शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सांगली जिल्ह्यात हजारवर वाड्या-वस्त्या तहानलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:07 IST

सांगली : गेल्या आठवड्यापासून जिल्हाभर विक्रमी तापमानाची नोंद होत असतानाच, त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. यामुळेच ...

सांगली : गेल्या आठवड्यापासून जिल्हाभर विक्रमी तापमानाची नोंद होत असतानाच, त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. यामुळेच उपलब्ध जलस्रोतही आटत असून, पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरच्या भरवशावर राहावे लागत आहे. जिल्ह्यातील १७९ गावांमध्ये, तर १०७१ वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तापमानातील वाढ अशीच कायम राहिल्यास पाण्याची मागणी अधिक वाढणार आहे.यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. उन्हाळ्याचे चार महिने आव्हानात्मक ठरणार, असेच चित्र त्यावेळी होते. आता मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात वळवाच्या पावसांना सुरुवात होते, तर जूनमध्ये मान्सूनचे आगमन अपेक्षित असते. गेल्या तीन वर्षातील पावसाची गती बघितली, तर वळवाचे पाऊस दमदार होत असले तरी संपूर्ण मान्सून अपवाद वगळता कोरडा जात आहे.जत तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई अधिक जाणवत आहे. म्हैसाळ योजनेतून काही भागात पाणी पोहोचले असले तरी त्याचा संपूर्ण तालुक्याला फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे जत तालुक्यातील ८६ गावे व ६५० वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर असल्याने प्रशासनाच्यावतीने तालुक्यात चारा छावणीही सुरू करण्यात येणार आहेत. अगदी हीच स्थिती आटपाडी तालुक्यात असून, टेंभूचे पाणी शिवारात आले असले तरी, टंचाई कायम आहे.तालुका टॅँकर गावे वाड्या बाधित लोक संख्याजत १०३ ८६ ६५० २१५१३०क.महांकाळ १३ १९ ९६ २४२६६तासगाव ११ २२ ९२ २६६८४मिरज ५ ८ १६ २०९१४खानापूर १४ १२ १ १९६१३आटपाडी ३३ २६ २१६ ५०३८१एकूण १७९ १७३ १०७१ ३५६९८८