शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

...मगच शिक्षकांना सोडावे, जत तालुका पंचायत समिती बैठक : मासिक बैठकीत विविध ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 10:54 PM

जत तालुका पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. यात चौदाव्या वित्त आयोगातून निधी खर्च झाल्यानंतर त्यांची शहानिशा केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीने बिले अदा करावीत, ग्रामसेवकांनी नेमणूक

जत : जत तालुका पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. यात चौदाव्या वित्त आयोगातून निधी खर्च झाल्यानंतर त्यांची शहानिशा केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीने बिले अदा करावीत, ग्रामसेवकांनी नेमणूक असलेल्या ठिकाणी राहावे, अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करावी, नवीन शिक्षक येऊन येथे हजर झाल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांना तालुक्यातून बाहेर सोडण्यात यावे, असे ठराव एकमताने संमत करण्यात आले. अध्यक्षस्थानी सभापती मंगल जमदाडे होत्या.

यावेळी उपसभापती शिवाजी शिंदे, सदस्य रवींद्र सावंत, मनोज जगताप, आप्पा मासाळ, मनोज जगताप, दºयापा हत्तळ्ळी, दिग्विजय चव्हाण, अ‍ॅड. आडव्याप्पा घेरडे, विष्णू चव्हाण, अर्चना पाटील, सुशिला तावशी, कविता खोत, लक्ष्मी माळी उपस्थित होते.

चौदाव्या वित्त आयोगातून खर्च करण्यात येणाºया निधीचा मुद्दा अ‍ॅड. आडव्याप्पा घेरडे यांनी उपस्थित केला. पंचायत समितीने ग्रामपंचायतीचे अकौंट लॉक केल्यामुळे सरपंचांच्या अधिकारावर गदा आली आहे, असा आरोप केला. त्यावर प्रशासकीय अधिकारी म्हणाले की, अधिकारावर गदा आणण्याचा हा मुद्दा नसून या निर्णयामुळे सरपंचाला अंधारात ठेवून जो मनमानी कारभार व गैरव्यवहार होत होते, ते आता बंद झाले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अकौंट लॉक हा पर्याय काढण्यात आला आहे.

कविता खोत यांनी संख मध्यम प्रकल्पातील अतिक्रमण काढावे व तालुक्यात काही ठिकाणी रस्त्याची निकृष्ट कामे होत आहेत, त्याची चौकशी करावी, त्यानंतर बिले आदा करावीत, असा ठराव घ्यावा, अशी मागणी केली.रवींद्र सावंत व आप्पा मासाळ यांनी पंचायत समिती बांधकाम विभागाच्या कामाचे वाभाडे काढले. पं. स. विश्रामगृहात कोणालाही विश्वासात न घेता आणि माहिती न देता जे बदल केले आहेत, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली व झालेली चूक दुरुस्त करुन घेण्यात यावी अशी मागणी केली.ग्रामसेवकांवर कारवाई कराएकही ग्रामसेवक मुख्यालयात राहत नाही. याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. लेखी आदेश काढून त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी सांगितले. तालुक्यात बाहेरून शिक्षक आल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांना सोडावे व बहुतांश ग्रामसेवक मुख्यालयात राहत नाहीत, अशा ग्रामसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. आडव्याप्पा घेरडे यांनी केली असता, वरिष्ठ पातळीवरुन शिक्षण सचिवांचा दबाव आहे. ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यांना सोडण्यात यावे, असा आदेश आहे असे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण