शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

राष्ट्रवादीबद्दल कॉँग्रेस नेत्यांमध्ये संताप

By admin | Updated: March 18, 2015 23:55 IST

मुंबईत आज बैठक : जिल्ह्यातील पदाधिकारी तक्रार करणार, मैत्रीपूण संबंध तोडण्याचा निर्धार

सांगली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव संमत करून राष्ट्रवादीने केलेल्या राजकारणामुळे जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीअंतर्गत वातावरण तापले आहे. हा खेळ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्याने उद्या (गुरुवारी) मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत याविषयीचे गाऱ्हाणे मांडले जाणार आहे. यापुढे कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादीशी संगत करू नये, असा आग्रह दोन्ही जिल्हाध्यक्षांनी धरला आहे. सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांना विधानपरिषद सभापती पदावरुन हटविण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपशी संगनमत केल्याने, जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीविषयी प्रचंड नाराजी पसरली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या प्रामाणिकपणाबद्दल संशयकल्लोळ निर्माण झाला होता. काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात छुप्या खेळी राष्ट्रवादीकडून होत असल्याच्या तक्रारीही झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका एकत्र लढविण्याविषयी चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादीने देशमुखांविरोधात राजकारण केल्याने वातावरण बिघडले आहे. जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट करून देताना, यापुढे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीबरोबर मैत्रीचा हात पुढे करू नये, अशी मागणी केली आहे. मुंबईत उद्या प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत देशमुखांविषयी झालेल्या राजकारणावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजीही व्यक्त केली जाणार आहे, असे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. पाटील म्हणाले की, आम्ही एका बाजूला मैत्रीचा हात पुढे करीत असताना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असा विश्वासघात करणे चुकीचे आहे. शिवाजीराव देशमुख हे ज्येष्ठ नेते असताना, विनाकारण त्यांना पदावरून हटविण्यासाठी केलेली राष्ट्रवादी व भाजपची ही खेळी अत्यंत चुकीची आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीच्या कुरघोड्या नव्या नाहीत. वारंवार आम्ही राष्ट्रवादीशी मैत्री नको म्हणून नेत्यांकडे मागणी करीत आहोत. शिवाजीराव देशमुख यांना पदावरून हटविण्याचे कोणतेही ठोस कारण नव्हते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना का हटविले, याचा खुलासा करावा. यापुढे कोणत्याही निवडणुकीत पक्षाने राष्ट्रवादीशी मैत्री करू नये. राष्ट्रवादीवर यापुढे विश्वास ठेवू नये.- मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पोटनिवडणुकीतले धोरणराष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रथम कॉँग्रेसनेच पुढाकार घेतला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून त्याबाबतचा निर्णयही कॉँग्रेसने प्रथम घेतला. त्याचवेळी विधानपरिषदेच्या सभापतिपदावरून कॉँग्रेसचे नेते शिवाजीराव देशमुखांना हटविण्यासाठी राष्ट्रवादीने खेळी केली. दोन्ही पक्षांच्या या भूमिकेची तुलना आता जिल्ह्यात रंगली आहे. पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनीही या गोष्टीचा उल्लेख करीत राष्ट्रवादीकडे खिलाडूवृत्तीचा अभाव असल्याची खंत व्यक्त केली.