शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
4
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
5
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
6
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
7
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
9
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
10
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
11
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
12
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
13
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
14
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
15
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
16
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
17
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
18
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
19
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
20
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या

काश्मीर, लेहमधून सांगली जिल्ह्यातील २५० पर्यटक मजल-दरमजल करीत परतले घरी

By अविनाश कोळी | Updated: May 13, 2025 16:05 IST

पर्यटकांचा परतीचा प्रवास कसरतीचा ठरला

अविनाश कोळीसांगली : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण होण्यापूर्वीच देशाच्या उत्तरेकडील पर्यटन स्थळांच्या सहलीवर गेलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांचा परतीचा प्रवास कसरतीचा ठरला. काही भागातील विमान वाहतूक बंद असल्याने रस्ते वाहतुकीचा एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरला होता. मजल-दरमजल करीत अडीचशे पर्यटकांनी घर गाठले.जिल्ह्यातील पर्यटकांनी महिन्यापूर्वी लेह-लडाख, काश्मीर, चंदीगढ आदी भागात सहलींचे नियोजन केले होते. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पर्यटन स्थळावर पर्यटक पाेहचले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून १३ प्रवासी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये चंडीगड, अमृतसर, जयपूर, हैदराबाद, कोची, जोधपूर, राजकोट आणि सुरत या शहरांकडे जाणाऱ्या हवाई वाहतुकीचा समावेश होता.सांगली जिल्ह्यातील ज्या पर्यटकांनी या शहरांसाठी विमानांचे बुकिंग केले होते. त्यांना ऐनवेळी ते रद्द करावे लागले. मात्र, ही सेवा बंद होण्यापूर्वी जिल्ह्यातील २५० हून अधिक प्रवासी पर्यटनस्थळी दाखल झाले होते. त्यांचा परतीचा प्रवास हवाई वाहतूक बंद झाल्याने अडचणीत आला होता.टूर्स ॲंड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून पॅकेज त्यांनी घेतले होते. परतीच्या प्रवासाचे पर्यायी नियोजन करण्यासाठी कंपन्यांनी पर्यटकांना आणखी काही दिवस पर्यटनस्थळी थांबविले होते. दोन्ही देशांतील तणावाची स्थिती थोडी कमी झाल्यानंतर रस्ते वाहतुकीचा पर्याय त्यांनी स्वीकारला.

परतीचा प्रवास झाला त्रासदायीवाहने बदलत कसरत करीत २५० हून अधिक प्रवाशांना घरी परतावे लागले. सहल नियोजन केलेल्या कंपन्यांनी याची व्यवस्था केली होती. मात्र, परतीचा प्रवास खूपच लांबल्याने पर्यटकांना त्रास झाला. घरी परतल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

लेहमध्येच जवळपास २०० जणांचा ग्रुप अडकला होता. त्या भागातून परतीसाठी हवाई वाहतूक नसल्याने रस्ते वाहतुकीचा पर्याय स्वीकारला. त्यांना सुखरूप सांगलीला आणले. या काळात खूप कसरत करावी लागली. - मंगेश शहा, ट्रॅव्हल्स व्यावसायिक, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीJammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन