शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर, लेहमधून सांगली जिल्ह्यातील २५० पर्यटक मजल-दरमजल करीत परतले घरी

By अविनाश कोळी | Updated: May 13, 2025 16:05 IST

पर्यटकांचा परतीचा प्रवास कसरतीचा ठरला

अविनाश कोळीसांगली : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण होण्यापूर्वीच देशाच्या उत्तरेकडील पर्यटन स्थळांच्या सहलीवर गेलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांचा परतीचा प्रवास कसरतीचा ठरला. काही भागातील विमान वाहतूक बंद असल्याने रस्ते वाहतुकीचा एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरला होता. मजल-दरमजल करीत अडीचशे पर्यटकांनी घर गाठले.जिल्ह्यातील पर्यटकांनी महिन्यापूर्वी लेह-लडाख, काश्मीर, चंदीगढ आदी भागात सहलींचे नियोजन केले होते. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पर्यटन स्थळावर पर्यटक पाेहचले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून १३ प्रवासी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये चंडीगड, अमृतसर, जयपूर, हैदराबाद, कोची, जोधपूर, राजकोट आणि सुरत या शहरांकडे जाणाऱ्या हवाई वाहतुकीचा समावेश होता.सांगली जिल्ह्यातील ज्या पर्यटकांनी या शहरांसाठी विमानांचे बुकिंग केले होते. त्यांना ऐनवेळी ते रद्द करावे लागले. मात्र, ही सेवा बंद होण्यापूर्वी जिल्ह्यातील २५० हून अधिक प्रवासी पर्यटनस्थळी दाखल झाले होते. त्यांचा परतीचा प्रवास हवाई वाहतूक बंद झाल्याने अडचणीत आला होता.टूर्स ॲंड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून पॅकेज त्यांनी घेतले होते. परतीच्या प्रवासाचे पर्यायी नियोजन करण्यासाठी कंपन्यांनी पर्यटकांना आणखी काही दिवस पर्यटनस्थळी थांबविले होते. दोन्ही देशांतील तणावाची स्थिती थोडी कमी झाल्यानंतर रस्ते वाहतुकीचा पर्याय त्यांनी स्वीकारला.

परतीचा प्रवास झाला त्रासदायीवाहने बदलत कसरत करीत २५० हून अधिक प्रवाशांना घरी परतावे लागले. सहल नियोजन केलेल्या कंपन्यांनी याची व्यवस्था केली होती. मात्र, परतीचा प्रवास खूपच लांबल्याने पर्यटकांना त्रास झाला. घरी परतल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

लेहमध्येच जवळपास २०० जणांचा ग्रुप अडकला होता. त्या भागातून परतीसाठी हवाई वाहतूक नसल्याने रस्ते वाहतुकीचा पर्याय स्वीकारला. त्यांना सुखरूप सांगलीला आणले. या काळात खूप कसरत करावी लागली. - मंगेश शहा, ट्रॅव्हल्स व्यावसायिक, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीJammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन