शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

...तर सिंचन योजना ‘बीओटी’वर चालवा

By admin | Updated: April 7, 2015 01:16 IST

विलासराव जगताप : तातडीने पुरेसा निधी मिळवून देण्याची मागणी

सांगली : म्हैसाळसह जिल्ह्यातील अन्य सिंचन योजनांना पुरेसा निधी देण्याची गरज आहे. शासनाच्या बजेटमध्ये करण्यात आलेली तरतूद कमी आहे. त्यामुळे वाढीव तरतूद शासनाने करावी. निधीची अडचण असेल तर ‘बीओटी’ (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) तत्त्वावर तरी या योजना चालवाव्यात, अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, सिंचन योजनांबाबत मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, अर्थमंत्री अशा सर्वांकडे आम्ही पत्राद्वारे निधीची मागणी केली आहे. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात सध्या करण्यात आलेली तरतूद पुरेशी नाही. तरतूद केलेल्या रकमेपेक्षा अधिकची ठेकेदारांची देणीच आहेत. त्यामुळे योजना पूर्ण करून क्षमतेने चालविण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. राज्य शासन निश्चितपणे आम्हाला निधी देईल, अशी अपेक्षा आहे. निधीची काही अडचण असेल तर या योजना खासगी तत्त्वावर चालविण्यात याव्यात, अशीही मागणी करू. योजना कार्यान्वित राहणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात दिलेल्या पत्रावर युतीच्या जिल्ह्यातील पाचही आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आम्ही एकत्रित यासाठी प्रयत्न करीत आहोत. एआयबीपी (वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम) केंद्र शासनाने बंद केली आहे. त्यामुळे राज्य शासनालाच यासाठी तजवीज करावी लागेल. केंद्र शासनाकडून नवी कोणती योजना जाहीर होणार, याची कल्पना नाही, परंतु तोपर्यंत आवश्यक निधी देऊन योजना सुरू करणे महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)जागा जास्त हव्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जागावाटप करताना जत तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे. कमी गावांची संख्या असलेल्या पलूस आणि कडेगावला एकीकडे चार जागा मिळत असताना १२३ गावांच्या जत तालुक्यावर अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करीत गावांच्या संख्येचा आणि मतदारसंघाचा विचार जागावाटपात व्हावा, अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली. पदे नको, कामे करामंत्रिमंडळ विस्तार किंवा महामंडळाच्या वाटपात कोणत्याही अपेक्षा नाहीत. लोकांचे जे प्रश्न मांडत आहोत ते सोडवावेत, एवढीच अपेक्षा असल्याचे जगताप म्हणाले.