शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

खानापूरच्या उपकेंद्रासाठी राजकीय इच्छा आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST

विटा : शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बस्तवडे (ता. तासगाव) येथे तत्वतः मान्यता दिली ...

विटा : शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बस्तवडे (ता. तासगाव) येथे तत्वतः मान्यता दिली असताना आमदार अनिल बाबर यांनी उडवाउडवीची आणि सोयीस्कर उत्तरे देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आमदार बाबर यांची खानापूर येथे उपकेंद्र होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आहे का? हे उपकेंद्र खानापूरला व्हावे असे त्यांच्या मनात तरी आहे का? असा प्रश्न विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे युवा नेते वैभव पाटील यांनी विटा येथे पत्रकार परिषदेत विचारला.

वैभव पाटील म्हणाले, उपकेंद्र खानापूरला होण्यासाठी आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य धैर्यशील पाटील यांना भेटलो. त्यावेळी त्यांनी विद्यापीठ उपकेंद्र बस्तवडे येथे होण्यासाठी शासनाचा अधिकृत निर्णय झाला असल्याचे सांगितले. मात्र, जबाबदार लोकप्रतिनिधी असलेले आमदार बाबर याबाबत बाेलण्यास तयार नाहीत. शिक्षणमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेल्या बाबर यांना या निर्णयाची कशी माहिती दिली नाही. सरकारमध्ये आपले वजन असेल तर ते वापरून आमदारांनी खानापूर उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा खानापूरला उपकेंद्र व्हावे असे त्यांच्याच मनात नसणार, अशी जनभावना तयार होईल. तोपर्यंत किमान सोमवारी बस्तवडे येथे जागा पाहणीसाठी येणारी कमिटी थांबवावी, अशी मागणी यावेळी वैभव पाटील यांनी केली.

चौकट :-

खानापुरात आज चक्काजाम...

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र बस्तवडे येथे करण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी जागा पाहणीसाठी बस्तवडेत कमिटी येणार आहे. या कमिटीचा निषेध म्हणून आणि खानापूर येथे उपकेंद्र व्हावे, या मागणीसाठी सोमवार, दि. ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता खानापूर येथे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे खानापूर तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले.

फोटो :- वैभव पाटील यांचा वापरणे.