शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

...तर ड्रेनेज ठेकेदारावर फौजदारी करणार

By admin | Updated: May 8, 2016 00:34 IST

विजय घाडगे : प्रशासन-ठेकेदारांची मिलिभगत

सांगली : सांगली, मिरजेतील ड्रेनेज योजनेच्या कामात अनेक चुका झाल्या आहेत. त्यामुळे मार्च २०१७ पर्यंत हे काम पूर्ण होणे शक्य नाही. मुदतीत चांगले काम ठेकेदाराने केले नाही, तर आम्ही त्याच्यावर फौजदारी दाखल करून ठेकेदाराला काळ््या यादीत टाकण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असा इशारा उपमहापौर विजय घाडगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, प्रशासन आणि ठेकेदाराची मिलिभगत असल्याने योजनेत गोंधळ निर्माण झाला आहे. ५० टक्के जादा दराने या योजनेची निविदा मंजूर झाली आहे. तरीही दर्जाहीन काम सर्वत्र दिसून येत आहे. आवश्यकतेपेक्षा जादा खुदाई करून रस्त्यांचे नुकसान केले जात आहे. त्याचबरोबर ही योजना उपनगरांसाठी प्राधान्याने राबवायची असताना उपनगरांमध्ये केवळ ५ टक्केच काम झाले आहे. त्यामुळे योजनेचा मूळ उद्देशच हरविला आहे. सांगलीत ३0 टक्के, तर मिरजेत ६0 टक्के योजनेचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगलीतील कामास १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मिरजेतील ट्रंकलाईनचे काम अद्याप अपूर्ण आहे. नियोजनबद्ध पध्दतीने योजनेचे काम सुरू नसल्याचे दिसून येत आहे. मुदतीत चांगले काम करण्याचा ठेकेदाराचा हेतू दिसत नाही. उपठेकेदाराकडून काम करून घेतले जात असताना त्याबाबत कोणतीही विचारणा केली जात नाही. एकूणच योजनेवर प्रशासकीय नियंत्रण दिसत नसल्याचे चित्र आहे. वेळेत काम पूर्ण झाले नाही, तर संबंधित ठेकेदारावर आम्ही फौजदारी दाखल करू. त्याचबरोबर त्याला काळ््या यादीत टाकण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, असा इशारा घाडगे यांनी दिला. (प्रतिनिधी)योजनेचे काम मंदगतीनेप्रतिदिन ३0 ते ४0 मीटर काम अपेक्षित असताना केवळ ५ मीटरचेच काम होत आहे. मंदगतीने होणारे हे काम पाहिले तर मार्च २0१७ पर्यंत दिलेल्या मुदतीत ते पूर्ण होईल, असे वाटत नाही.