शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तीनशे ग्रामपंचायतींचे ‘आॅडिट’ नाही

By admin | Updated: October 3, 2015 23:47 IST

सतरा हजार त्रुटी : लाखोंच्या घोटाळ्यांकडे ग्रामसेवकांचे दुर्लक्ष

सांगली : जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायती असून, त्यापैकी तीनशे ग्रामपंचायतींचे पाच वर्षात लेखापरीक्षणच झालेले नाही. लेखापरीक्षण झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा असल्याचे उघडकीस आले आहे. तेथे अपहार, साहित्य खरेदीच्या पावत्यांतील तफावत आणि अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. याबद्दल जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही ग्रामसेवकांकडून लेखापरीक्षणातील १७ हजार ४०२ त्रुटींकडे दुर्लक्ष होत आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना थेट कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत आहे. या निधीतून ग्रामपंचायती विकासकामे राबवत आहेत. काही ग्रामपंचायतींकडून निधीचा गैरवापर होत आहे. त्यामुळे दरवर्षी ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण झाले पाहिजे, अशी मागणी आहे. मात्र जिल्ह्यातील तीनशे ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षणच झालेले नाही. यामुळे ग्रामपंचायतीमधील लाखो रुपयांचा घोटाळा उजेडातच येत नसल्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत. उर्वरित ४०४ ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण झाले आहे. मात्र तेथील निधी खर्चातील अनियमितता यासह विविध गैरकारभाराच्या १७ हजार ४०२ त्रुटी लेखा परीक्षकांनी काढल्या आहेत. या त्रुटी दूर करण्याच्यादृष्टीने ग्रामपंचायतीकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. यामुळे वर्षानुवर्षे त्या त्रुटी तशाच राहिल्या आहेत. आक्षेपांची संख्या तालुका आक्षेप आटपाडी ६६ जत ३५८६ कडेगाव २८४८ क़महांकाळ १२५५ खानापूर ११७१ मिरज ३४१३ पलूस ७४४ शिराळा १६२३ तासगाव १२०७ वाळवा १४८९ एकूण १७४०२