शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
4
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
5
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
6
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
7
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
8
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
9
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
10
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
11
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
12
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
13
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
14
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
15
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
16
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
17
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
18
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
19
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान

सांगली जिल्ह्यात हजारवर वाड्या-वस्त्या तहानलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:07 IST

सांगली : गेल्या आठवड्यापासून जिल्हाभर विक्रमी तापमानाची नोंद होत असतानाच, त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. यामुळेच ...

सांगली : गेल्या आठवड्यापासून जिल्हाभर विक्रमी तापमानाची नोंद होत असतानाच, त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. यामुळेच उपलब्ध जलस्रोतही आटत असून, पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरच्या भरवशावर राहावे लागत आहे. जिल्ह्यातील १७९ गावांमध्ये, तर १०७१ वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तापमानातील वाढ अशीच कायम राहिल्यास पाण्याची मागणी अधिक वाढणार आहे.यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. उन्हाळ्याचे चार महिने आव्हानात्मक ठरणार, असेच चित्र त्यावेळी होते. आता मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात वळवाच्या पावसांना सुरुवात होते, तर जूनमध्ये मान्सूनचे आगमन अपेक्षित असते. गेल्या तीन वर्षातील पावसाची गती बघितली, तर वळवाचे पाऊस दमदार होत असले तरी संपूर्ण मान्सून अपवाद वगळता कोरडा जात आहे.जत तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई अधिक जाणवत आहे. म्हैसाळ योजनेतून काही भागात पाणी पोहोचले असले तरी त्याचा संपूर्ण तालुक्याला फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे जत तालुक्यातील ८६ गावे व ६५० वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर असल्याने प्रशासनाच्यावतीने तालुक्यात चारा छावणीही सुरू करण्यात येणार आहेत. अगदी हीच स्थिती आटपाडी तालुक्यात असून, टेंभूचे पाणी शिवारात आले असले तरी, टंचाई कायम आहे.तालुका टॅँकर गावे वाड्या बाधित लोक संख्याजत १०३ ८६ ६५० २१५१३०क.महांकाळ १३ १९ ९६ २४२६६तासगाव ११ २२ ९२ २६६८४मिरज ५ ८ १६ २०९१४खानापूर १४ १२ १ १९६१३आटपाडी ३३ २६ २१६ ५०३८१एकूण १७९ १७३ १०७१ ३५६९८८