शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

हिराबागच्या सात एकर जागेवर महापालिकेची मोहोरच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST

सांगली : शहरातील हिराबाग वाॅटर वर्क्सच्या सात एकर जागेवर अद्यापही महापालिकेचे नाव लागलेले नाही. गेली ५७ वर्षांपासून महापालिका प्रशासनाने ...

सांगली : शहरातील हिराबाग वाॅटर वर्क्सच्या सात एकर जागेवर अद्यापही महापालिकेचे नाव लागलेले नाही. गेली ५७ वर्षांपासून महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. भविष्यात ७५ कोटीच्याजागेवर पाणी सोडावे लागले तर त्याला कोण जबाबदार? असा सवाल करत माजी नगरसेवक हणमंत पवार यांनी याबाबत आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ही जागा तातडीने नावावर करून घेण्याची मागणी केली आहे.

महापालिका क्षेत्रातील अनेक खुल्या भूखंडांची राजरोसपणे विक्री सुरू आहे. आरक्षण व ओपन स्पेसच्या जागांवर महापालिकेचे नावच लावलेले नाही. परिणामी मूळ मालकांकडून या जागा ताब्यात घेऊन परस्परच विकल्या जात आहेत. तरीही महापालिका प्रशासन व नगररचना विभाग झोपा काढत आहेत. असाच धक्कादायक प्रकार हिराबाग वाॅटर वर्क्सच्या जागेबाबत समोर आला आहे. माजी नगरसेवक हणमंत पवार यांनी याबाबत प्रशासनाला सावध केले आहे. त्यांनी आयुक्तांनीही पत्र पाठविले आहे.

तत्कालीन सांगली संस्थानाने हिराबाग येथील सात एकर जागा सांगली नगरपालिकेला पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यासाठी दिली होती. गेली ५७ वर्षे या जागेवर जलशुद्धिकरण केंद्र, पाण्याची टाकी, पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाचे कार्यालय आणि उपायुक्त व इतर कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान आहे. तसेच एक बालवाडीची शाळाही या परिसरात आहे; पण जागेच्या सातबाऱ्यावर अजूनही चिंतामणराव पटवर्धन यांचेच नाव दिसून येते. तत्कालीन नगरपालिका व आताच्या महापालिकेने अजूनही ही जागा आपल्या नावावर केलेली नाही. सध्याच्या बाजारभावाने या जागेची किंमत जवळपास ७० ते ७५ कोटींच्या घरात असल्याचे पवार यांनी सांगितले. भविष्यात ही जागा मूळ मालकांकडून परत मागितली जाऊ शकते. त्यामुळे महापालिकेने तातडीने या जागेवर आपले नाव लावण्याची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

चौकट

कोट्यवधीची जागा वाचवा : पवार

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली हिराबाग वाॅटर वर्क्सच्या जागेबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांना पत्र पाठविले आहे. या जागेवर प्रॉपर्टीधारक म्हणून महापालिकेचे अद्यापही नाव नाही. त्यामुळे चिंतामणराव पटवर्धन यांचे नाव कमी करून महापालिकेचे नाव लावण्यासाठी सिटी सर्व्हे कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून कोट्यवधीची ही जागा वाचविण्यासाठी नगररचना विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी हणमंत पवार यांनी केली.