शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

...तर माझ्या गाडीवर दगड पडले असते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:33 IST

सांगली : सरकार कोणतेही असो, केवळ शेतकºयांच्या हितासाठी प्रस्थापितांविरोधात संघर्ष उभा केला. शेतकºयांना फसवले जात असल्याने शेतकºयांत सरकारबद्दल रोष आहे. त्यामुळेच मंत्र्यांच्या गाड्यांवर दगड पडत आहेत. शेतकºयांचे प्रश्न सुटले असते आणि मी एखाद्या देवमाणसाविरोधात बोललो असतो तर माझ्याच गाडीवर दगड पडले असते, असा टोला सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता ...

सांगली : सरकार कोणतेही असो, केवळ शेतकºयांच्या हितासाठी प्रस्थापितांविरोधात संघर्ष उभा केला. शेतकºयांना फसवले जात असल्याने शेतकºयांत सरकारबद्दल रोष आहे. त्यामुळेच मंत्र्यांच्या गाड्यांवर दगड पडत आहेत. शेतकºयांचे प्रश्न सुटले असते आणि मी एखाद्या देवमाणसाविरोधात बोललो असतो तर माझ्याच गाडीवर दगड पडले असते, असा टोला सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता खा. राजू शेट्टी यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.हुतात्मा गौरव पुरस्काराच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आलेल्या खा. शेट्टी यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर झालेली दगडफेक व त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खा. शेट्टी यांनी जोरदार हल्लाबोल केला.शेट्टी म्हणाले की, शेतकºयांसाठी उभारलेल्या या चळवळीत व्यक्तीव्देषाला कधीच थारा दिला नाही. संघटनेचे आंदोलन एका व्यक्तीच्या विरोधात नसून, सरकारच्या धोरणाच्याविरोधात आहे. शेतकºयांत सरकारबद्दल असंतोष असून, त्या रोषाला प्रत्येक मंत्र्याला सामोरे जावे लगणार आहे. सरकारकडून शेतकºयांना फसवणुकीचे काम सुरू असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेल्या सन्मान योजनेतून शेतकºयांचा अपमानच करण्यात येत आहे. तूर खरेदी करताना सांगण्यात एक येते व परिस्थिती वेगळीच आहे. ज्यांच्या विरोधात आज आंदोलने सुरू आहेत, त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठ्या व्यक्तीविरोधात आम्ही आंदोलने उभारली होती.इस्लामपुरात शेट्टींना फिरकू न देण्याचा व ताकारी येथील सभा उधळून लावण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला आहे यावर खा. शेट्टी म्हणाले की, माझा नारदासारखा संपूर्ण राज्यात संचार सुरू असतो. आजवर मला कोणी अडवले नाही आणि पुढेही कोणी अडविण्याची शक्यता नाही.ते तर खंडणीबहाद्दर!स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इस्लामपूर येथील कार्यालय फोडण्यात आले. यावर खा. राजू शेट्टी म्हणाले की, कार्यालय फोडणारे कोण आहेत, हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. बलात्काराच्या आरोपातील, खुनाचे गुन्हे असलेल्या खंडणी बहाद्दरांनी हा हल्ला केला आहे. ते कोणत्या पक्षात, कोणत्या संघटनेत आहेत, हे लवकरच जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.