव तालुक्यात गेल्यावर्षी द्राक्ष निर्यातीच्या हंगामात तब्बल तीन कोटी रुपयांना दलालांनी चुना लावला आहे. ही आकडेवारी केवळ पोलीसदप्तरी नोंद झालेली आहे.

ठळक मुद्देबाजार समितीने शेतकरी हिताकडे लक्ष देण्याची गरज

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव तालुक्यात गेल्यावर्षी द्राक्ष निर्यातीच्या हंगामात तब्बल तीन कोटी रुपयांना दलालांनी चुना लावला आहे. ही आकडेवारी केवळ पोलीसदप्तरी नोंद झालेली आहे. प्रत्यक्षात याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात द्राक्षबागायतदारांची फसवणूक झालेली आहे.

द्राक्षबागायतदारांना निर्यातीची घाई, जादा दराचे आमिष यासह बाजार समितीच्या उदासीन कारभाराने प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांना गंडा बसतो. गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करूनही शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. त्यामुळे पोलीस हतबल असून, द्राक्षबागायतदारांची जागरुकता व रोखीचा व्यवहारच फसवणुकीपासून त्यांना परावृत्त करू शकतो.

तासगाव तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. चांगला दर्जा आणि चवदार द्राक्षांमुळे तालुक्यातील द्राक्षांना मागणीही मोठी असते. द्राक्ष निर्यातीला डिसेंबर महिन्यात सुरुवात होते. महाराष्टÑासह देशभरातील व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी तासगावात तळ ठोकून राहतात. द्राक्ष निर्यातीच्या काळात अब्जावधी रुपयांची उलाढाल तालुक्यात होते.

परराज्यातून आलेले व्यापारी स्थानिक एजंटांच्या माध्यमातून गावा-गावातून द्राक्षे खरेदी करतात. सुरुवातीच्या टप्प्यात व्यापाºयांकडून द्राक्षबागायतदारांचा विश्वास संपादन केल्यानंतर, द्राक्षाचे लाखो रुपयांचे व्यवहार हे केवळ विश्वासावर होतात. अशातच नुकसानीमुळे किंवा फक्त फसवणुकीच्या उद्देशाने आलेले दलाल पसार होतात. या दलालांचा ठावठिकाणा लागत नाही. पत्ता लागला तरीदेखील शेतकºयांच्या पदरात काहीच पडत नाही.

मागीलवर्षी तासगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचे तेरा गुन्हे नोंद झाले आहेत. २ कोटी ७९ लाख २ हजार ६७२ रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. ही केवळ रेकॉर्डवरील आकडेवारी आहे. मात्र प्रत्यक्ष फसवणुकीचा आकडा याहीपेक्षा मोठा आहे. ही फसवणूक केवळ एकाचवर्षी झाली असेही नाही. प्रत्येकवर्षी द्राक्षबागायतदारांची फसवणूक करून चुना लावला जात आहे.

प्रत्येक दलालाने गंडा घातल्याचे गुन्हे पोलिसांत दाखल केले जातात. पोलिसांकडूनही त्याचा कसून तपास केला जातो. अगदी दिल्ली, कोलकाता, केरळ, तामिळनाडूपर्यंत पोहोचून व्यापाºयांचा शोध घेतला जातो. मात्र अशा प्रकारात व्यापाºयांची साखळी असल्याचे स्पष्ट होते. मात्र पुढील व्यापाºयांचा सुगावा लागत नाही. सुगावा लागलाच तरी, तो व्यापारी दिवाळखोर असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्हे दाखल होऊनही अपवादानेच शेतकºयांना फसवणुकीची रक्कम परत मिळाली आहे.बाजार समितीही उदासीनद्राक्षबागायतदारांच्या फसवणुकीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी नोंदी ठेवणे बंधनकारक केले आहे. मात्र तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची याबाबत उदासीन भूमिका आहे. बेदाण्यातून महसूल मिळत असल्याने बाजार समितीने केवळ बेदाण्यापुरतेच कार्यक्षेत्र मर्यादित ठेवले आहे. द्राक्षबागायतदारांसाठी बाजार समितीने परवाने बंधनकारक करून अंकुश ठेवल्यास फसवणुकीला काही प्रमाणात आळा बसू शकतो. त्यासाठी गेल्यावर्षी पोलिसांनी बाजार समितीला सूचना केल्या होत्या; मात्र बाजार समितीकडून शेतकरी हितासाठी कोणतेच पाऊल उचलले गेले नाही. 

रोखीने व्यवहार कराद्राक्ष दलालांकडून फसवणूक टाळण्यासाठी रोखीने व्यवहार करणे, हा एकमेव उपाय आहे.द्राक्ष बागायतदारांची जागरुकता करणे, एकसंधपणे रोखीशिवाय विक्री करण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. नाही तर नेहमीप्रमाणे याही हंगामात पुन्हा कोट्यवधी रुपयांची फसवणूक होऊन शेकडो द्राक्ष उत्पादक भिकेकंगाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतकºयांनी द्राक्ष विक्री करताना सतर्कता घेणे आवश्यक आहे. द्राक्ष व्यापाºयांची नोंदणी करण्याचे आदेश पोलीस पाटलांना दिले आहेत. अनेकदा जादा दराच्या आमिषाने स्थानिक एजंटांकडून कमिशनच्या भूलभुलैयातून शेतकºयांची फसवणूक केली जाते. मात्र यावेळी अशी फसवणूक झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही.- अशोक बनकर, पोलीस उपअधीक्षक, तासगाव