शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

...तर माझ्या गाडीवर दगड पडले असते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:33 IST

सांगली : सरकार कोणतेही असो, केवळ शेतकºयांच्या हितासाठी प्रस्थापितांविरोधात संघर्ष उभा केला. शेतकºयांना फसवले जात असल्याने शेतकºयांत सरकारबद्दल रोष आहे. त्यामुळेच मंत्र्यांच्या गाड्यांवर दगड पडत आहेत. शेतकºयांचे प्रश्न सुटले असते आणि मी एखाद्या देवमाणसाविरोधात बोललो असतो तर माझ्याच गाडीवर दगड पडले असते, असा टोला सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता ...

सांगली : सरकार कोणतेही असो, केवळ शेतकºयांच्या हितासाठी प्रस्थापितांविरोधात संघर्ष उभा केला. शेतकºयांना फसवले जात असल्याने शेतकºयांत सरकारबद्दल रोष आहे. त्यामुळेच मंत्र्यांच्या गाड्यांवर दगड पडत आहेत. शेतकºयांचे प्रश्न सुटले असते आणि मी एखाद्या देवमाणसाविरोधात बोललो असतो तर माझ्याच गाडीवर दगड पडले असते, असा टोला सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता खा. राजू शेट्टी यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.हुतात्मा गौरव पुरस्काराच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आलेल्या खा. शेट्टी यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर झालेली दगडफेक व त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खा. शेट्टी यांनी जोरदार हल्लाबोल केला.शेट्टी म्हणाले की, शेतकºयांसाठी उभारलेल्या या चळवळीत व्यक्तीव्देषाला कधीच थारा दिला नाही. संघटनेचे आंदोलन एका व्यक्तीच्या विरोधात नसून, सरकारच्या धोरणाच्याविरोधात आहे. शेतकºयांत सरकारबद्दल असंतोष असून, त्या रोषाला प्रत्येक मंत्र्याला सामोरे जावे लगणार आहे. सरकारकडून शेतकºयांना फसवणुकीचे काम सुरू असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेल्या सन्मान योजनेतून शेतकºयांचा अपमानच करण्यात येत आहे. तूर खरेदी करताना सांगण्यात एक येते व परिस्थिती वेगळीच आहे. ज्यांच्या विरोधात आज आंदोलने सुरू आहेत, त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठ्या व्यक्तीविरोधात आम्ही आंदोलने उभारली होती.इस्लामपुरात शेट्टींना फिरकू न देण्याचा व ताकारी येथील सभा उधळून लावण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला आहे यावर खा. शेट्टी म्हणाले की, माझा नारदासारखा संपूर्ण राज्यात संचार सुरू असतो. आजवर मला कोणी अडवले नाही आणि पुढेही कोणी अडविण्याची शक्यता नाही.ते तर खंडणीबहाद्दर!स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इस्लामपूर येथील कार्यालय फोडण्यात आले. यावर खा. राजू शेट्टी म्हणाले की, कार्यालय फोडणारे कोण आहेत, हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. बलात्काराच्या आरोपातील, खुनाचे गुन्हे असलेल्या खंडणी बहाद्दरांनी हा हल्ला केला आहे. ते कोणत्या पक्षात, कोणत्या संघटनेत आहेत, हे लवकरच जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.