शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

...तर राजू शेट्टींनी सरकारमधून बाहेर पडावे

By admin | Updated: March 18, 2015 00:04 IST

जयंत पाटील : समडोळी, मौजे डिग्रजला आभार दौरा; कार्यकर्त्यांशी संवादे

कसबे डिग्रज : शेतकरी आणि संपूर्र्ण ग्रामीण भागाची गळचेपी करणारा भूमी अधिग्रहण कायदा आणि कच्ची साखर निर्यात धोरण तसेच सहकारी संस्थांबाबतचे धोरण याबाबत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. पण शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे खा. राजू शेट्टी सत्तेला चिकटून आहेत. त्यांना खरोखरच स्वाभिमान असेल, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान जयंत पाटील यांनी शेट्टी यांना दिले. समडोळी, मौजे डिग्रज येथील आभार दौऱ्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, आमदारकी, मंत्रिपदाची आशा यामुळे राजू शेट्टींची अवस्था दयनीय आहे. शेट्टींनी स्वाभिमान गहाण टाकला आहे. शेतकऱ्यांना भांडवलधार्जिण्या सरकारच्या दावणीला बांधले आहे. हिम्मत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे. सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कधीही कमी पडणार नाही. मी कधीही ग्रामपंचायत, सोसायटीच्या स्थानिक निवडणुकांत लक्ष घालत नाही. त्यामुळे सोसायटी निवडणुकांच्या निकालामुळे कोणीही हुरळून जाऊ नये, असेही आ. जयंत पाटील यांनी सांगितले. मौजे डिग्रज आणि समडोळी येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कसबे डिग्रज, मौजे डिग्रज या नवीन काम सुरू झालेल्या पुलाची पाहणीही करण्यात आली. यावेळी उद्योजक भालचंद्र पाटील, भाऊसाहेब मगदूम, अजयसिंह चव्हाण, हरिदास पाटील, वैभव पाटील, प्रमोद आवटी, सुरगौंडा पाटील, भास्कर पाटील, रवी माणगावे, संजय हजारे उपस्थित होते. (वार्ताहर)सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाने अडचणीत..गतवेळेच्या शासनाने आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कच्ची साखर निर्यात लवकर सुुरू केली होती. त्यामुळे बाजारात साखरेचे भाव स्थिर होते; पण सध्या साखरेचे भाव २३०० पर्यंत खाली येत आहेत. त्यामुळे ऊसदर कोसळत आहे. २५०० दर देणारे कारखाने अडचणीत येत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.