शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

महिला पोलिस नसल्याने पाणी नाही

By admin | Updated: January 9, 2017 00:31 IST

आटपाडीत ‘पाटबंधारे’चा हास्यास्पद खुलासा : शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग

अविनाश बाड ल्ल आटपाडी‘अहो, महिला पोलिस आटपाडीत उपलब्ध नाहीत, म्हणून आम्ही तलावातील पाणी शेतीला सोडू शकत नाही..!’ आटपाडीतील शेतकऱ्यांना गेले २० दिवस पाटबंधारे विभागाचे अधिकारी असे हास्यास्पद उत्तर देऊन त्यांची कुचेष्टा करीत आहेत. गेली २१ वर्षे दुष्काळग्र्रस्तांनी अनेक आंदोलने केल्यानंतर, तलावात आलेल्या टेंभूच्या पाण्याने शेतात पिके डोलण्याऐवजी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग सुरू केला आहे.बनपुरी (ता. आटपाडी) गावाजवळ कचरेवस्ती तलाव आहे. या तलावात सोडलेले टेंभू योजनेचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या ज्वारीच्या पिकाला फुकट नव्हे, तर रितसर पाणीपट्टीची रक्कम भरून घेऊन मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पाटबंधारे विभागाने पाणी सोडलेही होते. पण तलावाच्या परिसरात असलेल्या काही शेतकऱ्यांनी दि. १६ डिसेंबरपासून पाणी बंद करून खाली पाणी सोडण्यास नकार दिला आहे. त्यांचे म्हणणे असे की, पुन्हा तलावात कधी पाणी सोडणार, हे नक्की नाही आणि पुन्हा टेंभूचे पाणी तलावात सोडले नाही, तर पाणीटंचाई निर्माण होईल. भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याऐवजी भले आम्हाला तुरुंगात टाका, अशी टोकाची भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यांची भीती आणि पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार पाहता, अनाठायी नसली तरी, त्यांना वस्तुस्थिती सांगून त्यांची समजूत घालण्याऐवजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग करीत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे.या तलावाची पाणी साठवण क्षमता ५५.८३ दशलक्ष घनफूट असून, सध्या ३२.८३ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा वापरण्यायोग्य आहे. यापैकी आरक्षित पाणीसाठा ठेवून उर्वरित पाणी ज्वारीच्या वाळून चाललेल्या पिकाला तात्काळ द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पण पाटबंधारे विभाग वेळकाढूपणाची भूमिका घेताना दिसत आहे. गेल्या २० दिवसात अधिकाऱ्यांनी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना वस्तुस्थिती सांगून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामध्ये यश येत नाही, तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करून पोलिस बंदोबस्त घेऊनही पाणी सोडले नाही. २० दिवस शेतकरी पाटबंधारे कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. पिके वाळून चालली आहेत.या पार्श्वभूमीवर शुक्र्रवारी (दि. ६ जानेवारी) रोजी जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली येथील पाटबंधारे कार्यालयात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पण अधिकाऱ्यांनी पाणी न सोडण्याचे एकमेव कारण हे महिला पोलिस उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. वास्तविक ही जबाबदारी पोलिसांची आहे. उपविभागीय अभियंता तानाजी माळी यांच्यासमोर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर देढे यांनी, ‘तुम्ही तारीख सांगा, बंदोबस्त देण्याची जबाबदारी आमची आहे’, असे आंदोलकांसमोर सांगितले. त्यामुळे पाटबंधारे विभाग वेळकाढूपणा का करीत आहे, हे समजणे कठीण आहे. शिवाय दोन्हीही बाजूच्या शेतकऱ्यांत गैरसमज पसरवून त्यांच्यात भांडणे लावण्याचा उद्योग करीत आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.आम्ही सोडतो : तुम्ही बंद करा!शेतकऱ्यांनी दबाव वाढविल्यावर अधिकारी तलावावर गेले आणि विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणाले, ‘आम्ही पाणी सोडतो, आम्ही इथून गेलो की मागे तुम्ही बंद करा!’ शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या साक्षीनेच असा आरोप केला. कचरेवस्ती तलावातील १६ दशलक्ष घनफूट पाण्याचे पिण्यासाठी आरक्षण असल्याचे शाखा अभियंता व्ही. आर. केंगार यांनी सांगितले, तर उपविभागीय अभियंता तानाजी माळी यांनी २५ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केल्याचे सांगून, सावळा गोंधळ स्पष्ट केला.