शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

...तर सिंचन योजना ‘बीओटी’वर चालवा

By admin | Updated: April 7, 2015 01:16 IST

विलासराव जगताप : तातडीने पुरेसा निधी मिळवून देण्याची मागणी

सांगली : म्हैसाळसह जिल्ह्यातील अन्य सिंचन योजनांना पुरेसा निधी देण्याची गरज आहे. शासनाच्या बजेटमध्ये करण्यात आलेली तरतूद कमी आहे. त्यामुळे वाढीव तरतूद शासनाने करावी. निधीची अडचण असेल तर ‘बीओटी’ (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) तत्त्वावर तरी या योजना चालवाव्यात, अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, सिंचन योजनांबाबत मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, अर्थमंत्री अशा सर्वांकडे आम्ही पत्राद्वारे निधीची मागणी केली आहे. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात सध्या करण्यात आलेली तरतूद पुरेशी नाही. तरतूद केलेल्या रकमेपेक्षा अधिकची ठेकेदारांची देणीच आहेत. त्यामुळे योजना पूर्ण करून क्षमतेने चालविण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. राज्य शासन निश्चितपणे आम्हाला निधी देईल, अशी अपेक्षा आहे. निधीची काही अडचण असेल तर या योजना खासगी तत्त्वावर चालविण्यात याव्यात, अशीही मागणी करू. योजना कार्यान्वित राहणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात दिलेल्या पत्रावर युतीच्या जिल्ह्यातील पाचही आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आम्ही एकत्रित यासाठी प्रयत्न करीत आहोत. एआयबीपी (वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम) केंद्र शासनाने बंद केली आहे. त्यामुळे राज्य शासनालाच यासाठी तजवीज करावी लागेल. केंद्र शासनाकडून नवी कोणती योजना जाहीर होणार, याची कल्पना नाही, परंतु तोपर्यंत आवश्यक निधी देऊन योजना सुरू करणे महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)जागा जास्त हव्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जागावाटप करताना जत तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे. कमी गावांची संख्या असलेल्या पलूस आणि कडेगावला एकीकडे चार जागा मिळत असताना १२३ गावांच्या जत तालुक्यावर अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करीत गावांच्या संख्येचा आणि मतदारसंघाचा विचार जागावाटपात व्हावा, अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली. पदे नको, कामे करामंत्रिमंडळ विस्तार किंवा महामंडळाच्या वाटपात कोणत्याही अपेक्षा नाहीत. लोकांचे जे प्रश्न मांडत आहोत ते सोडवावेत, एवढीच अपेक्षा असल्याचे जगताप म्हणाले.