शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

अणुऊर्जा विकासासाठी एकत्रित प्रयत्न हवा : शिवराम भोजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:45 IST

डॉ. भोजे यांनी यावेळी भारतातील अणुसंशोधन व सयंत्राचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, सौरऊर्जेचा वापर वाढला तरी, अणुऊर्जेला पर्याय नाही. अमेरिकेने तिचा वापर विध्वंसासाठी केला. त्यानंतर रशियाने अणुसयंंत्र तयार केले. भारतात जैतापूरमध्ये प्रकल्पाला विरोध झाला.

ठळक मुद्देशांतिनिकेतनमध्ये प्राचार्य पी. बी. पाटील फोरमतर्फे ‘कर्मयोगी’ पुरस्कार प्रदान सोहळा

सांगली : हजारो वर्षे पुरणारी अणुऊर्जा आपल्याकडे उपलब्ध आहे. वाढत्या लोकसंख्येला तिची प्रचंड आवश्यकता आहे. त्यामुळे अणुप्रकल्पांंविषयीचे गैरसमज सोडून अणुसंशोधन व्हायला हवे. त्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत, असे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांनी व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील जयंतीनिमित्त सोशल फोरमच्यावतीने ‘कर्मयोगी’ पुरस्काराने भोजे यांना सन्मानित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, घोेंगडी आणि पगडी देऊन भोजे यांचा सन्मान केला.

डॉ. भोजे यांनी यावेळी भारतातील अणुसंशोधन व सयंत्राचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, सौरऊर्जेचा वापर वाढला तरी, अणुऊर्जेला पर्याय नाही. अमेरिकेने तिचा वापर विध्वंसासाठी केला. त्यानंतर रशियाने अणुसयंंत्र तयार केले. भारतात जैतापूरमध्ये प्रकल्पाला विरोध झाला. २१ देशांत ४३८ अणुसयंत्रे आहेत. जपानमध्ये त्सुनामीमुळे अणुभट्टीचे नुकसान झाले, पण स्फोटात एकही माणूस दगावला नाही. विध्वंस होण्याच्या गैरसमजातून विरोध होत आहे.

डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, वैज्ञानिक दृष्टीचा वापर करणार नसाल, तर आजचा पुरस्कार अनाठायी ठरेल. त्यासाठी विज्ञानवादी होण्याची गरज आहे.संचालक गौतम पाटील यांनी स्वागत केले. माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, डॉ. भोजे यांनी अणुऊर्जा लोकहितासाठी वापरली. हा विज्ञानवादी विचार शांतिनिकेतनने कायम जपला आहे.

यावेळी उमा भोजे व डॉ. भोजे यांच्या मातोश्री कोंडुबाई यांचाही सत्कार केला. तानाजीराव मोरे यांनी आभार मानले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे, शिवाजीराव पवार, माधवराव माने, सनतकुमार आरवाडे, वैभव नायकवडी, बी. आर. थोरात, डॉ. बाबूराव गुरव, धनाजी गुरव, गौतमीपुत्र कांबळे, डॉ. सपना भाटे, ब्रिगेडीयर सुरेश पाटील, श्रीनिवास डोईजड, डॉ. कुबेर मगदूम, एम. के. अंबोळे उपस्थित होते.

 

  • कल्पक्कम अणुभट्टीचे : काम अपूर्ण

डॉ. भोजे म्हणाले, ऊर्जेचा अपव्यय थांबलाच पाहिजे. ७५० चॅनेल्स दिवसभर सुरू असतात. पुढच्या पिढीसाठी ऊर्जा वाचवली नाही, तर पृथ्वीवर राहणे मुश्किल होईल. वाढत्या तापमानाने पावसाचे चक्र बदलले आहे. आर्थिक विकास की पृथ्वीचे रक्षण हे ठरवून काम केले पाहिजे. तामिळनाडूतील कल्पक्कम अणुभट्टीचे साडेतीन हजार कोटींचे काम २००३ पासून अपूर्ण आहे. एकत्रित कामाची दिशा नसल्याने अडचणी येत आहेत. अणुसंशोधन विकासासाठी उच्च तंत्रज्ञान व मोठ्या भांडवलाची आवश्यकता आहे.

 

टॅग्स :Sangliसांगली