शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’च्या आवर्तनाचे आदेशच नाहीत!--- लोकमत विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:34 IST

सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याचे सोमवारी सायंकाळी अधिकाºयांनी सांगितले. मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाणी सोडण्यात येणार

सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याचे सोमवारी सायंकाळी अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी असे कोणतेही आदेश अजून तरी कोणीही दिले नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, लाभक्षेत्रातील शेतकरी व विरोधी पक्षांचा वाढता असंतोष पाहता, पाणी सोडण्यासाठी खा. संजयकाका पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गेल्या महिनाभरापासून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. वाढती थकबाकी व थकबाकी वसुलीस शेतकऱ्यांकडून अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याने आवर्तनाचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे. एकीकडे पाणी लांबत असतानाच लाभक्षेत्रातील शेतीचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर खा. पाटील यांनी शासनदरबारी विशेष प्रयत्न करून योजनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र, सोमवारी सायंकाळपर्यंत तरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांकडे पाणी सोडण्याबाबतचे कोणतेही आदेश नव्हते.

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांबरोबरच कॉँग्रेस, राष्टÑवादीसह इतर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पाणी सोडण्यासाठी मिरजेत मोर्चा काढला होता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौºयावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळेच भाजप नेत्यांची धावपळ सुरू होती.दुसरीकडे जिल्ह्यातील टेंभू व ताकारी योजनेप्रमाणे थकबाकी वसुलीस प्रतिसाद देत पाणी मिळावे यासाठी शेतकºयांकडूनही कोणतेही पाऊल टाकले जात नसल्याचे चित्र आहे.तिन्ही योजनांसाठी : पन्नास कोटींचा निधीम्हैसाळ योजना तातडीने सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ५० कोटी रुपये मंजूर केले असून त्यासंबंधीच्या कागदपत्रांवर सहीदेखील झाल्याची माहिती खा. संजयकाका पाटील यांनी सोमवारी रात्री दिली. मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील म्हैसाळ (२९.६६ कोटी), टेंभू (१७.५ कोटी) आणि ताकारी (३ कोटी) या तिन्ही योजनांची थकबाकी या निधीतून भरली जाणार आहे. विशेषत: थकबाकीमुळे सध्या बंद असलेल्या ‘म्हैसाळ’ची थकबाकी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून तातडीने भरली जाणार असून पाणी सुरू करण्यात येणार आहे.

धडपडीला यश नाहीरविवार दि. ११ रोजी मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा दौºयावर येणार होते व त्यांच्या उपस्थितीत कवठेमहांकाळ येथे शेतकरी मेळावा होणार होता. या मेळाव्याच्या अगोदर पाणी सुटावे, यासाठी खा. पाटील प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटही घेतली होती. मात्र, अद्याप यास यश आले नसल्याचे चित्र आहे.तीस कोटींवर थकबाकीम्हैसाळ योजनेची एकूण ३४ कोटी ५० लाखांची थकबाकी असून यातील साडेपाच कोटी शासनाने भरले आहेत. त्यामुळे आता थकबाकी २९ कोटींवर आहे. प्रशासनातर्फे विविध मार्गाने वसुलीसाठी प्रयत्न केले जात असले तरी त्यास प्रतिसाद मिळत नाही.

म्हैसाळ योजनेच्या थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यास शेतकºयांकडून प्रतिसाद मिळत नाही. पाणी सोडण्याबाबतही शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.- सूर्यकांत नलवडे, कार्यकारी अभियंता

 

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूक