शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! यंदा नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नाही, महाविद्यालयांची तयारी अपूर्ण

By संतोष भिसे | Updated: June 17, 2023 17:58 IST

स्वायत्त महाविद्यालयांत मात्र नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यंदापासूनच

सांगली : नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाविद्यालयीन स्तरावर तयारी पूर्ण झालेली नाही, त्यामुळे पुढील वर्षातील शैक्षणिक वर्षांपासून (जून २०२४ पासून) ते लागू होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि. १६) राज्यातील सर्व विद्यापीठांना पत्र पाठविण्यात आले.नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात गेल्या शुक्रवारी (दि. ९) मुंबईत सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक झाली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला सुकाणू समितीचे सदस्य, सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते. सुकाणू समितीने धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात महत्वाच्या शिफारशी केल्या. नव्या धोरणाच्या अंमलबजावणीची महाविद्यालयीन स्तरावर पुरेशी तयारी झाली नसल्याचे सांगण्यात आले. या सूचना मान्य करताना नवे धोरण पुढील वर्षापासून अंमलात आणण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. स्वायत्त महाविद्यालयांमध्ये मात्र या वर्षापासूनच ते लागू होईल. अकृषी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांना याच वर्षापासून धोरणाची अंमलबजावणी करायची असल्यास, त्यांना स्वायत्त महाविद्यालयांची मदत घेता येईल. मात्र त्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यापीठाने घ्यायचा आहे.दरम्यान, संपूर्ण राज्यात शैक्षणिक वेळापत्रकात एकसमानता आणण्यासाठी पदवी अभ्यासक्रमाचे पहिल्या वर्षाचे वर्ग १ ते १५ जुलैदरम्यान सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांचे वर्ग १ ऑगस्टनंतर सुरु करायचे आहेत.दरम्यान, नवे धोरण पुढील शैक्षणिक वर्षांपासून लागू करायचे आहे, त्यादृष्टीने अभ्यासक्रमाचे आराखडे, संरचना, मुल्यांकन पद्धती यांचा निर्णय विद्यापीठे व महाविद्यालयांनी ३० सप्टेंबरपर्यंत एकत्रितरित्या घ्यायचा आहे. त्यातील समस्या व त्रुटी दूर करण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत असेल. नवे धोरण अंमलात आणण्याचा अंतिम निर्णय १ जानेवारी २०२४ रोजी सर्व विद्यापीठे आणि शासनाकडून घोषित केला जाईल. 

३० जूनपर्यंत स्वायत्तता द्यादरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने काही महाविद्यालयांना याच वर्षी नव्याने स्वायत्तता जाहीर केली आहे. तेथे नवे शैक्षणिक धोरण या शैक्षणिक वर्षांपासून लागू होणार आहे, त्यामुळे त्यांना स्वायत्ततेची अंतिम मंजुरी देण्याची प्रक्रिया विद्यापीठांनी ३० जूनपर्यंत पूर्ण करावी असे आदेश शासनाने दिले आहेत. या महाविद्यालयांना नवा अभ्यासक्रम याच वर्षापासून अंमलात आणणे अनिवार्य केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीEducation Sectorशिक्षण क्षेत्र