शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

बेकायदेशीर काही चालू देणार नाही

By admin | Updated: May 24, 2016 00:55 IST

कृष्णकांत उपाध्याय : तक्रार येताच चौकशी करून कारवाई करण्यास प्राधान्य

कृष्णकांत उपाध्याय... सांगलीचे नवे अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख... पहिल्यांदाच सांगलीकरांना या पदावर आयपीएस अधिकारी मिळाला आहे. ‘डॅशिंग’ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी प्रशिक्षणाचा त्यांचा सहा महिन्यांचा कालावधी सांगली जिल्ह्यात पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहे. त्यांना पदभार स्वीकारुन पंधरा दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. अवैध धंद्यांवर कारवाईचा सपाटा त्यांनी लावला आहे. गुन्हेगारांवर कारवाई, वाहतूक नियोजन, रात्रीची दंगामस्ती, गुन्हेगारी रोखणे, यासाठी विशेष मोहीम आखण्याचे त्यांचे नियोजन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : वाराणसी ते सांगली हा तुमचा प्रवास कसा झाला? मराठी भाषेची अडचण आली का?उत्तर : उत्तर प्रदेशमधील वाराणसी माझे गाव. बी. टेक्. शिक्षण होताच युपीएससीतून आयपीएसपदी निवड झाली. यातून माझी महाराष्ट्रात नियुक्ती झाली. आता मी महाराष्ट्रीयन आहे. मराठी भाषा मला येईल का नाही, अशी भीती होती. पण पोलिस दलात सेवा सुरू केल्यानंतर ही भाषा हळूहळू अवगत झाली. अक्कलकोटमध्ये असताना लोकांच्या माध्यमातून ही भाषा शिकलो. आता मी मराठीतूनच संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ही भाषा खूप चांगली व सहजपणे शिकता येते. प्रश्न : अक्कलकोटमधील कामाचा अनुभव कसा राहिला? किती दिवस सेवा झाली?उत्तर : अक्कलकोटमध्ये काम करताना खूप चांगला अनुभव आला. बरेच काही शिकता आले. तेथील जिल्हा पोलिस प्रमुखांनीही सहकार्य केले. लोक कार्यालयात येऊन बेकायदेशीर धंद्यांची माहिती द्यायचे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कारवाई करता आली. त्याठिकाणी दीड वर्ष सेवा झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. लोकांना कायदा हातात घेऊ दिला नाही. लोकांच्या तक्रारी येताच कारवाई केली. त्यानंतर पुन्हा सांगलीला बदली झाली. प्रश्न : सांगलीत यापूर्वी तुम्ही काम केले आहे. त्यावेळी पोलिसांसमोर तुम्हाला कोणती आव्हाने दिसून आली?उत्तर : होय, दोन वर्षांपूर्वी मी सांगलीत काम केले आहे. २०१२ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगातून आयपीएसपदी निवड झाली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक या पदाचा प्रशिक्षण कालावधी सांगलीत पूर्ण केला. त्यामुळे जिल्ह्याची माहिती आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. वाहनांची संख्याही अत्यंत कमी आहे. स्मार्ट फोन, लॅपटॉप हे नियंत्रण कक्षात आहे. पण हीच सुविधा पोलिस ठाणे स्तरावर उपलब्ध करुन दिली, तर त्याचा फार चांगला परिणाम दिसून येईल. पोलिस दल सर्व सोयींनी सुसज्ज पाहिजे. सोयी-सुविधा नसल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामावर दिसून येतो.प्रश्न : अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून काम करताना कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे?उत्तर : कोणतीही तक्रार आली, तर त्याची चौकशी करुन तातडीने कारवाई करण्यास प्राधान्य दिले जाईल. तक्रारी वैयक्तिक किंवा दोन गटातील असतात. अवैध धंद्यांविरुद्धही तक्रार असू शकते. पोलिस ठाण्यात तक्रारीची दखल घेतली जात नसेल, तर नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. अवैध धंद्यांसह बेकायदेशीर काही सुरु असेल तर त्याचीही माहिती द्यावी. ही माहिती समक्ष द्यावी किंवा लेखी पत्र पाठवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. बेकायदेशीर काहीच चालू देणार नाही. कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली आहे. पोलिस ठाणे स्तरावरही कारवाई सुरु असल्याचे दिसून येते. अवैध धंद्यांवर कारवाई करणे, हा कामाचा दोन टक्के भाग आहे. याशिवाय गुन्ह्यांचा तपास, आरोपींना शिक्षा लावणे, हे प्रमुख काम आहे. त्यास प्राधान्य दिले जाईल. प्रश्न : गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती पावले उचलणार आहात?उत्तर : गुन्हेगारीचा आलेख हा नेहमीच चढ-उताराचा असतो. सांगलीच्या गुन्हेगारीचा यापूर्वीच अभ्यास झाला आहे. ही गुन्हेगारी रोखण्याचे विशेष नियोजन केले आहे. यामध्ये ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ ही मोहीम दररोज दोन तास राबविली जाईल. नाकाबंदी सातत्याने लावली जाईल. रात्री उशिरापर्यंत सुरु राहणारी हॉटेल्स, ढाबे, परमिट रुम, पानटपऱ्या बंद केल्या जातील. रात्री अकरानंतर शहर शांत झाले पाहिजे. सामान्य माणसाला सुरक्षिततेची भावना वाटली पाहिजे, असे काम केले जाईल. रात्री अकरानंतर सर्व व्यवहार बंद झाले पाहिजेत, असा आदेश काढणार आहे. या आदेशाचे पालन केले आहे का नाही, हे पाहण्यासाठी मी स्वत: रस्त्यावर उतरणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली जाईल. पुढील आठवड्यात जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची गुन्हेगारी आढावा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत दैनंदिन कामाबाबत मार्गदर्शन व सूचना केल्या जातील. - सचिन लाड, सांगली