शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

...तर राजू शेट्टींनी सरकारमधून बाहेर पडावे

By admin | Updated: March 18, 2015 00:04 IST

जयंत पाटील : समडोळी, मौजे डिग्रजला आभार दौरा; कार्यकर्त्यांशी संवादे

कसबे डिग्रज : शेतकरी आणि संपूर्र्ण ग्रामीण भागाची गळचेपी करणारा भूमी अधिग्रहण कायदा आणि कच्ची साखर निर्यात धोरण तसेच सहकारी संस्थांबाबतचे धोरण याबाबत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. पण शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे खा. राजू शेट्टी सत्तेला चिकटून आहेत. त्यांना खरोखरच स्वाभिमान असेल, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान जयंत पाटील यांनी शेट्टी यांना दिले. समडोळी, मौजे डिग्रज येथील आभार दौऱ्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, आमदारकी, मंत्रिपदाची आशा यामुळे राजू शेट्टींची अवस्था दयनीय आहे. शेट्टींनी स्वाभिमान गहाण टाकला आहे. शेतकऱ्यांना भांडवलधार्जिण्या सरकारच्या दावणीला बांधले आहे. हिम्मत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे. सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कधीही कमी पडणार नाही. मी कधीही ग्रामपंचायत, सोसायटीच्या स्थानिक निवडणुकांत लक्ष घालत नाही. त्यामुळे सोसायटी निवडणुकांच्या निकालामुळे कोणीही हुरळून जाऊ नये, असेही आ. जयंत पाटील यांनी सांगितले. मौजे डिग्रज आणि समडोळी येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कसबे डिग्रज, मौजे डिग्रज या नवीन काम सुरू झालेल्या पुलाची पाहणीही करण्यात आली. यावेळी उद्योजक भालचंद्र पाटील, भाऊसाहेब मगदूम, अजयसिंह चव्हाण, हरिदास पाटील, वैभव पाटील, प्रमोद आवटी, सुरगौंडा पाटील, भास्कर पाटील, रवी माणगावे, संजय हजारे उपस्थित होते. (वार्ताहर)सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाने अडचणीत..गतवेळेच्या शासनाने आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कच्ची साखर निर्यात लवकर सुुरू केली होती. त्यामुळे बाजारात साखरेचे भाव स्थिर होते; पण सध्या साखरेचे भाव २३०० पर्यंत खाली येत आहेत. त्यामुळे ऊसदर कोसळत आहे. २५०० दर देणारे कारखाने अडचणीत येत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.