शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तब्बल साडेसहा हजार वीज जोडण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:56 IST

सांगली जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या ८५९६ वीज जोडण्यांसाठी ठेकेदारांकडे कामाची जबाबदारी देऊनही त्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. मागील दीड वर्षात केवळ २१०६ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत.

ठळक मुद्देतब्बल साडेसहा हजार वीज जोडण्या प्रलंबित आठ वर्षे शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

अशोक डोंबाळे सांगली : जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या ८५९६ वीज जोडण्यांसाठी ठेकेदारांकडे कामाची जबाबदारी देऊनही त्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. मागील दीड वर्षात केवळ २१०६ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत.

उर्वरित ६४९० शेती पंपांच्या जोडण्या केवळ ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित राहिल्या आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळेत कारवाई केली नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या चार ठेकेदारांना ठेका रद्दच्या नोटिसा पाठविल्या आहेत.विहिरी, विंधनविहिरी खुदाई करून पाणी लागल्यानंतर शेतकऱ्यांनी रितसर पैसे भरून अर्ज दाखल केले होते. यामध्ये २०१२ ते २०१९ या वर्षातील शेतकऱ्यांचा सहभाग आहे. १०,२३९ शेतकऱ्यांच्या वीज जोडण्यांपैकी महावितरण कंपनीने जिल्ह्यातील दि. ३१ मार्च २०१८ अखेरच्या प्रलंबित ८५९६ वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत (एचव्हीडीएस) १९८ कोटी रुपयांच्या ५६ निविदा मागविल्या होत्या.

त्यापैकी २६ निविदांना प्रतिसाद मिळाल्यामुळे १०६ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. ठेकेदारांना कामे सुरु करण्याचे लेखी आदेश दिले. पण ठेकेदारांकडून कामे सुरु करण्यास अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला.

मागील दीड वर्षात केवळ दोन हजार १०६ वीज जोडण्यांचीच कामे पूर्ण केली आहेत. उर्वरित कामे ठेकेदारांनी वेळेत पूर्ण केली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरुनही त्यांची पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत.शेतकऱ्यांचा वीज जोडणीसाठी दबाव वाढल्यामुळे सध्या महावितरणने जिल्ह्यात काम करणाऱ्या चार ठेकेदारांना, कामे वेळेत पूर्ण न केल्याने ठेका रद्दच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांना ठेकेदारांनी वेळेत उत्तरही पाठविले नाही. दि. ३१ मार्च २०१८ पूर्वीच्या जोडण्या प्रलंबित असतानाच सध्या २०१८-१९ या वर्षात ९०२ आणि २०१९-२० या वर्षात ९७४ शेतकऱ्यांनी जोडणीसाठी पैसे भरुन अर्ज केले आहेत.

सध्या महावितरणकडे १०,२३९ जोडण्या प्रलंबित आहेत. एप्रिल २०१२ मध्ये २६७ आणि २०१२-१३ या वर्षात ६१६ शेतकऱ्यांनी अर्ज करुनही त्यांना वीज जोडणी मिळाली नाही. आठ वर्षे हे शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असून त्यांना महावितरणकडून न्याय मिळाला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कारभारावर खासदार, आमदारही गप्प असल्यामुळे वीज जोडणी वेळेत मिळेल का, या चिंतेत शेतकरी आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणSangliसांगली