शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

राज्य महामार्गाच्या ठेकेदारांकडून शेतकऱ्यांना धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:26 IST

विटा : टोप-तासगाव-भिवघाट ते दिघंची या राज्य महामार्गाचे काम ठेकेदारांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू केले आहे. याबाबत जाब ...

विटा : टोप-तासगाव-भिवघाट ते दिघंची या राज्य महामार्गाचे काम ठेकेदारांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू केले आहे. याबाबत जाब विचारणाऱ्यांना अर्वाच्च शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने शेतकऱ्याने संबंधित ठेकेदारांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, महामार्गासाठी भूसंपादन न करता जमीन धमकावून घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेने बुधवारी दिला. गेल्या दोन वर्षांपासून विजापूर ते गुहागर या महामार्गाच्या भूसंपादनप्रश्नी लढा सुरू आहे. सध्या टोप-तासगाव-भिवघाट ते दिघंची या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी शासनाची जेवढी जागा आहे, तेवढीच संपादन करण्यात येणार असल्याचे यापूर्वी संबंधित विभागाने सांगितले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराने आता शेतकऱ्यांच्या जमिनी कायदेशीर संपादित न करता परस्पर घेऊन त्याठिकाणी काम सुरू केले आहे.

त्यामुळे करंजे येथील बाधित शेतकरी राजेंद्र माने यांनी संबंधित ठेकेदाराला जमीन घेण्यास विरोध केला. त्यावेळी या कामाच्या सुपरवायझरने माने यांना अर्वाच्च शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे माने यांनी मंगळवारी सायंकाळी विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या प्रकाराचा अखिल भारतीय किसान सभेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. धमकावून जमिनी बेकायदेशीर संपादित केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. उमेश देशमुख, सरचिटणीस दिगंबर कांबळे, जिल्हा संघटक कॉ. गोपीनाथ सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष सुनील हसबे उपस्थित होते.