शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

...तर माझ्या गाडीवर दगड पडले असते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:33 IST

सांगली : सरकार कोणतेही असो, केवळ शेतकºयांच्या हितासाठी प्रस्थापितांविरोधात संघर्ष उभा केला. शेतकºयांना फसवले जात असल्याने शेतकºयांत सरकारबद्दल रोष आहे. त्यामुळेच मंत्र्यांच्या गाड्यांवर दगड पडत आहेत. शेतकºयांचे प्रश्न सुटले असते आणि मी एखाद्या देवमाणसाविरोधात बोललो असतो तर माझ्याच गाडीवर दगड पडले असते, असा टोला सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता ...

सांगली : सरकार कोणतेही असो, केवळ शेतकºयांच्या हितासाठी प्रस्थापितांविरोधात संघर्ष उभा केला. शेतकºयांना फसवले जात असल्याने शेतकºयांत सरकारबद्दल रोष आहे. त्यामुळेच मंत्र्यांच्या गाड्यांवर दगड पडत आहेत. शेतकºयांचे प्रश्न सुटले असते आणि मी एखाद्या देवमाणसाविरोधात बोललो असतो तर माझ्याच गाडीवर दगड पडले असते, असा टोला सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता खा. राजू शेट्टी यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.हुतात्मा गौरव पुरस्काराच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आलेल्या खा. शेट्टी यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर झालेली दगडफेक व त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खा. शेट्टी यांनी जोरदार हल्लाबोल केला.शेट्टी म्हणाले की, शेतकºयांसाठी उभारलेल्या या चळवळीत व्यक्तीव्देषाला कधीच थारा दिला नाही. संघटनेचे आंदोलन एका व्यक्तीच्या विरोधात नसून, सरकारच्या धोरणाच्याविरोधात आहे. शेतकºयांत सरकारबद्दल असंतोष असून, त्या रोषाला प्रत्येक मंत्र्याला सामोरे जावे लगणार आहे. सरकारकडून शेतकºयांना फसवणुकीचे काम सुरू असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेल्या सन्मान योजनेतून शेतकºयांचा अपमानच करण्यात येत आहे. तूर खरेदी करताना सांगण्यात एक येते व परिस्थिती वेगळीच आहे. ज्यांच्या विरोधात आज आंदोलने सुरू आहेत, त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठ्या व्यक्तीविरोधात आम्ही आंदोलने उभारली होती.इस्लामपुरात शेट्टींना फिरकू न देण्याचा व ताकारी येथील सभा उधळून लावण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला आहे यावर खा. शेट्टी म्हणाले की, माझा नारदासारखा संपूर्ण राज्यात संचार सुरू असतो. आजवर मला कोणी अडवले नाही आणि पुढेही कोणी अडविण्याची शक्यता नाही.ते तर खंडणीबहाद्दर!स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इस्लामपूर येथील कार्यालय फोडण्यात आले. यावर खा. राजू शेट्टी म्हणाले की, कार्यालय फोडणारे कोण आहेत, हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. बलात्काराच्या आरोपातील, खुनाचे गुन्हे असलेल्या खंडणी बहाद्दरांनी हा हल्ला केला आहे. ते कोणत्या पक्षात, कोणत्या संघटनेत आहेत, हे लवकरच जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.