शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

देशात अनिवासी पंतप्रधानांची मोठी समस्या

By admin | Updated: November 22, 2015 00:04 IST

जयंत पाटील : सिंगापूर, मलेशियाला जाऊन प्रश्न सुटणार नाही; कुपवाडमध्ये विविध विकासकामांचा प्रारंभ

कुपवाड : भारत देशाला सध्या अनिवासी पंतप्रधान सापडले आहेत. ते देशात नसतातच, ही देशवासीयांसमोरील मोठी समस्या बनली आहे. काल-परवा इंग्लंडला गेले होते. त्यानंतर लगेच सिंगापूर, मलेशियाला गेले. त्यांच्या विदेश दौऱ्याबाबत सध्या सोशल मीडियावरून खरमरीत टीका होऊ लागली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केले. कुपवाडमधील विविध विकास कामांच्या प्रारंभप्रसंगी मल्हारराव होळकर चौकामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास नगरसेवक संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने, स्रेहा औंधकर, शेडजी मोहिते, माजी महापौर मैनुद्दीन बागवान प्रमुख उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, सध्या महागाईने जनता त्रस्त बनली आहे. तूरडाळीची किंमत दोनशेच्या घरात पोहोचली आहे. मध्यमवर्गीयांच्या खिशाला तोशीष बसू लागली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शासनाच्या कालावधित डाळीचे दर नियंत्रणात होते. स्वस्त धान्य दुकानातूनही आम्ही धान्य देत होतो. सध्या मात्र देशात नियोजनाचा अभाव आहे. कांदा आणि डाळीबाबत झाले ते पुढे साखरेबाबतही होणार आहे. जगात महागाईचा निर्देशांक कमी असताना देशातील महागाईचाही निर्देशांक कमी होणे गरजेचे आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक बाजारपेठेत कमी झाल्यानंतर भारतात मात्र त्यावर कर बसवून हजारो कोटी कमवून तिजोरी भरली. पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असताना भारतीय समुदायासमोर देशाचे गुणगाण गाण्याऐवजी देशातील कमजोरी दाखवू लागले आहेत. आपल्या देशातील कमजोरी बाहेरील देशात जाऊन सांगणे त्यांच्याकडून अभिप्रेत नाही, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी नगरसेवक विष्णू माने, हरिदास पाटील, संजय औंधकर, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांची भाषणे झाली. यावेळी नगरसेविका आशा शिंदे, विलास सर्जे, मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक नानासाहेब लवटे, किरण सूर्यवंशी, प्रकाश व्हनकडे, ताजुद्दीन तांबोळी, मनगू सरगर, मारुती पाटील, बामणोलीचे उपसरपंच अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)