शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

बत्तीस हजार क्विंटल सोयाबीनची आवश्यकता

By admin | Updated: April 23, 2015 00:09 IST

१५९७५ क्विंटल उपलब्ध : शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे पेरण्याचे आवाहन

सांगली : जिल्ह्यासाठी ३२ हजार क्विंटल सोयाबीनची गरज असून प्रशासनाकडे महाबीज व अन्य खासगी कंपन्यांकडून १५ हजार ९७५ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. उर्वरित बियाणे शेतकऱ्यांनी प्रक्रिया करून स्वत:कडील वापरावे, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. एन. टी. शिसोदे यांनी केले आहे. स्वत:कडील बियाणे वापरण्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.सांगली जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्व मशागतीला वेग आला आहे. उन्हाळी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून खरीप पेरण्या लवकर होण्याची शक्यता आहे. म्हणून कृषी विभागाकडून पेरणीसाठी आवश्यक बियाणांचा साठा उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. सोयाबीन बियाणांची गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून कृषी विभागाने शेतकऱ्यांकडील बियाणे प्रक्रिया करून वापरण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र असून त्यासाठी ३२ हजार क्विंटल बियाणांची गरज आहे. यापैकी महाबीज आणि खासगी कंपन्यांकडून १५ हजार ९७५ क्विंटल बियाणांची उपलब्धता झाली आहे. उर्वरित बियाणे शेतकऱ्यांनी स्वत:कडील वापरावे. शेतात उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे म्हणून दोन वर्षासाठी वापरता येते. शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांची पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करून उगवण क्षमताही तपासून घेण्याचे आवाहन कृषी सहसंचालक डॉ. शिसोदे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)अडीच लाख पाठ्यपुस्तकांचे वाटप होणारजिल्हा परिषद : आॅनलाईन मागणीनंतर निर्णय; पहिल्या दिवशीच मिळणार पुस्तकेसांगली : जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानातील पहिली ते आठवीच्या वर्गातील दोन लाख ६३ हजार विद्यार्थ्यांना शासनाने मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याच्यादृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. तालुकास्तरावरून आॅनलाईन पुस्तक मागणी नोंदविल्यानंतर पुस्तकांचे वाटप होणार आहे.शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याच्यादृष्टीने शासनाने सर्व शिक्षा अभियानामधून मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून ही योजना अखंडित चालू आहे. यावर्षीही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह खासगी अनुदानातील शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक शाळांकडून पुस्तकांची आॅनलाईन मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये दोन लाख ६३ हजार विद्यार्थीसंख्या आहे. जत तालुक्यात कन्नड शाळांची संख्या जास्त असून, तेथे १३ हजार १५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जत, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज, शिराळा, तासगाव, वाळवा आणि कडेगाव तालुक्यात दोन हजार ५८२ उर्दू शाळांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी तेवढ्याच पाठ्यपुस्तक संचांची गरज आहे. (प्रतिनिधी)